शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

चिपळुणात कचरा प्रकल्प फुकटात, मुंबईतील क्लीन ऊर्जा कंपनीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:34 IST

याआधीचा नगर परिषदेचा कोट्यवधी रुपये खर्चातून उभारलेला कचरा प्रकल्प बंद आहे. मात्र, आता नगर परिषदेने एकही रुपया खर्च न करता मुंबईतील क्लीन ऊर्जा कंपनीच्या माध्यमातून प्रकल्प राबवण्याचा धोरणात्मक निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला.

ठळक मुद्देचिपळुणात कचरा प्रकल्प फुकटात, मुंबईतील क्लीन ऊर्जा कंपनीचा पुढाकार सहा एकर जागेत प्रकल्प उभारण्याची तयारी

चिपळूण : याआधीचा नगर परिषदेचा कोट्यवधी रुपये खर्चातून उभारलेला कचरा प्रकल्प बंद आहे. मात्र, आता नगर परिषदेने एकही रुपया खर्च न करता मुंबईतील क्लीन ऊर्जा कंपनीच्या माध्यमातून प्रकल्प राबवण्याचा धोरणात्मक निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला.नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत क्लीन ऊर्जा कंपनीने शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पाच्या सहा एकर जागेत आपला प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली. या प्रकल्पातून ओला, सुका व प्लास्टिक कचऱ्याचीही पूर्णपणे विल्हेवाट लावता येते. त्यातून कचऱ्याचे कोणतेही अंश शिल्लक राहात नाहीत किंवा त्यापासून प्रदूषण होत नाही, असा दावा कंपनीचे अभियंता उमेश खरे व ओमकार महाजन यांनी केला.

ते म्हणाले की, या कंपनीचे झाशी, ठाणे, उरण व अन्य काही ठिकाणी प्रकल्प असून, ठाण्यातील प्रकल्प हा एका हॉस्पिटलच्या आवारातच सुरू आहे. या प्रकल्पासाठी जागा, पाणी व वीज पुरवणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त नगर परिषदेला कोणत्याही प्रकारचा खर्च येणार नाही.

वीजबिल व पाणीपट्टी भरण्याची जबाबदारीदेखील कंपनीच घेणार आहे. त्यासाठी किमान १० वर्षांच्या कालावधीचा करार करावा लागणार आहे. मान्यता दिल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यात हा प्रकल्प उभा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावर नगरसेवक कबीर काद्री, सुधीर शिंदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मात्र, शिवसेनेचे गटनेते उमेश सकपाळ यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांचा समाचार घेत नकाघंटा वाजवून नका, अशा शब्दात सुनावले. प्रकल्प चांगला असेल तर तो स्वीकारण्यात यावा, असे स्पष्ट केले. त्यावर नगरसेवक शशिकांत मोदी, आशिष खातू, नगरसेविका सीमा रानडे यांनी संकल्पना पटवून देण्याची मागणी केली. या प्रकल्पाची जबाबदारी संबंधित कंपनीने घेतली असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी सांगितले. त्यामुळे या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.नगर परिषदेचीच मालकीकचरा प्रकल्पाची जागा हस्तांतरीत करणार नसून, ती नगर परिषदेच्याच मालकीची राहणार आहे. केवळ करार करून जागा वापरण्यास दिली जाणार असून, त्यानंतरचा संपूर्ण खर्च कंपनीच करणार आहे. त्यासाठी नगर परिषदेला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, अशी माहिती मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी दिली.

टॅग्स :Chiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न