शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

गुहागर - भातगावात दरड कोसळून वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:03 IST

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या पावसाचा गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुहागर भातगाव देऊळवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुसळधार पावसाचा तडाखा गणपतीपुळे परिसरालाही बसला आहे. पुढील २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

ठळक मुद्देगुहागर - भातगावात दरड कोसळून वाहतूक ठप्पगणपतीपुळे परिसराला फटका, रस्ता खचल्याने अनेक मार्ग बंद

रत्नागिरी : जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या पावसाचा गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुहागर भातगाव देऊळवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुसळधार पावसाचा तडाखा गणपतीपुळे परिसरालाही बसला आहे. पुढील २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.सोमवारपासून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचण्याचे प्रकार घडले असून, नदी, नाल्यांना पाणी आले आहे. राजापुरातील अर्जुना नदीपात्राला पूर आल्याने पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले होते. रात्री हे पाणी बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरू लागल्याने व्यापाऱ्यांनी रात्रीच दुकानातील सर्व माल इतरत्र हलविण्यास सुरूवात केली. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मंगळवारी पुराचे पाणी ओसरले होते.गेल्या आठवड्यात गुहागर तालुक्यातील भातगाव रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा दरड कोसळल्याने सकाळपासून वाहतूक ठप्प आहे. देवरूख साटवली येथे देखील रस्ता खचला आहे. खेड तालुक्यातील विराचीवाडी, वेरळ, सुकिवली - भास्ते, ओक्रवाडी, शेल्डी या भागात घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

तालुक्यातील रघुवीर घाटात सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने दरड कोसळल्याने वाहतूक बंद पडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही दरड बाजूला केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. गुहागर - चिपळूण मार्गावर सोमवारी झाड पडल्याने वाहतूक बंद पडली होती. हे झाड बाजूला करण्यात आले असून, या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये - मजगाव रस्ता खचल्याने सोमवारी रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर धामणंद - नेवरे मार्गावर रस्ता खचल्याने या मार्गावरीलही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील सोलगाव - बौद्धवाडी - बाणेवाडी रस्त्याच्या पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी