शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहे. खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहे. खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, व्यापाऱ्यांची होणारी गर्दी पाहता, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. शिवाय मास्क तोंडाऐवजी कानाला अडकवून ठेवण्यात येत आहेत. अनेकजण मास्क वापरतच नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रात्रीपासून परजिल्ह्यांतील शेतकरी लिलावासाठी भाजीपाला घेऊन येत असतात. पहाटे साडेचार वाजता व्यापारी खरेदीसाठी आल्यानंतर लिलावाची बोली सुरू होते. साधारणत: दोनशे ते अडीचशे लोकांची गर्दी जमते. लिलाव झाल्यानंतर व्यवहार झाल्यावर भाजीपाला ताब्यात घेऊन व्यापारी, शेतकरी यांची पांगापांग होईपर्यंत सकाळचे नऊ वाजतात. त्या दरम्यान भाजीपाला ताब्यात घेणे, वाहनांत चढविणे या गोष्टी घडत असतात. लिलावासाठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे निदर्शनास येते. त्यातच कित्येकांनी मास्क परिधान केलेला नसतो, तर काही ग्राहकांचा मास्क कानाला असतो, तोंडावर नसतो. यामुळे पाच ते साडेपाच तासांच्या अवधीत कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने धोका वाढला आहे.

एकीकडे शासनाने ‘ब्रेक द चेन’साठी कडक निर्बंध लागू केले आहेत. असे असताना लिलावाचे व्यवहार होताना निर्बंध का लावले जात नाहीत? शहराजवळील नाचणे येथे व्यवहार संपल्यानंतर विक्रेते शहर व आसपासच्या गावात भाजीविक्रीसाठी जात असतात. यामुळे ही मंडळी कित्येक लोकांच्या संपर्कात येत असल्याने संसर्ग फैलावला जात आहे. भाजीपाल्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये असल्याने लिलाव प्रक्रिया जरी गरजेची असली तरी कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनेही पुढाकार घेणे गरजेचे आहे.