शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या कष्टातून बागायत फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील अर्पणा अनिल विचारे यांनी गेल्या १५ वर्षांत अविरत कष्ट ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील अर्पणा अनिल विचारे यांनी गेल्या १५ वर्षांत अविरत कष्ट करून सहा एकर क्षेत्रावर बागायती फुलविली आहे. पावसाळी भात अवघ्या दहा गुंठ्यांवर करण्यात येत असले तरी त्यांनी बागायतीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सहा एकर क्षेत्रावर आंबा, काजू, नारळ, सुपारीची लागवड रोजगार हमी योजनेतून केली आहे. शिवाय नारळ सुपारी बागायतीमध्ये त्यांनी मसाला पिकांची आंतरलागवड केली आहे.

पती अनिल पोलीस दलात सेवेत असताना अपर्णा यांनी गावाकडील जागेवर बागायती विकसित केली आहे. आंबा-काजू हंगामात २०, तर अन्य दिवसांत दररोज दहा कामगारांना रोजगार त्यांच्याकडे प्राप्त झाला आहे. आंबा, काजू, सुपारी, नारळ विक्रीतून त्यांना उत्पन्न प्राप्त होत आहे. याशिवाय आंबा पोळी, लोणचे, कोकम सरबत, कैरी पावडर, वाळविलेली कैरी, आदी उत्पादने तयार करून त्याची विक्री करीत उत्पन्न मिळवीत आहेत.

सेवानिवृत्तीनंतर पतीची साथ

अनिल विचारे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनीही पत्नीला शेतीच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली आहे. सातशे हापूस कलमातून १३ टन आंबा, एक हजार काजू लागवडीमुळे दीड ते दोन टन काजू, १५० नारळ झाडांमुळे एक हजार नारळ, १५० पोफळीतून १०० किलो सुपारी प्राप्त होत आहे. आंबा मुंबई, पुणे मार्केट, तसेच खासगी विक्री करीत आहेत. नारळ व सुपारीमध्ये काळीमिरी, जायफळ, दालचिनी, कडीपत्ता लागवड केली आहे. मात्र, लवकरच मसाला पिकांचे उत्पन्न सुरू होणार आहे.

प्रक्रिया उद्योगावर भर

आंबा कच्चा व पिकलेला विक्री करीत असतानाच अपर्णा यांनी मोजक्या प्रक्रिया उद्योगावर भर दिला आहे. दरवर्षी दीडशे ते दोनशे किलो लोणचे, ४० किलो आंबा पोळी, शंभर लिटर कोकम सरबत, वीस किलो कैरी पावडर, ४० किलो वाळविलेल्या कैरी फाेंडीची विक्री करीत आहेत. आंबा हंगामात तर त्यांच्याकडे वीस लोकांना दररोज रोजगार प्राप्त होत आहे.

विहिरीला मुबलक पाणी

विचारे यांच्या बागेलगत २००७-०८ साली कृषी बंधारा बांधला आहे. त्यामुळे त्यांच्या बागेतील विहिरीला मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध आहे. मुबलक पाण्यावर बागायती चांगली फुलली आहे. खत व्यवस्थापनापासून फळ काढणीपश्चात विक्री, तसेच उत्पादन निर्मितीसह विक्रीकडे विचारे दाम्पत्य परिश्रम घेत आहेत.

कृषी विभागाचे सहकार्य

अपर्णा यांना शेतीची आवड असल्याने त्या सतत कामात व्यस्त असतात; परंतु लागवडीपासून खते, कीटकनाशकांचा वापर, तसेच हवामानातील बदलामुळे पिकावर होणारे परिणाम याबाबत त्या सतत बारकाईने अभ्यास करतात. त्यांना तालुका कृषी विभागासह मंडळ कृषी अधिकारी व्ही. एस. अवेरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.