शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

पंधराव्या वित्त आयोगातून जिल्ह्याला २९ कोटी रुपये अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:37 IST

रत्नागिरी : पंधराव्या वित्त आयोगातून सन २००२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेला एकूण २९ कोटी रुपये अनुदान ...

रत्नागिरी : पंधराव्या वित्त आयोगातून सन २००२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेला एकूण २९ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. या निधीतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास साधला जाणार आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार या अनुदानाचा वापर पायाभूत सुविधांसाठी करावयाचा आहे. त्यामध्ये स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थिती कायम राखणे, तसेच देखभाल दुरुस्ती करणे, पेयजल पाणीपुरवठा, जल पुनर्भरण, पावसाच्या पाण्याची साठवण यासाठी खर्च करावयाचा आहे.

या निधीचे जिल्हा परिषदेला १० टक्के, पंचायत समितीला १० टक्के आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ८० टक्के या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यात ९ पंचायत समित्या असून, ८४५ ग्रामपंचायती आहेत. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत स्तरावरील पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत विविध प्रकल्प, योजनामधील कंत्राटदार व इतर लाभार्थ्यांना निधीचे वितरण ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच पीएफएमएस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक आहे, अशी सूचना शासनाकडून देण्यात आली आहे.

हा निधी वितरित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आयसीआय बँकेत खाते उघडण्याचे तसेच जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे तालुकानिहाय मेळावे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंधराव्या वित्त आयोगामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकासकामांवर ग्रामपंचायतींनी जास्तीत जास्त भर द्यावा, अशीही सूचना देण्यात आली आहे.