शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

महिलेच्या कष्टातून बागायत फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील अर्पणा अनिल विचारे यांनी गेल्या १५ वर्षांत अविरत कष्ट ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील अर्पणा अनिल विचारे यांनी गेल्या १५ वर्षांत अविरत कष्ट करून सहा एकर क्षेत्रावर बागायती फुलविली आहे. पावसाळी भात अवघ्या दहा गुंठ्यांवर करण्यात येत असले तरी त्यांनी बागायतीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सहा एकर क्षेत्रावर आंबा, काजू, नारळ, सुपारीची लागवड रोजगार हमी योजनेतून केली आहे. शिवाय नारळ सुपारी बागायतीमध्ये त्यांनी मसाला पिकांची आंतरलागवड केली आहे.

पती अनिल पोलीस दलात सेवेत असताना अपर्णा यांनी गावाकडील जागेवर बागायती विकसित केली आहे. आंबा-काजू हंगामात २०, तर अन्य दिवसांत दररोज दहा कामगारांना रोजगार त्यांच्याकडे प्राप्त झाला आहे. आंबा, काजू, सुपारी, नारळ विक्रीतून त्यांना उत्पन्न प्राप्त होत आहे. याशिवाय आंबा पोळी, लोणचे, कोकम सरबत, कैरी पावडर, वाळविलेली कैरी, आदी उत्पादने तयार करून त्याची विक्री करीत उत्पन्न मिळवीत आहेत.

सेवानिवृत्तीनंतर पतीची साथ

अनिल विचारे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनीही पत्नीला शेतीच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली आहे. सातशे हापूस कलमातून १३ टन आंबा, एक हजार काजू लागवडीमुळे दीड ते दोन टन काजू, १५० नारळ झाडांमुळे एक हजार नारळ, १५० पोफळीतून १०० किलो सुपारी प्राप्त होत आहे. आंबा मुंबई, पुणे मार्केट, तसेच खासगी विक्री करीत आहेत. नारळ व सुपारीमध्ये काळीमिरी, जायफळ, दालचिनी, कडीपत्ता लागवड केली आहे. मात्र, लवकरच मसाला पिकांचे उत्पन्न सुरू होणार आहे.

प्रक्रिया उद्योगावर भर

आंबा कच्चा व पिकलेला विक्री करीत असतानाच अपर्णा यांनी मोजक्या प्रक्रिया उद्योगावर भर दिला आहे. दरवर्षी दीडशे ते दोनशे किलो लोणचे, ४० किलो आंबा पोळी, शंभर लिटर कोकम सरबत, वीस किलो कैरी पावडर, ४० किलो वाळविलेल्या कैरी फाेंडीची विक्री करीत आहेत. आंबा हंगामात तर त्यांच्याकडे वीस लोकांना दररोज रोजगार प्राप्त होत आहे.

विहिरीला मुबलक पाणी

विचारे यांच्या बागेलगत २००७-०८ साली कृषी बंधारा बांधला आहे. त्यामुळे त्यांच्या बागेतील विहिरीला मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध आहे. मुबलक पाण्यावर बागायती चांगली फुलली आहे. खत व्यवस्थापनापासून फळ काढणीपश्चात विक्री, तसेच उत्पादन निर्मितीसह विक्रीकडे विचारे दाम्पत्य परिश्रम घेत आहेत.

कृषी विभागाचे सहकार्य

अपर्णा यांना शेतीची आवड असल्याने त्या सतत कामात व्यस्त असतात; परंतु लागवडीपासून खते, कीटकनाशकांचा वापर, तसेच हवामानातील बदलामुळे पिकावर होणारे परिणाम याबाबत त्या सतत बारकाईने अभ्यास करतात. त्यांना तालुका कृषी विभागासह मंडळ कृषी अधिकारी व्ही. एस. अवेरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.