शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गुड न्यूज: केरळमध्ये दाखल आता आमच्याकडे कधी? कोकणवासियांची पावसाच्या आगमनाची उत्कंठा शिगेला

By शोभना कांबळे | Updated: June 8, 2023 17:19 IST

आठ दिवसांच्या विलंबानंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून आता आमच्याकडे कधी येणार, ही कोकणवासियांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

रत्नागिरी : वाढत्या उकाड्याने नागरिकांना हैराण केले आहे. त्यामुळे मान्सूनची आतुरतेने प्रतीक्षा सुरू आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) गुरूवारी केरळात पावसाच्या आगमनाची आनंदाची बातमी दिली आहे. आठ दिवसांच्या विलंबानंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून आता आमच्याकडे कधी येणार, ही कोकणवासियांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

साधारणत: १ जूनच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि साधारणत: आठवडाभरात तो कोकणात हजेरी लावतो. मात्र, यावेळी त्याचे केरळात आगमन विलंबानेच झाले. दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढल्याने परिस्थिती अनुकूल होत आहे. तसेच, पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली हळूहळू वाढत असून या वाऱ्यांची खोली सरासरी समुद्रसपाटीपासून २.१ किमीपर्यंत पोहोचली आहे . केरळच्या किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्यास आणखी तीन ते चार दिवस लागू शकतात, असा अंदाज आयएमडीने रविवारी व्यक्त केला होता. मात्र, मान्सूनने या अंदाजाला बगल देत केरळात प्रवेश केला आहे.

प्रत्येक क्षणाला हवामान बदलत आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उकाड्याने नागरिकांना हैराण केले आहे. त्यामुळे लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. आठ दिवसांच्या विलंबानंतर का होईना मान्सून एकदाचा केरळमध्ये दाखल झाला आहे. यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे.

आता केरळात दाखल झालेला मान्सून आठवडाभरात कोकणात दाखल होणार आहे. हवामान विभागाने मान्सूनचा वेग मंदावेल असे म्हटले होते. मात्र, केरळात तीन चार दिवसांनी येणारा मान्सून आधीच आल्याने आता काेकणातही जलद गतीने येवो, असे आर्जव कोकणवासिय करीत आहेत.

गेल्या चार पाच दिवसांपासून आभाळ भरून येत होते. त्यामुळे पावसाचा शिडकावा होईल, अशी आशा वाटत होती. यंदा वळवानेही हुलकावणीच दिली होती. त्यामुळे पाऊस कधी येतो, असे वाटत होते. सगळ्यांचेच लक्ष आभाळाकडे लागले होते. शेवटी  केरळात दाखल झालेल्या मान्सूनच्या आगमनाने सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसKeralaकेरळkonkanकोकण