शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरातील आजींनी पार केली वयाची १२० वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 18:51 IST

Senior Citizen Ratnagiri- वयाची साठ वर्षे झाली की, पुढील आयुष्य कसे जाणार याची चिंता अनेकांना पडलेली असते. पूर्वीच्या काळातील माणसं काबाडकष्ट करत असल्याने त्यांचे आयुर्मान चांगले होते असे म्हटले जाते. ते सत्यात उतरवले आहे. घोडवली (ता. संगमेश्वर) येथील आजींनी. या आजींनी १७ फेब्रुवारी रोजी वयाची १२० वर्षे पूर्ण केली. लक्ष्मी सखाराम भोजने असे या आजींचे नाव असून, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा वाढदिवसही साजरा केला.

ठळक मुद्देसंगमेश्वरातील लक्ष्मीआजींनी पार केली वयाची १२० वर्षे लक्ष्मी यांची प्रकृती ठणठणीत

रत्नागिरी : वयाची साठ वर्षे झाली की, पुढील आयुष्य कसे जाणार याची चिंता अनेकांना पडलेली असते. पूर्वीच्या काळातील माणसं काबाडकष्ट करत असल्याने त्यांचे आयुर्मान चांगले होते असे म्हटले जाते. ते सत्यात उतरवले आहे. घोडवली (ता. संगमेश्वर) येथील आजींनी. या आजींनी १७ फेब्रुवारी रोजी वयाची १२० वर्षे पूर्ण केली. लक्ष्मी सखाराम भोजने असे या आजींचे नाव असून, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा वाढदिवसही साजरा केला.संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गावात पार्वती मोरे या आजींचे वय १०६ वर्षे आहे. या आजींच्या वयाला ओलांडत घोडवलीतील लक्ष्मी भोजने यांनी वयाची १२० वर्षे पूर्ण केली आहेत. १७ फेब्रुवारी १९०१ रोजी जन्मलेल्या लक्ष्मी भोजने यांचे माहेर संगमेश्वरातीलच चांदिवणे गवळीवाडी येथील आहे.

घोडवली येथील सखाराम भोजने यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बालपणापासूनच शेतीची आवड असल्याने लक्ष्मी यांनी स्वतःला शेतीच्या विविध कामात झोकून दिले. भातशेती बरोबरच नाचणी, वरी, खामडी अशी विविध प्रकारची शेती त्यांनी अनेक वर्षे केली. त्यातून त्यांनी चांगले उत्पन्नही घेतले होते. शेतकरी कुटुंब असल्याने सतत कष्ट सुरुच असायचे. त्यामुळे ४ मुलगे आणि ३ मुली होऊनही लक्ष्मी यांची प्रकृती नेहमीच ठणठणीत राहिली.पती निधनानंतर खचून न जाता, संसाराचा सारा भार त्यांनी स्वत:वर घेतला. मुलांना शक्य झाले तेवढे शिक्षणही त्यांनी दिले. शिक्षण घेत असतांना मुलांनी शेतीत मदत करुन आईचे हात बळकट केले. किरकोळ आजाराव्यतिरिक्त कोणताही गंभीर आजार नसलेल्या लक्ष्मी भोजने यांनी सन २०१० साली वयाची १०० वर्षे पूर्ण केली. त्यावेळीही कुटुंबियांनी त्यांचा शतकोत्सव साजरा केला होता.कष्टप्रद वाटचालनोकरी, व्यवसायानिमित्त मुले शहराकडे गेली. मुला - मुलींची लग्ने झाल्यानंतर प्रत्येकाचा संसार सुरू झाला. मात्र, सारे कुटुंब लक्ष्मी यांची विचारपूस करून त्यांना आदराची वागणूक देत होते. मुलांकडून चार पैसे हातात येऊ लागले म्हणून लक्ष्मी यांनी शेती करणे सोडले नाही. अशातच त्यांच्या चार मुलांपैकी दोघांचा मृत्यू झाला. तरीही खचून न जाता लक्ष्मी यांनी आपली कष्टप्रद वाटचाल सुरुच ठेवली.स्वत:ची कामे स्वत:चवयाची शंभरी गाठूनही लक्ष्मी या केर कचरा, सडा सारवण आदी कामे करतच होत्या. गेल्या पाच सहा वर्षात वयोमानानुसार ऐकू कमी येणे, नजर कमी येणे असे प्रकार जाणवू लागले आहेत. आता माणूस जवळ आल्याशिवाय त्यांना ओळखता येत नाही. मात्र अशा परिस्थितीतही अजूनही त्या स्वतःची सर्व कामे स्वतः करत आहेत. वय इतके वाढल्यानंतरही एका जागी न बसता त्या घरात हिंडून फिरुन आहेत.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकRatnagiriरत्नागिरी