शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर - भातगावात दरड कोसळून वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:03 IST

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या पावसाचा गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुहागर भातगाव देऊळवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुसळधार पावसाचा तडाखा गणपतीपुळे परिसरालाही बसला आहे. पुढील २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

ठळक मुद्देगुहागर - भातगावात दरड कोसळून वाहतूक ठप्पगणपतीपुळे परिसराला फटका, रस्ता खचल्याने अनेक मार्ग बंद

रत्नागिरी : जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या पावसाचा गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुहागर भातगाव देऊळवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुसळधार पावसाचा तडाखा गणपतीपुळे परिसरालाही बसला आहे. पुढील २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.सोमवारपासून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचण्याचे प्रकार घडले असून, नदी, नाल्यांना पाणी आले आहे. राजापुरातील अर्जुना नदीपात्राला पूर आल्याने पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले होते. रात्री हे पाणी बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरू लागल्याने व्यापाऱ्यांनी रात्रीच दुकानातील सर्व माल इतरत्र हलविण्यास सुरूवात केली. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मंगळवारी पुराचे पाणी ओसरले होते.गेल्या आठवड्यात गुहागर तालुक्यातील भातगाव रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा दरड कोसळल्याने सकाळपासून वाहतूक ठप्प आहे. देवरूख साटवली येथे देखील रस्ता खचला आहे. खेड तालुक्यातील विराचीवाडी, वेरळ, सुकिवली - भास्ते, ओक्रवाडी, शेल्डी या भागात घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

तालुक्यातील रघुवीर घाटात सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने दरड कोसळल्याने वाहतूक बंद पडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही दरड बाजूला केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. गुहागर - चिपळूण मार्गावर सोमवारी झाड पडल्याने वाहतूक बंद पडली होती. हे झाड बाजूला करण्यात आले असून, या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये - मजगाव रस्ता खचल्याने सोमवारी रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर धामणंद - नेवरे मार्गावर रस्ता खचल्याने या मार्गावरीलही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील सोलगाव - बौद्धवाडी - बाणेवाडी रस्त्याच्या पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी