शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षानंतर थिबा घेणार मोकळा श्वास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 13:39 IST

रत्नागिरी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते. पहिल्या व दुसऱ्या टप्यातील कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली असून परिसर विकासाची कामे ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देचार वर्षानंतर थिबा घेणार मोकळा श्वास...परिसर विकास अंतिम टप्यात

मेहरून नाकाडे 

रत्नागिरी : शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते. पहिल्या व दुसऱ्या टप्यातील कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली असून परिसर विकासाची कामे ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

दुरूस्तीच्या कामकाजामुळे राजवाड्यातील म्युझियमची वरच्या मजल्यावरील केवळ चार दालने पर्यटकांसाठी खुली असली तरी राजवाड्याचा बहुतांश भाग दुरूस्तीच्या नावाखाली गेली चार वर्षे बंद ठेवण्यात आला आहे. परंतु येत्या वर्षभरात कामे तातडीने पूर्ण करून पर्यटकांसाठी संपूर्ण राजवाडा खुला करण्यात येणार आहे.

थिबा राजवाडा दुरूस्तीसाठी पाठविण्यात शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला तीन वर्षानंतर (२०१४-१५) मान्यता मिळाली होती. दुरूस्तीसाठी २ कोटी १७ लाख १२ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला व टप्याटप्याने दुरूस्तीचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात सुमारे १ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी दुरूस्तीसाठी खर्च करण्यात आला. दुसऱ्या टप्यातील दुरूस्तीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असले तरी आतापर्यत २ कोटी ३५ लाखाचा खर्च करण्यात आला आहे. दोन्ही टप्प्यात छप्पर दुरूस्ती, कौले बदलणे, गच्ची, सज्जे, खिडक्या, जिने व पानपट्टी, पन्हळची कामे करण्यात आली. पुरातत्व विभागाच्या सुचनांनुसार संपूर्ण लाकडी काम सागवानी लाकडामध्ये करण्यात आले ेआहे.

परिसर विकास अंतिम टप्यातदोन टप्यातील दुरूस्ती पूर्ण झाली असून परिसर विकास सुरू आहे. यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण, चौकीदार केबीन, प्रसाधन गृहे, पेव्हरब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उपाहारगृह, वाहन पार्किंग व्यवस्थेचे काम अद्याप सुरू आहे.

ऐतिहासिक राजवाडा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. परिसर विकासाचे कामही सध्या अंतिम टप्यात आहे. राजवाड्याच्या मागील बाजुला असणारे संग्रहालय पाहता येत असले तरी राजवाड्याचा मुख्य प्रसाद मात्र पाहता येत नसल्याने बाहेरूनच दर्शन घेवून माघारी फिरावे लागत होते. परंतु आता लवकरच राजवाडा सर्वांसाठी खुला केला जाणार आहे.ब्रम्हदेशच्या राष्ट्राध्यक्षांची भेटब्रम्हदेश राजघराण्यातील काही वंशज व राष्ट्राध्यक्षांनी पाच वर्षापूर्वी रत्नागिरीत येऊन थिबा राजवाडयाची पहाणी केली होती. त्यावेळी थिबाच्या समाधीचेही दर्शन घेतले होते. राजवाडयांची परिस्थिती पाहून त्यांनी दुरूस्तीसाठी निधी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र शासनातर्फे दुरूस्ती सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती.

तत्कालिन जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी स्वत: राजवाड्याची पाहणी करून राजवाडा दुरूस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर कामांना बऱ्यापैकी वेग आला. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनीही आॅक्टोबरमध्ये पदभार स्विकारल्यानंतर राजवाड्याला भेट देवून विकासकामे जलद गतीने पूर्ण करण्याची सूचना केली आहे.राजवाडयात सीसीटीव्हीसुरक्षिततेच्या पार्श्वभूमिवर राजवाडा व परिसरात शंभर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आतापर्यत २६ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय पुरातत्व विभागातर्फे राज्यातील १२ वस्तू संग्रहालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेराखाली थिबा राजवाडा आल्याने राजवाडा,परिसर सुरक्षित झाला आहे. येत्या काही दिवसात राजवाड्यातील अन्य खोल्यांमध्येही सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

परिसर विकासाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. दालनाच्या सुशोभिकरणासाठी ९० लाखाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या वर्षभरात प्रत्येक दालन सुशोभित करून संग्रहालय मांडले जाणार आहे. त्यानंतरच राजवाडा शंभर टक्के पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. यासाठी अजून वर्षभराचा तरी कालावधी लागण्याची शक्यता आहे- ऋत्विज आपटे,जतन सहाय्यक, पुरातत्व विभाग.

टॅग्स :Thiba Palaceथिबा पॅलेसRatnagiriरत्नागिरी