शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याचे नमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST

असतात. गावागावातून येणाऱ्या पालख्या, त्यांच्या ओटीसाठीची लगबग, ढोल-ताशांचा गजर, घंटानाद अक्षरशः वेड लावणारे आणि उत्साहाचे भरते आणणारे हे दिवस ...

असतात. गावागावातून येणाऱ्या पालख्या, त्यांच्या ओटीसाठीची लगबग, ढोल-ताशांचा गजर, घंटानाद अक्षरशः वेड लावणारे आणि उत्साहाचे भरते आणणारे हे दिवस संपूच नये वाटते. खेळ्यांचे मेळ भरपूर येतात; पण नमन दाखवणारे मोजकेच. ‘अरे, आज नमान हाय’ हे वाक्यच संध्याकाळची वाट पाहायला लावते. लहानपणी तर आम्ही चार पाच किलोमीटरवर नमन पाहायला जायचो; पण एखाद्या खेळ्यांचे पूर्ण नमन पाहायचे असेल तर गुढीपाडव्याला त्यांच्या मांडावर (खेळ बसण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण ) जायचे. खरं तर रावणाला पराभूत करून लंका जिंकणाऱ्या रामाच्या स्वागतासाठी गुढ्या उभारण्याची ही परंपरा. तळकोकणात याच दिवशी खेळ उतरला जातो. आमच्या हर्चे गावात पूर्वी बाहेरगावाहून खेळे आले की, त्यांचे बोचके (तीन दिवसाचे साहित्य) बाहेर मंडपाला लावलेले असे. ते झोपायलाही घरी नाहीत, उलट मांडावर जायचे. त्यातून

कोणी घरी येऊन झोपले तर रात्री अकरा-बाराच्या सुमारास ‘आयना की बायना.. घेतल्याशिवाय जायना’ म्हणत दारात येणारी टोळी खेळगड्याला सोबत घेऊनच रवाना होई. त्यामुळे घरी झोपायचे धाडसच कोणी करेना. हा खेळ गुढीपाडवा झाला की समाप्त होई. आजही आमच्याकडे गुढीपाडव्यादिवशी सकाळीच गावकरांच्या घरी असलेली सोंगे मांडावर आणतात. त्यात राम-लक्ष्मण, वाघ, हरिण यांचे मुखवटे, रावणाची वजनदार फळी, बंडबाहुली,

नटवे आदी साहित्य आणले जाते. इतर दिवशी बरेच खेळे गण, गवळण, वगनाट्य दाखवून नमन संपवतात; पण गुढीपाडव्याला सर्व जुन्या चालीरीती पाहायला मिळतात. आमच्याकडे यादिवशी बरेचदा रात्री बारानंतरच नमन चालू होते ते पहाटेपर्यंत चालते. गण, गवळण, वगनाट्य, याबरोबरच फार्स, अंगोडी सोंगे, हरिण, वाघ, नटवे, बंडबाहुली आणि शेवटी राम-रावण युद्ध. शेवटी सर्व

नमनकरी ‘हिंद भू आमची सेना शिवाजी, राणा मराठ्यांचा बाणा....’ गीत गात गावातील देवतांचा जयजयकार करतात. यानंतर नमनाची सांगता होते. मात्र पाडव्याच्या

दिवशी हरिण म्हणून गेल्यानंतर मागून इतरांनी टाळ्यांनी झोडपलेले, वाघाच्या अंगाखांद्यावर उड्या मारलेले, राम-लक्ष्मण यांना तलवारी घेत खेळवत आणलेले, रावणाला प्रेक्षकांतून आणताना उडालेला हाहाकार, रावणाची जड फळी नाचवून अंगावर आलेला रावण, नारळ फिरवून उतरण्यासाठीची धडपड, राम-लक्ष्मण आपणच नाचवायचे म्हणून आमच्या बंधूंनी लपवून ठेवलेले मुखवटे, काळोखात लाल रंग समजून रावणाला फासलेले तिखट, नमनाला फार उशीर झाल्याने ऐन इंट्रीच्या वेळी झोपलेला सेंदूरदैत्य, गायरीत (शेणकाई) पडलेली पुतनामावशी, वाघ नाचवणारे

बुवा, बंडबावली स्पेशालिस्ट नाऱ्या नाना, कितीही टाइट असले तरी लयीत टाळ वाजवणारे निवळकर (टोपणनावाने महाराज म्हूणन ते अधिक प्रसिद्ध होते.) ही सारी मंडळी, हास्याचे क्षण पाडव्याच्या नमनाला आवर्जून स्मरतात. नमनाच्या अखेरीस चुडी (एकत्र बांधलेल्या गवताच छोट्या पेंढ्या) पेटवून खेळ खेळला जातो आणि शिमगोत्सवाची सांगता होते. बऱ्याचदा पहाटे नमन आवरून शेजारी भडे गावात जायची आमची इच्छा असे. पाडव्याला तिकडे नमनाची सांगता रसान्यात उड्या मारून होते. आजही तेथे

साधारण २० बाय २० फुटांच्या चौरसात किमान अडीच फूट रसाना (लाकडे जाळून निखाऱ्याचा ढीग) केला जातो. नमनाच्या शेवटी गावकरी आणि मानकरी तसेच समस्त खेळगडी ‘लागेलो, लागेलो’ च्या जयघोषात बिनधास्तपणे

रसान्यात उड्या घेत शिमगोत्सवाची सांगता करतात. दोन्ही गावांतील पाडव्याचे नमन पाहता शिवाजी महाराजांचे वंशज अनेक पिढ्यांपासून धगधगत्या आगीशी खेळ करून निडरपणे जगण्यास समर्थ असल्याचेच द्योतक वाटतात.

पूर्वापार चालत आलेल्या या रूढी-परंपरांना नव्या पिढीचा बाज मिळाला, हे जरी खरे असले तरीही पाडव्याच्या नमनात पारंपरिकतेची रेलचेल आजही पाहावयास मिळते जी चिरस्मरणीय ठरते.

- सुहास वाडेकर, हर्चे, लांजा