शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

ग्रामपंचायत निवडणुका- महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, मनसे सामना रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:24 IST

gram panchayat Election Ratnagiri - रत्नागिरी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजेच ४७९ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारपासून रणसंग्राम सुरू होत आहे. जानेवारीमध्ये मतदान होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अजूनही बहुसंख्य ग्रामपंचायतींमधील उमेदवारांची यादी राजकीय पक्षांनी निश्चित केलेली नाही. तरीही जास्तीत जास्त ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकांसाठी धुरळा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, मनसे सामना रंगणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजेच ४७९ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारपासून रणसंग्राम सुरू होत आहे. जानेवारीमध्ये मतदान होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अजूनही बहुसंख्य ग्रामपंचायतींमधील उमेदवारांची यादी राजकीय पक्षांनी निश्चित केलेली नाही. तरीही जास्तीत जास्त ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यातील एकूण ८४६ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून या काळात संपली आहे, तर ४७१ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर या काळात संपली आहे. त्यामुळे आता एकूण ४७९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. २३ ते ३० डिसेंबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. जिथे गरज आहे तेथे १५ जानेवारीला मतदान घेतले जाणार आहे. १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.राज्यात एकत्र असलेली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांमध्येही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणाला किती जागा, कोण उमेदवार हे निर्णय स्थानिक पातळीवरच घेतले जाणार आहेत. मात्र, आघाडीचा निर्णय अंतिम झाला आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचवेळी शक्य तेथे मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्नही भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका खेड तालुक्यात होणार आहेत, तर सर्वात कमी निवडणुका मंडणगड तालुक्यात होणार आहेत. सरपंच पदाची आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण संभ्रमात आहेत. राजकीय पक्षांनी अजून आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे आतापासून पक्षांतर्गत वादांनी जोर धरला आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रम- दिनांक २३ ते ३० डिसेंबर : नामनिर्देशनपत्र दाखल करणे.- ३१ डिसेंबर : नामनिर्देशनपत्रांची छाननी- ४ जानेवारी : नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत- ४ जानेवारी : निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करणे- १५ जानेवारी : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० मतदान- १८ जानेवारी : मतमोजणी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी