शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरातील आजींनी पार केली वयाची १२० वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 18:51 IST

Senior Citizen Ratnagiri- वयाची साठ वर्षे झाली की, पुढील आयुष्य कसे जाणार याची चिंता अनेकांना पडलेली असते. पूर्वीच्या काळातील माणसं काबाडकष्ट करत असल्याने त्यांचे आयुर्मान चांगले होते असे म्हटले जाते. ते सत्यात उतरवले आहे. घोडवली (ता. संगमेश्वर) येथील आजींनी. या आजींनी १७ फेब्रुवारी रोजी वयाची १२० वर्षे पूर्ण केली. लक्ष्मी सखाराम भोजने असे या आजींचे नाव असून, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा वाढदिवसही साजरा केला.

ठळक मुद्देसंगमेश्वरातील लक्ष्मीआजींनी पार केली वयाची १२० वर्षे लक्ष्मी यांची प्रकृती ठणठणीत

रत्नागिरी : वयाची साठ वर्षे झाली की, पुढील आयुष्य कसे जाणार याची चिंता अनेकांना पडलेली असते. पूर्वीच्या काळातील माणसं काबाडकष्ट करत असल्याने त्यांचे आयुर्मान चांगले होते असे म्हटले जाते. ते सत्यात उतरवले आहे. घोडवली (ता. संगमेश्वर) येथील आजींनी. या आजींनी १७ फेब्रुवारी रोजी वयाची १२० वर्षे पूर्ण केली. लक्ष्मी सखाराम भोजने असे या आजींचे नाव असून, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा वाढदिवसही साजरा केला.संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गावात पार्वती मोरे या आजींचे वय १०६ वर्षे आहे. या आजींच्या वयाला ओलांडत घोडवलीतील लक्ष्मी भोजने यांनी वयाची १२० वर्षे पूर्ण केली आहेत. १७ फेब्रुवारी १९०१ रोजी जन्मलेल्या लक्ष्मी भोजने यांचे माहेर संगमेश्वरातीलच चांदिवणे गवळीवाडी येथील आहे.

घोडवली येथील सखाराम भोजने यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बालपणापासूनच शेतीची आवड असल्याने लक्ष्मी यांनी स्वतःला शेतीच्या विविध कामात झोकून दिले. भातशेती बरोबरच नाचणी, वरी, खामडी अशी विविध प्रकारची शेती त्यांनी अनेक वर्षे केली. त्यातून त्यांनी चांगले उत्पन्नही घेतले होते. शेतकरी कुटुंब असल्याने सतत कष्ट सुरुच असायचे. त्यामुळे ४ मुलगे आणि ३ मुली होऊनही लक्ष्मी यांची प्रकृती नेहमीच ठणठणीत राहिली.पती निधनानंतर खचून न जाता, संसाराचा सारा भार त्यांनी स्वत:वर घेतला. मुलांना शक्य झाले तेवढे शिक्षणही त्यांनी दिले. शिक्षण घेत असतांना मुलांनी शेतीत मदत करुन आईचे हात बळकट केले. किरकोळ आजाराव्यतिरिक्त कोणताही गंभीर आजार नसलेल्या लक्ष्मी भोजने यांनी सन २०१० साली वयाची १०० वर्षे पूर्ण केली. त्यावेळीही कुटुंबियांनी त्यांचा शतकोत्सव साजरा केला होता.कष्टप्रद वाटचालनोकरी, व्यवसायानिमित्त मुले शहराकडे गेली. मुला - मुलींची लग्ने झाल्यानंतर प्रत्येकाचा संसार सुरू झाला. मात्र, सारे कुटुंब लक्ष्मी यांची विचारपूस करून त्यांना आदराची वागणूक देत होते. मुलांकडून चार पैसे हातात येऊ लागले म्हणून लक्ष्मी यांनी शेती करणे सोडले नाही. अशातच त्यांच्या चार मुलांपैकी दोघांचा मृत्यू झाला. तरीही खचून न जाता लक्ष्मी यांनी आपली कष्टप्रद वाटचाल सुरुच ठेवली.स्वत:ची कामे स्वत:चवयाची शंभरी गाठूनही लक्ष्मी या केर कचरा, सडा सारवण आदी कामे करतच होत्या. गेल्या पाच सहा वर्षात वयोमानानुसार ऐकू कमी येणे, नजर कमी येणे असे प्रकार जाणवू लागले आहेत. आता माणूस जवळ आल्याशिवाय त्यांना ओळखता येत नाही. मात्र अशा परिस्थितीतही अजूनही त्या स्वतःची सर्व कामे स्वतः करत आहेत. वय इतके वाढल्यानंतरही एका जागी न बसता त्या घरात हिंडून फिरुन आहेत.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकRatnagiriरत्नागिरी