शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खासगी टॅँकरचे पाणीही मिळतेय चार दिवसांनी, रत्नागिरी जिल्ह्यात टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:30 IST

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यंदा अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मान्सूनचे उशिराने होत असलेल्या आगमनाने टंचाईच्या आगीत तेल ओतले गेले आहे. धरणांमधील पाणीसाठा संपल्याने नळपाणी योजना ठप्प आहेत, विहिरी आटल्या आहेत.

ठळक मुद्देखासगी टॅँकरचे पाणीही मिळतेय चार दिवसांनीरत्नागिरी जिल्ह्यात अभूतपूर्व टंचाई, खासगी जलस्रोतही आटले

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये यंदा अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मान्सूनचे उशिराने होत असलेल्या आगमनाने टंचाईच्या आगीत तेल ओतले गेले आहे. धरणांमधील पाणीसाठा संपल्याने नळपाणी योजना ठप्प आहेत, विहिरी आटल्या आहेत.

आशेचा किरण असलेल्या खासगी विहिरींमधील साठाही संपुष्टात आला आहे. त्यातच अनेक खासगी विहिरी व खासगी पाणीवाहू टॅँकर शासनाने अधिग्रहित केल्याने खासगी टॅँकरचे पाणीही नंबर लावून ४-४ दिवस मिळत नसल्याने अनेक ठिकाणी तहानेने घसा सुकण्याची वेळ आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.रत्नागिरीसह जिल्हाभरात यंदा गेल्या काही वर्षांमधील सर्वाधिक भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात ४६ लघु व तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्याजवळ उभारलेल्या जॅकवेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील १००पेक्षा अधिक नळपाणी योजनांना पाणीपुरवठा केला जातो.

मात्र, धरणांमधील पाणीसाठाही कमालीचा घटला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शासकीय धरणे व अन्य जलस्रोतांवर चालणाऱ्या नळपाणी योजनाही ठप्प आहेत. काही योजनांना जेमतेम पाणी मिळत आहे. काही ठिकाणी १ ते ४ दिवसांआड अल्प प्रमाणात पाणी पुरवले जात आहे. पाणी पुरवठ्याची स्थिती भयावह आहे.खासगी टॅँकर, विहिरी अधिग्रहितजिल्ह्यात पाणीटंचाई स्थितीवर मात करण्यासाठी खासगी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणारी अनेक वाहने अधिगृहित करण्यात आली आहेत. तसेच पाणीसाठा असलेल्या खासगी विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळेही खासगी टॅँकरना पाणी मिळणे कठीण झाले आहे. नळयोजनांना पाणी मिळत नाही, घराकडील विहिरीही आटल्या आहेत.खासगी पाणीपुरवठा अडचणीतरत्नागिरी शहर व परिसरात खासगी पाणीपुरवठा करणारे अनेक टॅँकर कार्यरत आहेत. अधिग्रहित न केलेले कमी संख्येतील खासगी टॅँकरही तासन्तास खासगी पाणी पुरवठादारांकडे रांगेत उभे असलेले दिसून येत आहेत. खासगी पुरवठादारांच्या विहिरींमधील पाण्याची पातळीही कमालीची खालावली आहे.पाण्यासाठी प्रतीक्षा वाढलीविहिरींमधील पाणी खालावल्याने खासगी टॅँकरचे हजार लीटर पाणी मिळवायलाही बुकिंगनंतर तब्बल ४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. तर ५ हजार लीटरचा पाण्याचा टॅँकर मिळविण्यासाठी तब्बल आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने दरही वाढले आहेत. हजार लीटर पाण्यासाठी ४०० रुपये मोजावे लागत आहेत तर ६ हजार लीटर पाण्यासाठी हजार रुपये मोजावे लागत आहेत.टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या अधिकजिल्ह्यात ११० गावांमधील ११५ वाड्या टंचाईग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात टंचाईग्रस्त वाड्यांची ही संख्या १९५ पर्यंत आहे. तालुके, टंचाईग्रस्त गाव व वाड्यांची संख्या याप्रमाणे - खेड २८ गावे, ४८ वाड्या, चिपळूण १७ गावे, ३१ वाड्या, लांजा ७ गावे, १४ वाड्या, दापोली २४ गावे, ४३ वाड्या, गुहागर २ गावे, ९ वाड्या, संगमेश्वर १८ गावे, ३३ वाड्या. टंचाई स्थितीवर मात करण्यासाठी ७ शासकीय टॅँकर व १३ खासगी टॅँकर उपलब्ध आहेत.पाण्याची पातळी खालावलीखासगी विहिरींचे पाणीपुरवठा करणारे अनेकजण रत्नागिरीत आहेत. पाणी पुरवठादार महागावकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, दोन ते तीन तासांमध्ये १० हजार लीटरचे ४ टॅँकर म्हणजेच ४० हजार लीटर पाणी भरून होत असे.

आता त्याचवेळात हजार लीटरचे दोन टॅँकरही भरताना मुश्कील झाले आहे. पाणी भरल्यानंतर पुन्हा विहिरीचे पाणी उपसणे दोन ते तीन तास बंद ठेवावे लागते. त्यानंतर काही प्रमाणात पाणीसाठा होतो. झऱ्यांना पाणीच कमी झाले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी