शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

धान्य दुकानात खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 23:45 IST

खेड तालुका : रेशनदुकानांच्या काळाबाजाराकडे दुर्लक्ष

खेड : तालुक्यातील काही रास्त दराच्या धान्य दुकानांमध्ये अद्यापही काळाबाजार होत आहे. रजिस्टरद्वारे येथील दुकानचालकांकडून योग्य प्रकारे हिशोब दाखवण्यात येत असला तरी प्रत्यक्षात कार्डधारकाला काहीही मिळत नाही. यामुळे रास्त दुकानांची तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र, हे नियम अनेकवेळा अधिकारीही पाळत नसल्याचे पुढे आले आहे. काही दुकानांतून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकानात धान्य आणलेच नाही तर काहींनी धान्य आणले असले तरीही ते ग्राहकांना दिले नसल्याचे वास्तव आता पुढे येत असून, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. ऐन गणेशोत्सवात अनेक धान्य दुकानांवर खडखडाट झाल्याने सामान्य गणेशभक्तांना दुप्पट दराने वस्तू किराणा दुकानातून घ्याव्या लागल्या. त्यामुळे अनेक ग्राहकांनी याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पुरवठा अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर दुकानांची पाहणी करणे आवश्यक होते. मात्र, ही तपासणी झालीच नाही. ऐन गणेशोत्सवाप्रसंगी या दुकानांमधून धान्याचा खडखडाट झाल्याने ग्राहकांना धान्य उपलब्ध होऊ शकले नाही. काहींनी गणपतीच्या आगमनाच्या एक दिवस अगोदरच धान्य दुकान उघडले होते़ अनेकांनी सरकारचे नियम पाळले असले तरीही काही मोजक्या दुकानदारांच्या अरेरावीपणाचा फटका तेथील ग्राहकांना बसत असल्याचे सांगण्यात येत आहे़ या दुकानांची तपासणी गेले काही वर्षे झाली नसल्याचे समजते. रेशनदुकानदारांकडून कधीही दुकाने उघडणे आणि अवेळी बंद करणे याबरोबरच खराब धान्य बदलून न देणे तसेच उर्मट भाषा वापरणे असे प्रकार वारंवार घडत आहेत़ मात्र, अशा प्रकाराकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून अशा दुकानदारांना वचक बसण्यासाठी आता थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत गाऱ्हाणी मांडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)गणरायही नाही पावले...गणेशोत्सवात वेळेत धान्य पुरवठा होईल आणि त्याचबरोबर तेल आणि साखरही रेशनदुकानांवर मिळेल, या आशेत सर्वसामान्य भक्तगण होते. प्रत्यक्षात गणेशोत्सवात वेगळेच चित्र दिसले. जे नियमित धान्य मिळत होते, त्याचाही खडखडाट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे नेहमीचे धान्यही रेशनदुकानावर मिळाले नाही. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात भक्तांची पंचाईत झाली.