शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 14:43 IST

समुद्रकिनारपट्टीवरील जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या चक्रीवादळाची आगाऊ कल्पना मिळावी, यासाठी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठीच्या प्रकल्प अहवालास जागतिक बँकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे ही केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य प्रकल्प सुकाणू समितीच्या बैठकीतही या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देराज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या चार जिल्ह्यांचा समावेशप्रकल्प अहवालास जागतिक बँकेची मान्यता : बेचाळीस कोटी एकोणचाळीस लाखाच्या खर्चास मंजुरी

विहार तेंडुलकर रत्नागिरी : समुद्रकिनारपट्टीवरील जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या चक्रीवादळाची आगाऊ कल्पना मिळावी, यासाठी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठीच्या प्रकल्प अहवालास जागतिक बँकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे ही केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य प्रकल्प सुकाणू समितीच्या बैठकीतही या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे.

समुद्रकिनारी चक्रीवादळाचा असलेला धोका ध्यानी घेऊन कोकण विभागातील चार जिल्ह्यात चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ४२ कोटी ३९ लाख ४७ हजार ८१८ रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील ११ ठिकाणी ही बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार आहेत. हे काम पुढील १८ महिन्यात म्हणजेच २०२० पर्यंत पूर्ण करावयाचे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार असून, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पासाठी राज्य प्रकल्प सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत कामांना मान्यता देण्यात आली आहे.

चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून प्रकल्प अहवाल मागवण्यात आला होता. तो प्राप्त झाल्यानंतर आता ही केंद्र उभारण्याच्या कामांना तसेच प्रशासकीय खर्चाला मंजुरी मिळाली आहे.या अकरा ठिकाणी उभारली जाणार केंद्ररत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यातील काळेथर, आचरा, जामसंडे, विजयदुर्ग, सैतवडे, हर्णै, एडवण, दिघी, दाभोळ, बोर्ली, उसरणी अशा अकरा ठिकाणी ही केंद्र उभारली जाणार आहेत. 

टॅग्स :Cyclone Titliतितली चक्रीवादळRatnagiriरत्नागिरी