शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचलनात रत्नागिरीच्या कन्यांचा सहभाग

By शोभना कांबळे | Updated: February 1, 2024 17:06 IST

सर्व महिला वादकांच्या पारंपरिक वादनाने प्रजासत्ताक दिनाचे संचलन होण्याचा हा गेल्या ७५ वर्षांतील पहिलाच ऐतिहासिक प्रसंग

शोभना कांबळेरत्नागिरी : प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर आयोजित करण्यात आलेल्या ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात रत्नागिरी जिल्ह्यातील १९ आणि पुण्यातील १ अशा २० मुली आणि चार मुलांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यात चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूर, खेड तालुक्यांतील सहभागींचा समावेश होता.राष्ट्रगीतानंतर प्रजासत्ताक दिनाची परेड भारताच्या विविध राज्यांतील १२ पथकांतील सुमारे ११२ महिलांच्या पारंपारिक वाद्यवादनाने झाली. सर्व महिला वादकांच्या पारंपरिक वादनाने प्रजासत्ताक दिनाचे संचलन होण्याचा हा गेल्या ७५ वर्षांतील पहिलाच ऐतिहासिक प्रसंग होता. यात विघ्नहर्ता आणि जय हनुमान या ढोलपथकांचा समावेश होता. चिपळूणमधील साहील रानडे पथकप्रमुख, तर मुंबईच्या देवेंद्र शेलार या तरुणाने या पथकाचे नेतृत्व केले. यात विघ्नहर्ता ढोलपथकातील ७ मुली आणि ३ मुलगे होते; तर चिपळूणमधील जय हनुमान ढोलपथकामधील २ मुली होत्या. तसेच रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि खेड येथीलही मुली सहभागी झाल्या होत्या.

चिपळूणमधील पथकप्रमुख साहिल रानडे तसेच वेदांत विजय पवार, भावेश जयंत चिंगळे, धनश्री विवेक फिरमे, प्रणाली नारायण पंडव, प्रियांका पांडुरंग शिगवण, साक्षी दिनेश घाडगे, अंकिता संतोष डिंगणकर, ज्ञानेश्वरी जनार्दन हुमणे, सिद्धी सदानंद बोलाडे, साक्षी सूर्यकांत पवार, दीक्षा संदीप सुतार, पूनम संतोष घोरपडे, रोशनी सुनील घोरपडे, मृण्मयी मंदार ओक, सानिका मनोज लोटेकर यांचा समावेश होता. विघ्नहर्ता पथकातील धनश्री फिरमे ही आपदा सखी आहे. तसेच लांजातील आदित्य दिलीप कांबळे, अंकिता अविनाश जाधव, अनुष्का अविनाश जाधव, राजापुरातील आदिती सुनील कुर्ले, पूजा सुनील कुर्ले, रत्नागिरीतील नुपूर दत्ताराम कीर, खेडची प्रणोती बृहस्पती महाकाळ आणि पुण्याची गौरी नितीन जोशी यांचाही या पथकात समावेश होता.

संचलनाची सुरुवात महाराष्ट्राच्या पथकातील महिलांच्या शंखनाद आणि तुतारीसोबतच ढोल आणि ताशावादनाने झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी असलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ हे कर्तव्यपथावर उपस्थित होते. यानंतर तेलंगणा, कर्नाटक, आदी राज्यांतील महिला वादकांनी संचलन केले. हा प्रसंग डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.यानंतर देशभरातील सुमारे १५०० नामांकित महिला नर्तकींच्या नृत्याचा आविष्कार पाहायला मिळाला. एसएनएच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबईचे देवेंद्र शेलार आणि टीमच्या नृत्यदिग्दर्शनातून महाराष्ट्रातील महिलांचेही सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी होते.

कर्तव्यपथावर राष्ट्रगीत सुरू झाले. त्यानंतर संचलनाला सुरुवात झाली. लगेचच महाराष्ट्राच्या पथकाचे संचलन होते. हे संचलन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्यासमोर झाले. आमच्याकरिता हा क्षण रोमांचक असा होता. - धनश्री फिरमे, आपदा सखी, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४delhiदिल्ली