शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

गुहागर - भातगावात दरड कोसळून वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:03 IST

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या पावसाचा गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुहागर भातगाव देऊळवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुसळधार पावसाचा तडाखा गणपतीपुळे परिसरालाही बसला आहे. पुढील २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

ठळक मुद्देगुहागर - भातगावात दरड कोसळून वाहतूक ठप्पगणपतीपुळे परिसराला फटका, रस्ता खचल्याने अनेक मार्ग बंद

रत्नागिरी : जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या पावसाचा गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुहागर भातगाव देऊळवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुसळधार पावसाचा तडाखा गणपतीपुळे परिसरालाही बसला आहे. पुढील २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.सोमवारपासून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचण्याचे प्रकार घडले असून, नदी, नाल्यांना पाणी आले आहे. राजापुरातील अर्जुना नदीपात्राला पूर आल्याने पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले होते. रात्री हे पाणी बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरू लागल्याने व्यापाऱ्यांनी रात्रीच दुकानातील सर्व माल इतरत्र हलविण्यास सुरूवात केली. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मंगळवारी पुराचे पाणी ओसरले होते.गेल्या आठवड्यात गुहागर तालुक्यातील भातगाव रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा दरड कोसळल्याने सकाळपासून वाहतूक ठप्प आहे. देवरूख साटवली येथे देखील रस्ता खचला आहे. खेड तालुक्यातील विराचीवाडी, वेरळ, सुकिवली - भास्ते, ओक्रवाडी, शेल्डी या भागात घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

तालुक्यातील रघुवीर घाटात सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने दरड कोसळल्याने वाहतूक बंद पडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही दरड बाजूला केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. गुहागर - चिपळूण मार्गावर सोमवारी झाड पडल्याने वाहतूक बंद पडली होती. हे झाड बाजूला करण्यात आले असून, या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये - मजगाव रस्ता खचल्याने सोमवारी रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर धामणंद - नेवरे मार्गावर रस्ता खचल्याने या मार्गावरीलही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील सोलगाव - बौद्धवाडी - बाणेवाडी रस्त्याच्या पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी