शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गोवळकोट रस्ता दुरुस्तीचे काम पाडले बंद, डांबराचा वापर कमी, नागरिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:28 IST

अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बांधकाम अभियंता नागरिकांच्या अंगावर गेल्याने काही काळ वातावरण तापले होते. यामध्ये मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.

ठळक मुद्देगोवळकोट रस्ता दुरुस्तीचे काम पाडले बंदडांबराचा वापर कमी, नागरिक आक्रमक

चिपळूण : शहरातील गोवळकोट येथे सुरु असलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी हे काम बंद पाडले. कारपेट करताना खडीवर अल्प प्रमाणात डांबर वापरले जात होते.

याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बांधकाम अभियंता नागरिकांच्या अंगावर गेल्याने काही काळ वातावरण तापले होते. यामध्ये मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.गोवळकोट रोड ते गोवळकोट असे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. सुरुवातीपासूनच हे काम वादग्रस्त ठरले आहे. बीबीएम करताना ठेकेदाराने डांबराचा पुरेसा वापर केला नाही म्हणून येथील नागरिकांनी हे काम बंद पाडले होते.

मुख्याधिकारी डॉ.विधाते यांनी रस्त्याची पाहणी करुन ठेकेदाराला समज दिली. नगर परिषदेने चांगल्या कामाची हमी दिल्यानंतर रस्ते दुरुस्तीचे काम पुन्हा सुरु झाले. मात्र कारपेट करताना अनेक ठिकाणी डांबराचा वापर कमी प्रमाणात झाल्याने नागरिक आक्रमक झाले.एका दिवसात अनेक ठिकाणची खडी वर आल्यामुळे नागरिक संतप्त झाले. मंगळवारी सकाळी गोवळकोट रोड येथील कमानीच्या परिसरात काम सुरु होते. आक्रमक नागरिकांनी ते बंद पाडून अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलविले.

मुख्याधिकारी डॉ.विधाते, स्थानिक नगरसेवक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी कारपेट केलेला रस्ता हाताने उखडून दाखविला. डांबरीकरण केल्याने खडी सहज वर येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदाराला ताकीद देण्याची हमी दिली. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरी