शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

रत्नागिरीत ग्रामसेवकांचा मोर्चा

By admin | Updated: July 1, 2014 00:14 IST

मागण्यांसाठी ग्रामसेवक सरसावले

रत्नागिरी : आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, वेतनातील त्रुटीची दुरूस्ती झालीच पाहिजे, बदल्यांमध्ये बदल झालाच पाहिजे आदी विविध घोषणा देत जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यात कंत्राटी ग्रामसेवक वगळता जिल्हाभरातील ३६५ ग्रामसेवक सहभागी झाले होते.ग्रामसेवकांच्या वेतनातील त्रुटीची दुरुस्ती करावी, मूलभूत असलेल्या मागण्यांची पूर्तता करावी आदी विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी यापूर्वी संघटनतर्फे निवेदने, मोर्चा, धरणे आंदोलने करण्यात आली. परंतु, शासनाने त्याकडे दुर्लक्षच केले. मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याने शासनाला जाग आणण्यासाठी रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक युनियनतर्फे आज (दि. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्यस्तरावर करण्यात येणारे हे आंदोलन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. उद्या १ जुलैला कृषीदिन असल्याने उद्या सर्व ग्रामसेवक काम करणार आहेत. कार्यालयीन वेळ संपताच जिल्ह्यातील ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या चाव्या, शिक्के तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्याकडे जमा करणार आहेत. २ व ३ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित धरणे आंदोलनासाठी हे सर्व ग्रामसेवक उद्या मंगळवारी रात्रीच रवाना होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. जी. पाटील यांनी याप्रसंगी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांनी ते स्वीकारले. संघटनेच्या मागण्या आपण शासनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष आर. जी. पाटील, सरचिटणीस जे. डी. बडद, उपाध्यक्ष संतोष हुमणे, महिला उपाध्यक्ष अमिता नेरसेकर, सहसचिव एम. डी. नवरे, ए. के. शिंदे, एस. एन. बेंडल, ए. बी. मोहिरे, आर. एम. पाटील, विकास देसाई, जे. टी. जाधव, एस. एस. महाडिक, एन. एस. पवार, एस. आर. सकपाळ, के. डी. पवार, प्रशांत कांबळे, व्ही. आर. पाटील, गणेश क्षीरसागर, एस. एम. चौगुले, एस. एन. दर्डी, मेधा नलावडे आदी संघटनेचे जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)