शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

गणपतीपुळे समुद्रात सांगलीचे तिघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:57 IST

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात सांगली येथील तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्यादरम्यान घडली. यातील दोघांना ...

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात सांगली येथील तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्यादरम्यान घडली. यातील दोघांना वाचविण्यात यश आले असून, सुनील लक्ष्मण हदिमणी (वय ३१, रा. हनुमंतनगर, सांगली) याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह भंडारपुळे समुद्रकिनाऱ्याजवळ दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान आढळला.गणपतीपुळे येथे मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्त विविध भागातून भाविक दाखल झाले होते. यात्रेची सांगता दुसºया दिवशी दुपारपर्यंत केली जाते. सांगली जिल्ह्यातील सहाजण मंगळवारी १७ रोजी दुपारी २ च्या सुमारास पिकअप गाडीने गणपतीपुळेकडे निघाले. रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला ते गणपतीपुळे येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी देवदर्शन करुन मुक्काम केला . बुधवारी तेथून निघण्यापूर्वी सुनील लक्ष्मण हरिमणी, दत्तात्रय हिप्परकर (रा. अहिल्यानगर, सांगली), सदाशिव डफळापुरे (रा. हनुमंतनगर, सांगली), दत्तात्रय सिद्धप्पा घुगरे (३०, रा. हनुमंतनगर, सांगली), मधु भिमराव बसभित (३०, रा. विजयनगर, सांगली), राजकुमार दºयाप्पा घुगरे (३४, रा. कोल्हापूर रोड) हे सर्वजण सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने समुद्रात आंघोळीसाठी उतरले. त्यातील तिघेजण खोल समुद्राच्या पाण्यात जावू लागले. त्यात सुनील हदिमणी लाटेत अडकल्याने बेपत्ता झाला. त्याच्या पाठोपाठ जाणाºया दत्तात्रय हिप्परकर व सदाशिव डफळापुरे यांना वाचविण्यासाठी निखील सुर्वे व गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकांनी पाण्यात उडी घेतली आणि त्यांना बाहेर काढले.दरम्यान, समुद्रात बेपत्ता झालेल्या सुनील हदिमणी याचा मृतदेह दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास तेथूनच जवळ असणाºया भंडारपुळे समुद्रकिनारी असणाºया स्मशानभूमीसमोर शोधपथकाला आढळला. मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचे विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.दोन दिवसांत दुसरी घटनागणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थीच्या दिवशीच सांगली येथील दोन तरुणांना समुद्रात बुडताना वाचविण्यात यश आले होते. अंगारकीच्या दुसºयाच दिवशी एक तरुण बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली. गणपतीपुळे येथे बाहेर गावाहून येणाºया पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने या दुर्घटना घडत आहेत. याबाबत येथे सूचना फलक लिहिलेला असूनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वारंवार दिसत आहे.