शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

गोवळकोट रस्ता दुरुस्तीचे काम पाडले बंद, डांबराचा वापर कमी, नागरिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:28 IST

अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बांधकाम अभियंता नागरिकांच्या अंगावर गेल्याने काही काळ वातावरण तापले होते. यामध्ये मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.

ठळक मुद्देगोवळकोट रस्ता दुरुस्तीचे काम पाडले बंदडांबराचा वापर कमी, नागरिक आक्रमक

चिपळूण : शहरातील गोवळकोट येथे सुरु असलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी हे काम बंद पाडले. कारपेट करताना खडीवर अल्प प्रमाणात डांबर वापरले जात होते.

याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बांधकाम अभियंता नागरिकांच्या अंगावर गेल्याने काही काळ वातावरण तापले होते. यामध्ये मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.गोवळकोट रोड ते गोवळकोट असे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. सुरुवातीपासूनच हे काम वादग्रस्त ठरले आहे. बीबीएम करताना ठेकेदाराने डांबराचा पुरेसा वापर केला नाही म्हणून येथील नागरिकांनी हे काम बंद पाडले होते.

मुख्याधिकारी डॉ.विधाते यांनी रस्त्याची पाहणी करुन ठेकेदाराला समज दिली. नगर परिषदेने चांगल्या कामाची हमी दिल्यानंतर रस्ते दुरुस्तीचे काम पुन्हा सुरु झाले. मात्र कारपेट करताना अनेक ठिकाणी डांबराचा वापर कमी प्रमाणात झाल्याने नागरिक आक्रमक झाले.एका दिवसात अनेक ठिकाणची खडी वर आल्यामुळे नागरिक संतप्त झाले. मंगळवारी सकाळी गोवळकोट रोड येथील कमानीच्या परिसरात काम सुरु होते. आक्रमक नागरिकांनी ते बंद पाडून अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलविले.

मुख्याधिकारी डॉ.विधाते, स्थानिक नगरसेवक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी कारपेट केलेला रस्ता हाताने उखडून दाखविला. डांबरीकरण केल्याने खडी सहज वर येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदाराला ताकीद देण्याची हमी दिली. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरी