शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

संगमेश्वरातील आजींनी पार केली वयाची १२० वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 18:51 IST

Senior Citizen Ratnagiri- वयाची साठ वर्षे झाली की, पुढील आयुष्य कसे जाणार याची चिंता अनेकांना पडलेली असते. पूर्वीच्या काळातील माणसं काबाडकष्ट करत असल्याने त्यांचे आयुर्मान चांगले होते असे म्हटले जाते. ते सत्यात उतरवले आहे. घोडवली (ता. संगमेश्वर) येथील आजींनी. या आजींनी १७ फेब्रुवारी रोजी वयाची १२० वर्षे पूर्ण केली. लक्ष्मी सखाराम भोजने असे या आजींचे नाव असून, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा वाढदिवसही साजरा केला.

ठळक मुद्देसंगमेश्वरातील लक्ष्मीआजींनी पार केली वयाची १२० वर्षे लक्ष्मी यांची प्रकृती ठणठणीत

रत्नागिरी : वयाची साठ वर्षे झाली की, पुढील आयुष्य कसे जाणार याची चिंता अनेकांना पडलेली असते. पूर्वीच्या काळातील माणसं काबाडकष्ट करत असल्याने त्यांचे आयुर्मान चांगले होते असे म्हटले जाते. ते सत्यात उतरवले आहे. घोडवली (ता. संगमेश्वर) येथील आजींनी. या आजींनी १७ फेब्रुवारी रोजी वयाची १२० वर्षे पूर्ण केली. लक्ष्मी सखाराम भोजने असे या आजींचे नाव असून, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा वाढदिवसही साजरा केला.संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गावात पार्वती मोरे या आजींचे वय १०६ वर्षे आहे. या आजींच्या वयाला ओलांडत घोडवलीतील लक्ष्मी भोजने यांनी वयाची १२० वर्षे पूर्ण केली आहेत. १७ फेब्रुवारी १९०१ रोजी जन्मलेल्या लक्ष्मी भोजने यांचे माहेर संगमेश्वरातीलच चांदिवणे गवळीवाडी येथील आहे.

घोडवली येथील सखाराम भोजने यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बालपणापासूनच शेतीची आवड असल्याने लक्ष्मी यांनी स्वतःला शेतीच्या विविध कामात झोकून दिले. भातशेती बरोबरच नाचणी, वरी, खामडी अशी विविध प्रकारची शेती त्यांनी अनेक वर्षे केली. त्यातून त्यांनी चांगले उत्पन्नही घेतले होते. शेतकरी कुटुंब असल्याने सतत कष्ट सुरुच असायचे. त्यामुळे ४ मुलगे आणि ३ मुली होऊनही लक्ष्मी यांची प्रकृती नेहमीच ठणठणीत राहिली.पती निधनानंतर खचून न जाता, संसाराचा सारा भार त्यांनी स्वत:वर घेतला. मुलांना शक्य झाले तेवढे शिक्षणही त्यांनी दिले. शिक्षण घेत असतांना मुलांनी शेतीत मदत करुन आईचे हात बळकट केले. किरकोळ आजाराव्यतिरिक्त कोणताही गंभीर आजार नसलेल्या लक्ष्मी भोजने यांनी सन २०१० साली वयाची १०० वर्षे पूर्ण केली. त्यावेळीही कुटुंबियांनी त्यांचा शतकोत्सव साजरा केला होता.कष्टप्रद वाटचालनोकरी, व्यवसायानिमित्त मुले शहराकडे गेली. मुला - मुलींची लग्ने झाल्यानंतर प्रत्येकाचा संसार सुरू झाला. मात्र, सारे कुटुंब लक्ष्मी यांची विचारपूस करून त्यांना आदराची वागणूक देत होते. मुलांकडून चार पैसे हातात येऊ लागले म्हणून लक्ष्मी यांनी शेती करणे सोडले नाही. अशातच त्यांच्या चार मुलांपैकी दोघांचा मृत्यू झाला. तरीही खचून न जाता लक्ष्मी यांनी आपली कष्टप्रद वाटचाल सुरुच ठेवली.स्वत:ची कामे स्वत:चवयाची शंभरी गाठूनही लक्ष्मी या केर कचरा, सडा सारवण आदी कामे करतच होत्या. गेल्या पाच सहा वर्षात वयोमानानुसार ऐकू कमी येणे, नजर कमी येणे असे प्रकार जाणवू लागले आहेत. आता माणूस जवळ आल्याशिवाय त्यांना ओळखता येत नाही. मात्र अशा परिस्थितीतही अजूनही त्या स्वतःची सर्व कामे स्वतः करत आहेत. वय इतके वाढल्यानंतरही एका जागी न बसता त्या घरात हिंडून फिरुन आहेत.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकRatnagiriरत्नागिरी