शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहे. खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहे. खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, व्यापाऱ्यांची होणारी गर्दी पाहता, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. शिवाय मास्क तोंडाऐवजी कानाला अडकवून ठेवण्यात येत आहेत. अनेकजण मास्क वापरतच नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रात्रीपासून परजिल्ह्यांतील शेतकरी लिलावासाठी भाजीपाला घेऊन येत असतात. पहाटे साडेचार वाजता व्यापारी खरेदीसाठी आल्यानंतर लिलावाची बोली सुरू होते. साधारणत: दोनशे ते अडीचशे लोकांची गर्दी जमते. लिलाव झाल्यानंतर व्यवहार झाल्यावर भाजीपाला ताब्यात घेऊन व्यापारी, शेतकरी यांची पांगापांग होईपर्यंत सकाळचे नऊ वाजतात. त्या दरम्यान भाजीपाला ताब्यात घेणे, वाहनांत चढविणे या गोष्टी घडत असतात. लिलावासाठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे निदर्शनास येते. त्यातच कित्येकांनी मास्क परिधान केलेला नसतो, तर काही ग्राहकांचा मास्क कानाला असतो, तोंडावर नसतो. यामुळे पाच ते साडेपाच तासांच्या अवधीत कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने धोका वाढला आहे.

एकीकडे शासनाने ‘ब्रेक द चेन’साठी कडक निर्बंध लागू केले आहेत. असे असताना लिलावाचे व्यवहार होताना निर्बंध का लावले जात नाहीत? शहराजवळील नाचणे येथे व्यवहार संपल्यानंतर विक्रेते शहर व आसपासच्या गावात भाजीविक्रीसाठी जात असतात. यामुळे ही मंडळी कित्येक लोकांच्या संपर्कात येत असल्याने संसर्ग फैलावला जात आहे. भाजीपाल्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये असल्याने लिलाव प्रक्रिया जरी गरजेची असली तरी कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनेही पुढाकार घेणे गरजेचे आहे.