शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणविरोधात ग्राहक मंचाकडे जाणार

By admin | Updated: June 25, 2015 01:08 IST

जिल्हा परिषद सभा : विविध विषयांवर जोरदार चर्चा

रत्नागिरी : नुकसानभरपाईऐवजी शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देण्याची मागणी करण्याचा आणि कृषीपंपांना वीजपुरवठा न देणाऱ्या महावितरणविरोधात ग्राहक मंचाकडे जाण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या सभेला शासनाच्या विविध खात्याचे खातेप्रमुख अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीवरुन सदस्य उदय बने, भगवान घाडगे, राजेश मुकादम, बाळकृष्ण जाधव, सदस्या रचना महाडीक व अन्य सदस्यांनी जोरदार आवाज उठवित त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी त्या-त्या खात्याच्या वरिष्ठांकडे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष सतीश शेवडे, सर्व सभापती, सदस्य व अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातून शहरामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही ठिकाणी बसची सोय नसल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचे सदस्या विनया गावडे यांनी केली होती. मात्र महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शाळेचे वेळापत्रकच बदलण्याची विनंती शाळा व्यवस्थापनाकडे करुन सर्वांना धक्काच दिला. यावर अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी एस.टी.च्या अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलाविण्याचा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांना देण्यात आलेले शेकडो कृषीपंप तीन वर्षांपासून वीज जोडणी न दिल्याने नादुरुस्त झाले आहे. याबाबत अनेक सभांमध्ये मागणी करुनही महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शासनाचे ६० लाख रुपये फुकट गेले आहेत. याबाबत महावितरणच्या विरोधात कृषी समितीने ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याला या सभेत परवानगी देण्यात आली. बागायतदारांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे जागेवर जाऊन करण्यात आले का, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केल्यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करताच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सभागृहाला पंचनामे दाखवा, त्या पंचनाम्यावर त्रिसदस्यीय समितीसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत का, असा प्रश्न सदस्यांनी विचारताच अधिकारी गोंधळून गेले होते. मागील नुकसान भरपाईचे ४६ कोटी शासनाकडे परत गेले. केवळ सातबारा उताऱ्यावर अनेक शेतकऱ्यांची नावे असल्याने हा प्रकार घडला. या सभेमध्ये बागायतदारांना नुकसान भरपाई नको. मात्र, जो उत्पादक आहे, तसेच कर्ज घेतो त्यालाच शासनाची पीक कर्जमाफी मिळावी, अशी मागणी करतानाच त्यांची नांवे बँकांकडून घ्यावी, असे सुचवण्यात आले. रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या बदलीनंतर त्यांना तत्काळ सोडण्यात आल्याबद्दल सदस्य उदय बने, राजेश मुकादम व अन्य सदस्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त असताना तसेच सावंत यांची चौकशी सुरु असताना त्यांना सोडलेत कसे, तसेच याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करुन सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. (शहर वार्ताहर) ‘अ‍ॅस्टर आधार’वर कारवाईची मागणी जीवनदायी योजनेअंतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या निवळी येथील रुग्णाला शस्त्रक्रिया बंद झाल्याचे सांगून कोल्हापूर येथील अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलने २ लाख ५० हजार रुपयांचे अंदाजपत्रक दिले. या प्रकरणी त्या रुग्णालयावर काय कारवाई केली असा प्रश्न बने यांनी उपस्थित केला. तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.