शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

चौपदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची पालकमंत्र्यांकडून कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:57 IST

मुंबई - गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या रहिवाशांना तसेच वाहनचालकांना होणाऱ्या त्रासवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची चांगलीच कान उघाडणी केल्यानंतर या महामार्गावरच्या डांबरीकरणाचे तसेच पॅचवर्कचे काम आठवडाभरात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन कंत्राटदारांनी पालकमंत्री यांना दिले.

ठळक मुद्दे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम आठवडाभरात सुरुखेड उधळे निवासस्थानी कंत्राटदार व अधिकाऱ्यांसमवेत बैठक

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या रहिवाशांना तसेच वाहनचालकांना होणाऱ्या त्रासवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची चांगलीच कान उघाडणी केल्यानंतर या महामार्गावरच्या डांबरीकरणाचे तसेच पॅचवर्कचे काम आठवडाभरात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन कंत्राटदारांनी पालकमंत्री यांना दिले.गेल्या वर्षभरापासून मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चार विविध कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले. या कंपन्यांना त्या त्या रस्त्यांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना तेथील रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.

विविध दौऱ्यावेळी तसेच गणेशोत्सवावेळी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री यांनी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराबरोबर बैठका घेऊन या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ पुर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेतही यासंदर्भात पालकमंत्री वायकर यांनी मंत्रालयात बैठका घेतल्या होती.कोकणात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे या महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील रस्त्यांची फारच दयनिय अवस्था झाली आहे. जिल्ह्याचा दौरा केला असता त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली.

स्थानिक जनतेनेही या महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणाºया त्रासाची माहिती पालकमंत्री वायकर यांना दिली. याची गंभिर दखल घेत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी सकाळी मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची खेड येथील निवासस्थानी बैठक घेतली.या बैठकीला खेडचे प्रांत सोनावणे त्याचबरोबर खेड तसेच चिपळुण येथील कंत्राटदार हजर होते. या बैठकी कशेळी ते चिपळुण लोटे या महामार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर पालकमंत्री वायकर यांनी तीव्र शब्दात कंत्राटदारांची कानउघाडणी केली.

या महामार्गावरील डांबरीकरणाचे तसेच पॅचवर्कचे काम सुरू करण्याचे निर्देश वायकर यांनी संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार कशेळी ते चिपळूण लोटे महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम आठवडाभरात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकरRatnagiriरत्नागिरी