शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

तंटामुक्त समित्यांमुळेच गणेशोत्सव शांततेत!

By admin | Updated: September 23, 2014 00:17 IST

तंटामुक्त समिती : आता नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणपती विसर्जनाच्या मिरवणुका थाटामाटात काढण्यात आल्या. या मिरवणुका शांततेत पार पाडल्या जाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तंटामुक्त समित्यांचा सहभाग दिसून आला. नवरात्रोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी तंटामुक्त समित्या झटत आहेत.जिल्हाभरात १ लाख ५९ हजार ४३६ घरगुती, तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाबरोबर पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस, अकरा व एकवीस दिवसांचे गणपती विसर्जन करण्यात आले. घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींच्या मिरवणुका निघत असल्यामुळे रस्त्यावर गर्दी होते. शिवाय विसर्जन घाटावरही गर्दी उसळते. भाविकांमध्ये उत्साह व जल्लोष अधिक असल्यामुळे काहीवेळा बाचाबाची किंवा तंटे उद्भवण्याची शक्यता असते. किंबहुना त्यामुळे आनंदाचे वातावरण गढूळ होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी तंटामुक्त समित्यांच्या बैठका होऊन मिरवणुका शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात सर्वत्र या मिरवणुका शांततेत पार पडल्या. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुका मोठ्या असतात. त्या तुलनेत घरगुती गणपतींच्या मिरवणुका लहान असतात. ग्रामीण भागात वाडीतील गणेशमूर्ती एकत्रित मिरवणुकीने नेण्यात येत असल्यामुळे बहुधा या मिरवणुका मोठ्या असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा एकापेक्षा अधिक मिरवणुका एकत्र येतात. अशावेळी किरकोळ कारणातून तंटे उदभवू शकतात. मात्र, हे तंटे टाळण्याची जबाबदारी तंटामुक्त समितीची होती. त्यानुसार समितीचे पदाधिकारीदेखील मिरवणुकीच्या वेळी उपस्थित होते.आता नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असल्याने गणेशोत्सवाबरोबर नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तंटामुक्त समित्यांव्दारे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात दि. २५ रोजी दुर्गा मातेच्या एकूण ३६४ मूर्तींची प्र्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ७४ ठिकाणी दुर्गामाता फोटो पूजन होणार आहे. ९४ ठिकाणी दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत नवरात्रोत्सव आल्याने उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तंटामुक्त समित्या सूचना करीत आहेत. तंटे उदभवू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर तंटामुक्त समित्याही सज्ज झाल्या आहेत. गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी वेळोवेळी बैठका घेवून ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले होते. त्यास यश आले असून कोठेही तंटा किंवा भांडण न उदभवता उत्साहात व शांततेत मिरवणूका पार पडल्या. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या सूचना ग्रामस्थांना करण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेण्यात आल्या आहेत. दूर्गामातेच्या आगमनाबरोबर विसर्जन मिरवणूका तसेच नवरात्रातील दांडिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार तंटामुक्त समित्या सज्ज झाल्या आहेत.-विठोबा पाटील, अध्यक्ष तंटामुक्त समिती, मिरजोळे.