शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

गुढीपाडव्याचे नमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST

असतात. गावागावातून येणाऱ्या पालख्या, त्यांच्या ओटीसाठीची लगबग, ढोल-ताशांचा गजर, घंटानाद अक्षरशः वेड लावणारे आणि उत्साहाचे भरते आणणारे हे दिवस ...

असतात. गावागावातून येणाऱ्या पालख्या, त्यांच्या ओटीसाठीची लगबग, ढोल-ताशांचा गजर, घंटानाद अक्षरशः वेड लावणारे आणि उत्साहाचे भरते आणणारे हे दिवस संपूच नये वाटते. खेळ्यांचे मेळ भरपूर येतात; पण नमन दाखवणारे मोजकेच. ‘अरे, आज नमान हाय’ हे वाक्यच संध्याकाळची वाट पाहायला लावते. लहानपणी तर आम्ही चार पाच किलोमीटरवर नमन पाहायला जायचो; पण एखाद्या खेळ्यांचे पूर्ण नमन पाहायचे असेल तर गुढीपाडव्याला त्यांच्या मांडावर (खेळ बसण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण ) जायचे. खरं तर रावणाला पराभूत करून लंका जिंकणाऱ्या रामाच्या स्वागतासाठी गुढ्या उभारण्याची ही परंपरा. तळकोकणात याच दिवशी खेळ उतरला जातो. आमच्या हर्चे गावात पूर्वी बाहेरगावाहून खेळे आले की, त्यांचे बोचके (तीन दिवसाचे साहित्य) बाहेर मंडपाला लावलेले असे. ते झोपायलाही घरी नाहीत, उलट मांडावर जायचे. त्यातून

कोणी घरी येऊन झोपले तर रात्री अकरा-बाराच्या सुमारास ‘आयना की बायना.. घेतल्याशिवाय जायना’ म्हणत दारात येणारी टोळी खेळगड्याला सोबत घेऊनच रवाना होई. त्यामुळे घरी झोपायचे धाडसच कोणी करेना. हा खेळ गुढीपाडवा झाला की समाप्त होई. आजही आमच्याकडे गुढीपाडव्यादिवशी सकाळीच गावकरांच्या घरी असलेली सोंगे मांडावर आणतात. त्यात राम-लक्ष्मण, वाघ, हरिण यांचे मुखवटे, रावणाची वजनदार फळी, बंडबाहुली,

नटवे आदी साहित्य आणले जाते. इतर दिवशी बरेच खेळे गण, गवळण, वगनाट्य दाखवून नमन संपवतात; पण गुढीपाडव्याला सर्व जुन्या चालीरीती पाहायला मिळतात. आमच्याकडे यादिवशी बरेचदा रात्री बारानंतरच नमन चालू होते ते पहाटेपर्यंत चालते. गण, गवळण, वगनाट्य, याबरोबरच फार्स, अंगोडी सोंगे, हरिण, वाघ, नटवे, बंडबाहुली आणि शेवटी राम-रावण युद्ध. शेवटी सर्व

नमनकरी ‘हिंद भू आमची सेना शिवाजी, राणा मराठ्यांचा बाणा....’ गीत गात गावातील देवतांचा जयजयकार करतात. यानंतर नमनाची सांगता होते. मात्र पाडव्याच्या

दिवशी हरिण म्हणून गेल्यानंतर मागून इतरांनी टाळ्यांनी झोडपलेले, वाघाच्या अंगाखांद्यावर उड्या मारलेले, राम-लक्ष्मण यांना तलवारी घेत खेळवत आणलेले, रावणाला प्रेक्षकांतून आणताना उडालेला हाहाकार, रावणाची जड फळी नाचवून अंगावर आलेला रावण, नारळ फिरवून उतरण्यासाठीची धडपड, राम-लक्ष्मण आपणच नाचवायचे म्हणून आमच्या बंधूंनी लपवून ठेवलेले मुखवटे, काळोखात लाल रंग समजून रावणाला फासलेले तिखट, नमनाला फार उशीर झाल्याने ऐन इंट्रीच्या वेळी झोपलेला सेंदूरदैत्य, गायरीत (शेणकाई) पडलेली पुतनामावशी, वाघ नाचवणारे

बुवा, बंडबावली स्पेशालिस्ट नाऱ्या नाना, कितीही टाइट असले तरी लयीत टाळ वाजवणारे निवळकर (टोपणनावाने महाराज म्हूणन ते अधिक प्रसिद्ध होते.) ही सारी मंडळी, हास्याचे क्षण पाडव्याच्या नमनाला आवर्जून स्मरतात. नमनाच्या अखेरीस चुडी (एकत्र बांधलेल्या गवताच छोट्या पेंढ्या) पेटवून खेळ खेळला जातो आणि शिमगोत्सवाची सांगता होते. बऱ्याचदा पहाटे नमन आवरून शेजारी भडे गावात जायची आमची इच्छा असे. पाडव्याला तिकडे नमनाची सांगता रसान्यात उड्या मारून होते. आजही तेथे

साधारण २० बाय २० फुटांच्या चौरसात किमान अडीच फूट रसाना (लाकडे जाळून निखाऱ्याचा ढीग) केला जातो. नमनाच्या शेवटी गावकरी आणि मानकरी तसेच समस्त खेळगडी ‘लागेलो, लागेलो’ च्या जयघोषात बिनधास्तपणे

रसान्यात उड्या घेत शिमगोत्सवाची सांगता करतात. दोन्ही गावांतील पाडव्याचे नमन पाहता शिवाजी महाराजांचे वंशज अनेक पिढ्यांपासून धगधगत्या आगीशी खेळ करून निडरपणे जगण्यास समर्थ असल्याचेच द्योतक वाटतात.

पूर्वापार चालत आलेल्या या रूढी-परंपरांना नव्या पिढीचा बाज मिळाला, हे जरी खरे असले तरीही पाडव्याच्या नमनात पारंपरिकतेची रेलचेल आजही पाहावयास मिळते जी चिरस्मरणीय ठरते.

- सुहास वाडेकर, हर्चे, लांजा