शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

तंटामुक्त समित्यांमुळेच गणेशोत्सव शांततेत!

By admin | Updated: September 23, 2014 00:17 IST

तंटामुक्त समिती : आता नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणपती विसर्जनाच्या मिरवणुका थाटामाटात काढण्यात आल्या. या मिरवणुका शांततेत पार पाडल्या जाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तंटामुक्त समित्यांचा सहभाग दिसून आला. नवरात्रोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी तंटामुक्त समित्या झटत आहेत.जिल्हाभरात १ लाख ५९ हजार ४३६ घरगुती, तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाबरोबर पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस, अकरा व एकवीस दिवसांचे गणपती विसर्जन करण्यात आले. घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींच्या मिरवणुका निघत असल्यामुळे रस्त्यावर गर्दी होते. शिवाय विसर्जन घाटावरही गर्दी उसळते. भाविकांमध्ये उत्साह व जल्लोष अधिक असल्यामुळे काहीवेळा बाचाबाची किंवा तंटे उद्भवण्याची शक्यता असते. किंबहुना त्यामुळे आनंदाचे वातावरण गढूळ होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी तंटामुक्त समित्यांच्या बैठका होऊन मिरवणुका शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात सर्वत्र या मिरवणुका शांततेत पार पडल्या. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुका मोठ्या असतात. त्या तुलनेत घरगुती गणपतींच्या मिरवणुका लहान असतात. ग्रामीण भागात वाडीतील गणेशमूर्ती एकत्रित मिरवणुकीने नेण्यात येत असल्यामुळे बहुधा या मिरवणुका मोठ्या असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा एकापेक्षा अधिक मिरवणुका एकत्र येतात. अशावेळी किरकोळ कारणातून तंटे उदभवू शकतात. मात्र, हे तंटे टाळण्याची जबाबदारी तंटामुक्त समितीची होती. त्यानुसार समितीचे पदाधिकारीदेखील मिरवणुकीच्या वेळी उपस्थित होते.आता नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असल्याने गणेशोत्सवाबरोबर नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तंटामुक्त समित्यांव्दारे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात दि. २५ रोजी दुर्गा मातेच्या एकूण ३६४ मूर्तींची प्र्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ७४ ठिकाणी दुर्गामाता फोटो पूजन होणार आहे. ९४ ठिकाणी दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत नवरात्रोत्सव आल्याने उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तंटामुक्त समित्या सूचना करीत आहेत. तंटे उदभवू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर तंटामुक्त समित्याही सज्ज झाल्या आहेत. गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी वेळोवेळी बैठका घेवून ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले होते. त्यास यश आले असून कोठेही तंटा किंवा भांडण न उदभवता उत्साहात व शांततेत मिरवणूका पार पडल्या. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या सूचना ग्रामस्थांना करण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेण्यात आल्या आहेत. दूर्गामातेच्या आगमनाबरोबर विसर्जन मिरवणूका तसेच नवरात्रातील दांडिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार तंटामुक्त समित्या सज्ज झाल्या आहेत.-विठोबा पाटील, अध्यक्ष तंटामुक्त समिती, मिरजोळे.