शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

शेळीपालन दिशादर्शक : दीपक कदम

By admin | Updated: March 28, 2015 00:08 IST

पर्याय खुले : स्वत:च्या प्रगतीबरोबरच एका तरूणाने उभारला मार्गदर्शक प्रकल्प

सुभाष कदम - चिपळूण  नोकरीसाठी लोकांच्या दारोदारी फिरायचे, त्यांचे चार शब्द ऐकून घ्यायचे एवढे करुनही अपेक्षित मोबदला पदरात पडत नाही. आपण लोकांकडे जाण्यापेक्षा लोक आपल्याकडे आले पाहिजेत, अशी खुणगाठ बांधून आपण शेळीपालन व्यवसायात गुंतल्याचे पेढांबे येथील शेतकरी दीपक रघुनाथ कदम यांनी सांगितले. दीपक कदम, त्यांच्या आई रजनी, पत्नी ज्योती व दोन लहान मुले यांच्यासह पेढांबे - मावळतवाडी येथे राहतात. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने मोलमजुरी करुन उदरनिर्वाह केला जातो. दहावीनंतर पुढे काय? याबाबत विचार करत असतानाच गावातील एका ज्येष्ठ नागरिकाकडून शेळीपालनाबाबत माहिती मिळाली आणि आपण शेळीपालनाकडे वळलो. गेली १० वर्षे आपण शेळीपालन करीत असून, सध्या आपल्याकडे २० शेळ्या व १० बोकड आहेत. पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक सकपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय औषध व लसीकरणही केले जाते. वर्षाकाठी आपण ८ ते १० बोकड विकतो. एका बोकडाची किंमत २० ते २५ हजार रुपये असते. त्यामुळे वर्षाकाठी दोन ते अडीच लाख रुपये मिळतात. यामध्ये साधारणत: दीड लाखाचा नफा होतो. भविष्यात बंदिस्त शेळीपालन मोठ्या प्रमाणावर करण्याचा आपला विचार आहे. माझ्याकडे जमीन नाही. त्यामुळे गावातीलच दोन, तीन शेतकऱ्यांची एक एकर जमीन सध्या वापरण्यासाठी घेतली आहे. या जमिनीत नांगरणी करुन गवत पेरणार व तेथेच शेड बांधून शेळीपालन सुरु करणार आहे. आपण शेळीपालन प्रकल्प बघायला जातो. लोकांनी आपल्याकडे यायला हवे यासाठी आपला प्रयत्न आहे. हा व्यवसाय शास्त्रशुद्ध आधुनिक पद्धतीने केल्यास यामध्ये चांगला फायदा आहेकठोर मेहनत घेतल्यास हमखास उत्पन्नाची हमीशेळीपालन करतो म्हणून आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा आहे. परंतु, आज ना उद्या तो १०० टक्के बदलेल, यावर आपला विश्वास आहे. एखाद्याकडे ५० बकऱ्या व २ नर असतील तर वर्षभरात त्याच्या अंगणात चारचाकी गाडी दिसेल. पण, त्यासाठी कठोर मेहनत घेऊन व्यवस्थित लक्ष द्यायला हवे. हा व्यवसाय अतिशय फायद्याचा आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता अशा व्यवसायात यायला हवे, असे आवाहन दीपक कदम यांनी केले. कदम यांचा जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे शिरोही शेळीपालन गटात प्रथम क्रमांक आल्याने जिल्हास्तरावर सत्कारही करण्यात आला आहे.