शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

लोटेत तीन महिन्यात चार मोठ्या दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:30 IST

आवाशी : महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीकडे पाहिले जाते. मात्र गेल्या ...

आवाशी : महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीकडे पाहिले जाते. मात्र गेल्या तीन महिन्यातील आग व स्फोटांच्या तीन घटना घडल्याने या वसाहतीमधील कामगार व परिसरातील रहिवासी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न घरडा कंपनीतील स्फोटानंतर पुन्हा एकदा उभा राहिला आहे.

मागील तीन महिन्यातील ही चौथी मोठी घटना आहे. प्रथम येथील दुर्गा फाईन या कंपनीला आग लागून संपूर्ण कंपनी बेचिराख झाली. ही घटना जुनी होत असतानाच येथील लासा सुपर जेनेरिक (जुनी उर्ध्वा) या कंपनीच्या डेरा पेण्ट या बंद प्लँटमध्ये कचऱ्याला आग लागून हाहाकार उडाला. ही घटना ताजी असतानाच सोमवार दिनांक १५ रोजी येथील सुप्रिया लाईफ सायन्सेस या कंपनीत आग लागून तीन कामगार भाजले गेले. या चार दुर्घटनांमधील कामगार बरे होण्याआधीच केवळ पाच दिवसाच्या अंतराने येथील नामांकित गणल्या जाणाऱ्या घरडा केमिकल्स कंपनीत स्फोट होऊन चार कामगार मृत्युमुखी पडले तर एक जण मरणाच्या दारात उभा आहे. त्यामुळे खरोखरच येथील सुरक्षितता अबाधित आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुळात येथील औद्योगिक वसाहत ही पूर्णपणे रासायनिक स्वरूपाची आहे. त्यामुळे येथे छोटे-छोटे अपघात दैनंदिन सुरू असतात. येथील कंपनी व्यवस्थापन व मालक हे कामगार व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यापेक्षा त्यांच्या उत्पादनाला प्राधान्य देतात, ही बाब दुर्दैवाने खरी आहे. अपघात घडल्यानंतर याचे कारण शोधणारे शासनाचे सुरक्षा निरीक्षक हे येथून दोनशे किलोमीटरच्या अंतरावर आहेत. अपघात घडला की ते चार तासात इथे पोहोचतात खरे; पण नेमकी काय तपासणी करतात, हे कधीच उघड केले जात नाही. खरे तर कंपनी व्यवस्थापनाबरोबरच ते अशा घटनांना जास्त जबाबदार आहेत. नियमानुसार कंपनीची वेळोवेळी त्यांच्याकडून तपासणी होत असेल तर असे जीवघेणे अपघात घडतातच कसे?

या यंत्रणांच्या उदासीनपणाइतकाच गंभीर विषय म्हणजे शासनाचे इतर अधिकारी व लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे आमदार, खासदार, पालकमंत्री, पर्यावरण मंत्री यांची भूमिका. इथली सुरक्षितता अबाधित राहील, या दृष्टीने त्यांनी आतापर्यंत काय पुढाकार घेतला, या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड आहे. अपघात घडल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाला भेट देणे व त्याचबरोबर त्या अपघातात मृत वा जखमी झालेल्यांच्या नातेवाइकांना सांत्वन करण्यासाठी भेट देणे, या पलीकडे काहीच घडत नाही.

घरडा येथील मृतांच्या नातेवाइकांना कंपनी भरभरून नुकसान भरपाई देईल. मात्र ज्याच्या कुटुंबात जी पोकळी निर्माण झाली आहे ती त्या भरपाईने भरून निघेल का? या कंपन्यांचे व्यवस्थापन व कोल्हापूर येथील सुरक्षा विभागाने काय तपासणी केली, कंपनी सुरू करण्यापूर्वी तिची सुरक्षा यंत्रणा अद्ययावत आहे की नाही, हे तपासले जाते का? वेळोवेळी करण्यात येणाऱ्या तपासण्यांचा अहवाल, त्यात असणारे दोष हे स्थानिक स्तरावर वा प्रसार माध्यमांकडे प्रकाशित करून संबंधित कंपनीवर योग्य ती कडक कारवाई केली जाते की नाही, हे तपासण्याची जबाबदारी यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांनी पेलायला हवी. अपघात घडल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना काही दोष सापडले का, त्यानुसार कंपनीवर कारवाई झाली का, ही माहिती कोठेही पुढे येत नाही. त्यामुळे अशी कारवाई होते की नाही, हेही शंकास्पद वाटते.

अशा मोठ्या दुर्घटना घडल्यानंतर त्याचे गांभीर्य लक्षात येते. अशावेळी लोकप्रतिनिधी आवर्जून येतात. मात्र इथे काम करणारा कामगार, वसाहतीनजीक राहणारे रहिवासी हे सुरक्षित आहेत का, याचा आढावा नियमितपणे घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांनी लक्ष देणे येथील लोकांनाही अपेक्षित आहे.