शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
4
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
5
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
6
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
7
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
8
Video: सिंहीणीने सिंहाला मारली एक 'फाईट', पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
9
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
10
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
11
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
12
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
13
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
14
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
15
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
16
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
17
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
18
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
19
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
20
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरण भू धारकांना अद्यापही मोबदल्याची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 11:26 IST

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादीत भू धारकांना बाजारभावाच्या चारपटीने जमिन मोबदला देण्याचे ठरले होते. परंतु अद्यापही भू धारक मोबदल्याची प्रतिक्षा करत आहेत .

ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण पैसे खात्यात जमा होण्याची डेड लाईन संपली

वाटुळ, दि. १२ : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाटुळ व मंदरुळमधील ५६७ भू धारकांची जमिन प्रांत कार्यालयाकडून संपादीत झाली आहे. १४ व १५ जुलै रोजी राजापूरचे प्रांत अभय करंगुटकर यांच्या उपस्थिीतीत वाटुळ ग्रामपंचायत कार्यालयात सर्व शेतकºयांसह प्रत्यक्ष भेट घेत प्रांत कार्यालयाकडून वाटुळमधील १८० खातेधारकांच्या व मंदरुळ येथील ८१ खातेधारकांना जमिन मोबदला बाजारभावाच्या चारपटीने देण्याचे ठरले होते. या कामासाठी वाटुळमध्ये १२ कोटी ९९ लाख १ हजार ८१७ तर मंदरुळ येथील शेतकरºयांना २ कोटी ९८ लाख ६१ हजार १२८ रुपये थेट भूधारकांच्या खात्यात ४ सप्टेंबरपर्यंत जमा होतील असे आश्वासन प्रांत कार्यालयाकडून देण्यात आले होते.

आॅक्टोबर महिन्यातील दुसरा आठवडा उलटला तरीही संबंधित खातेधारकांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने वाटुळ व मंदरुळ परिसरातील भू धारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रांत कार्यालयाकडून ४ सप्टेंबर रोजी खात्यात पैसे जमा होणार असल्याची ग्वाही मिळाल्याने व खात्यात जमा होणारी रक्कम लाखोच्या घरात असल्याने अनेक शेतकºयांनी जमीन, फ्लॅट व इतर ठिकाणी पैसे गुंतवले.

काहींनी सप्टेंबर महिन्यात आगाऊ तारखेचे चेकस् दिलेले आहेत. ठरलेल्या मुदतीत चेक न वटल्याने अनेकांना प्रचंड मनस्ताप व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.प्रांत कार्यालयात संबंधित जमिन मालकांनी पाठपुरावा केला असता संपादीत जमिनीबद्दल तक्रारी आल्याने खात्यात पैसे जमा केलेल नसल्याचा खुलासा संबंधित अधिकाºयांकडून करण्यात आला. परंतु वाटुळ तांबळवाडी येथील शेतकºयांनी झालेल्या तक्रारीचा आपसात निपटारा करुन तसे प्रांत कार्यालयाला कळवूनदेखील पैसे मिळत नसल्याचे तांबळवाडी येथील भू धारक बाळकृ ष्ण (बावा) चव्हाण यांनी सांगितले.

शासनाकडून दिलेल्या तारखेला पैसे मिळण्याची हमी असल्याने मिळणाºया आगाऊ रकमेच्या भरवशावर मोठे व्यवहार केलेल्या शेतकºयांना खूप मोठी अडचण झाली असून जिथे काहीच तक्रारी नाहीत, अशा खातेधारकांची रक्कम प्रांत कार्यालयाकडून खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी बाळकृष्ण चव्हाण यांनी केली आहे.सात-बाºयावर अनेकांची नावे आहेत. त्याची योग्यवेळी फोड न झाल्याने तक्रारी होणे साहजिकच आहे. परंतु अनेक ठिकाणी काडीचाही संबंध नसलेल्या व्यक्तीकडून खोट्या तक्रारी दाखल आहेत. अशा तक्रारीचा निपटाराही झालेला आहे. असे असताना राजापूर प्रांत कार्यालयाकडून जमिन संपादीत झाल्यानंतर आता शेतकºयांना वाºयावर सोडल्याची भावना झाली आहे.

करोडो रुपये महिना उलटला तरीही खात्यात जमा झालेले नाहीत. लोकांना कर्जावरील व्याज भरावे लागत आहे. शेतकºयांच्या भावना तीव्र आहेत. जमिन संपादीत करतानाची अधिकाºयांची भाषा व हक्काच्या पैशासाठी प्रांत कार्यालयात चकरा मारताना अधिकारी वर्गाकडून मिळणारी वागणूक कमालीची चिड आणणारी आहे. तक्रारी नसतील त्या शेतकºयांना लागलीच मोबदला मिळावा.- बाळकृष्ण मुरारी चव्हाण, तांबळवाडी, वाटुळ (भूधारक)