शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चौपदरीकरण भू धारकांना अद्यापही मोबदल्याची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 11:26 IST

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादीत भू धारकांना बाजारभावाच्या चारपटीने जमिन मोबदला देण्याचे ठरले होते. परंतु अद्यापही भू धारक मोबदल्याची प्रतिक्षा करत आहेत .

ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण पैसे खात्यात जमा होण्याची डेड लाईन संपली

वाटुळ, दि. १२ : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाटुळ व मंदरुळमधील ५६७ भू धारकांची जमिन प्रांत कार्यालयाकडून संपादीत झाली आहे. १४ व १५ जुलै रोजी राजापूरचे प्रांत अभय करंगुटकर यांच्या उपस्थिीतीत वाटुळ ग्रामपंचायत कार्यालयात सर्व शेतकºयांसह प्रत्यक्ष भेट घेत प्रांत कार्यालयाकडून वाटुळमधील १८० खातेधारकांच्या व मंदरुळ येथील ८१ खातेधारकांना जमिन मोबदला बाजारभावाच्या चारपटीने देण्याचे ठरले होते. या कामासाठी वाटुळमध्ये १२ कोटी ९९ लाख १ हजार ८१७ तर मंदरुळ येथील शेतकरºयांना २ कोटी ९८ लाख ६१ हजार १२८ रुपये थेट भूधारकांच्या खात्यात ४ सप्टेंबरपर्यंत जमा होतील असे आश्वासन प्रांत कार्यालयाकडून देण्यात आले होते.

आॅक्टोबर महिन्यातील दुसरा आठवडा उलटला तरीही संबंधित खातेधारकांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने वाटुळ व मंदरुळ परिसरातील भू धारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रांत कार्यालयाकडून ४ सप्टेंबर रोजी खात्यात पैसे जमा होणार असल्याची ग्वाही मिळाल्याने व खात्यात जमा होणारी रक्कम लाखोच्या घरात असल्याने अनेक शेतकºयांनी जमीन, फ्लॅट व इतर ठिकाणी पैसे गुंतवले.

काहींनी सप्टेंबर महिन्यात आगाऊ तारखेचे चेकस् दिलेले आहेत. ठरलेल्या मुदतीत चेक न वटल्याने अनेकांना प्रचंड मनस्ताप व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.प्रांत कार्यालयात संबंधित जमिन मालकांनी पाठपुरावा केला असता संपादीत जमिनीबद्दल तक्रारी आल्याने खात्यात पैसे जमा केलेल नसल्याचा खुलासा संबंधित अधिकाºयांकडून करण्यात आला. परंतु वाटुळ तांबळवाडी येथील शेतकºयांनी झालेल्या तक्रारीचा आपसात निपटारा करुन तसे प्रांत कार्यालयाला कळवूनदेखील पैसे मिळत नसल्याचे तांबळवाडी येथील भू धारक बाळकृ ष्ण (बावा) चव्हाण यांनी सांगितले.

शासनाकडून दिलेल्या तारखेला पैसे मिळण्याची हमी असल्याने मिळणाºया आगाऊ रकमेच्या भरवशावर मोठे व्यवहार केलेल्या शेतकºयांना खूप मोठी अडचण झाली असून जिथे काहीच तक्रारी नाहीत, अशा खातेधारकांची रक्कम प्रांत कार्यालयाकडून खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी बाळकृष्ण चव्हाण यांनी केली आहे.सात-बाºयावर अनेकांची नावे आहेत. त्याची योग्यवेळी फोड न झाल्याने तक्रारी होणे साहजिकच आहे. परंतु अनेक ठिकाणी काडीचाही संबंध नसलेल्या व्यक्तीकडून खोट्या तक्रारी दाखल आहेत. अशा तक्रारीचा निपटाराही झालेला आहे. असे असताना राजापूर प्रांत कार्यालयाकडून जमिन संपादीत झाल्यानंतर आता शेतकºयांना वाºयावर सोडल्याची भावना झाली आहे.

करोडो रुपये महिना उलटला तरीही खात्यात जमा झालेले नाहीत. लोकांना कर्जावरील व्याज भरावे लागत आहे. शेतकºयांच्या भावना तीव्र आहेत. जमिन संपादीत करतानाची अधिकाºयांची भाषा व हक्काच्या पैशासाठी प्रांत कार्यालयात चकरा मारताना अधिकारी वर्गाकडून मिळणारी वागणूक कमालीची चिड आणणारी आहे. तक्रारी नसतील त्या शेतकºयांना लागलीच मोबदला मिळावा.- बाळकृष्ण मुरारी चव्हाण, तांबळवाडी, वाटुळ (भूधारक)