शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण-कऱ्हाड मार्ग खासगीकरणातून, राज्य शासनाकडून शासकीय आदेशही जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:37 IST

राज्य शासनाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या अशा कऱ्हाड ते चिपळूण या रेल्वेमार्गाच्या कामासाठी मात्र हात आखडता घेतला आहे. आता हा मार्ग खासगीकरणातून उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून कऱ्हाड ते चिपळूण रेल्वेमार्गाच्या कामासाठी हात आखडतामार्ग उभारणीचे काम करणाऱ्या कंपनीबरोबर करार

चिपळूण : बुलेट ट्रेनवर हजारो कोटी रुपचे खर्च करणाऱ्या राज्य शासनाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या अशा कऱ्हाड ते चिपळूण या रेल्वेमार्गाच्या कामासाठी मात्र हात आखडता घेतला आहे. आता हा मार्ग खासगीकरणातून उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांचा शोध घेणे सरकारकडून सुरु झाले आहे. मात्र अद्याप त्याला यश आलेले नाही.

कोकण व पश्चिम महाराष्ट्राला एकमेकांशी जोडणारा हा रेल्वेमार्ग खासगीकरणातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शासकीय आदेशात तसा उल्लेखही करण्यात आला आहे.

कऱ्हाड - चिपळूण रेल्वेमार्ग हा केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येणार होता. यासाठी रेल्वे व महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी ५० टक्के खर्च उचलण्याचा करारही गेल्यावर्षी केला होता.

सुमारे चार हजार कोटींच्या या मार्गासाठी सर्वेक्षणही झाले होते. केंद्र सरकार, राज्य सरकार व कोकण रेल्वे महामंडळातर्फे हा प्रकल्प उभारण्यासाठीची तयारीही सुरु होती.

यासाठी मार्ग उभारणीचे काम करणाऱ्या एका कंपनीबरोबर सरकारने करारही केला होता. मात्र, कंपनीने करारावर काम करणे शक्य नाही, असे सांगून माघार घेतली होती. त्यामुळे तो रद्द करण्यात आला.

यावर टीका झाल्यानंतर सरकारची भूमिका बदलली आहे. राज्य शासनाने आता हा मार्ग खासगीकरणातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे शासकीय आदेशही जारी करण्यात आले आहेत.

खासगीकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारताना कोकण रेल्वे महामंडळाचे २२ टक्के भागभांडवल खरेदी करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

सरकारने कोकण रेल्वे महामंडळाचे २२ टक्के भागभांडवल खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे हा मार्ग उभारण्यात शासनाला रस नसल्याचेच द्योतक आहे, असे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी म्हटले आहे. रेल्वेच्या माध्यमातून हा मार्ग झाला पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीIndian Railwayभारतीय रेल्वे