शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरीत भारिप महासंघाचा घंटानाद, शासनाविरोधात घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 17:49 IST

रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वाराजवळ भारिप बहुजन महासंघ, रत्नागिरी कमिटीच्या वतीने मंगळवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी घंटानाद करण्यात आला. यावेळी शासनाविरोधात नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजीही करण्यात आली.

ठळक मुद्देरत्नागिरीत भारिप महासंघाचा घंटानाद, शासनाविरोधात घोषणाबाजीआरोपींना त्वरित पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी

रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वाराजवळ भारिप बहुजन महासंघ, रत्नागिरी कमिटीच्या वतीने मंगळवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी घंटानाद करण्यात आला. यावेळी शासनाविरोधात नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजीही करण्यात आली.कोरेगाव - भीमा हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार संभाजी भिडे यांना त्वरित अटक करावी, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती व जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी. अनुसूचित जाती - जमाती विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती अदा करावी, टीआयएसएस विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, यासह खेड येथील पुतळ्याची विटंबना आणि कळंबस्ते येथे झालेल्या भीमस्मारकाची अवहेलनाप्रकरणी आरोपींना त्वरित पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवारी भारिप बहुजन महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करीत घंटानाद केला.या घंटानादमध्ये भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष शांताराम कदम, उपाध्यक्ष सिद्धार्थ सावंत, सुरेश मोहिते, सचिव विनोद कदम, सहसचिव श्रीकांत सकपाळ, रूपेंद्र जाधव, दीपक कांबळे, प्रमुख संघटक नितीन जाधव, संघटक रमेश सावंत, चंद्रकांत पवार, महेश सावंत, कायदेशीर सल्लागार संदीप कदम, जिल्हा युवक अध्यक्ष मुज्जफर मुल्ला तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर या मागण्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी हे निवेदन स्वीकारले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGovernmentसरकार