शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

शेळीपालन दिशादर्शक : दीपक कदम

By admin | Updated: March 28, 2015 00:08 IST

पर्याय खुले : स्वत:च्या प्रगतीबरोबरच एका तरूणाने उभारला मार्गदर्शक प्रकल्प

सुभाष कदम - चिपळूण  नोकरीसाठी लोकांच्या दारोदारी फिरायचे, त्यांचे चार शब्द ऐकून घ्यायचे एवढे करुनही अपेक्षित मोबदला पदरात पडत नाही. आपण लोकांकडे जाण्यापेक्षा लोक आपल्याकडे आले पाहिजेत, अशी खुणगाठ बांधून आपण शेळीपालन व्यवसायात गुंतल्याचे पेढांबे येथील शेतकरी दीपक रघुनाथ कदम यांनी सांगितले. दीपक कदम, त्यांच्या आई रजनी, पत्नी ज्योती व दोन लहान मुले यांच्यासह पेढांबे - मावळतवाडी येथे राहतात. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने मोलमजुरी करुन उदरनिर्वाह केला जातो. दहावीनंतर पुढे काय? याबाबत विचार करत असतानाच गावातील एका ज्येष्ठ नागरिकाकडून शेळीपालनाबाबत माहिती मिळाली आणि आपण शेळीपालनाकडे वळलो. गेली १० वर्षे आपण शेळीपालन करीत असून, सध्या आपल्याकडे २० शेळ्या व १० बोकड आहेत. पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक सकपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय औषध व लसीकरणही केले जाते. वर्षाकाठी आपण ८ ते १० बोकड विकतो. एका बोकडाची किंमत २० ते २५ हजार रुपये असते. त्यामुळे वर्षाकाठी दोन ते अडीच लाख रुपये मिळतात. यामध्ये साधारणत: दीड लाखाचा नफा होतो. भविष्यात बंदिस्त शेळीपालन मोठ्या प्रमाणावर करण्याचा आपला विचार आहे. माझ्याकडे जमीन नाही. त्यामुळे गावातीलच दोन, तीन शेतकऱ्यांची एक एकर जमीन सध्या वापरण्यासाठी घेतली आहे. या जमिनीत नांगरणी करुन गवत पेरणार व तेथेच शेड बांधून शेळीपालन सुरु करणार आहे. आपण शेळीपालन प्रकल्प बघायला जातो. लोकांनी आपल्याकडे यायला हवे यासाठी आपला प्रयत्न आहे. हा व्यवसाय शास्त्रशुद्ध आधुनिक पद्धतीने केल्यास यामध्ये चांगला फायदा आहेकठोर मेहनत घेतल्यास हमखास उत्पन्नाची हमीशेळीपालन करतो म्हणून आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा आहे. परंतु, आज ना उद्या तो १०० टक्के बदलेल, यावर आपला विश्वास आहे. एखाद्याकडे ५० बकऱ्या व २ नर असतील तर वर्षभरात त्याच्या अंगणात चारचाकी गाडी दिसेल. पण, त्यासाठी कठोर मेहनत घेऊन व्यवस्थित लक्ष द्यायला हवे. हा व्यवसाय अतिशय फायद्याचा आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता अशा व्यवसायात यायला हवे, असे आवाहन दीपक कदम यांनी केले. कदम यांचा जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे शिरोही शेळीपालन गटात प्रथम क्रमांक आल्याने जिल्हास्तरावर सत्कारही करण्यात आला आहे.