शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी

By admin | Updated: August 1, 2014 23:26 IST

राजापूर नगर परिषद : नव्या नगराध्यक्षांची घोषणा

राजापूर : राजापूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजापूर नगरपरिषदेने दिला आहे. येत्या पंधरा दिवसांत शहरातील सर्व पथदीप सुरु करण्याची ग्वाही दिली आहे. शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती राजापूरच्या नगराध्यक्ष मुमताज काझी व उपनगराध्यक्ष रवींद्र बावधाकर यांनी पत्रकारांना दिली आहे.शहराच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देताना शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आता कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी लावण्यात आलेले कचरा टाकण्याचे फलकही गायब झाल्यामुळे कोठेही पुन्हा तसे फलक लावण्यात येणार नाहीत. त्यामुळे आता नागरिकांनी स्वच्छतेच्या बाबतीत स्वत: दक्ष राहावे व नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी नगराध्यक्षांनी केले आहे.राजापूर शहरातील मुख्य रस्ते व विविध प्रभागातील बंद पथदीप येत्या १५ आॅगस्ट पूर्वी सुरु करण्यात येतील. यासाठी लागणारे सामान व मनुष्यबळ नगरपरिषदेकडे उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. बाजारपेठेतील रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे रस्ताच गायब झाला आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी आपली अतिक्रमणे लवकरात लवकर स्वत: हटवावीत, यासाठी नगरपरिषदेकडून त्यांना लेखी पत्र देण्यात आली आहेत. इतके करूनही अतिक्रमणे हटवण्यात न आल्यास नगररिषद प्रशासन ती काढून टाकेल, असा इशाराही यावेळी नगराध्यक्षांनी दिला. रस्त्यावरील झाडी तोडण्याचे कामही करण्यात येत आहे. शहराच्या अनेक भागात व नदीपात्रात कचरा टाकण्याचे प्रमाण अधिक आहे. आता नदीपात्रात व सार्वजनिक ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये, अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, त्याचा परिणाम पुढील आठवडाभरातच दिसून येईल. (प्रतिनिधी)मध्यंतरी राजापूर नगरपरिषदेने शहरात प्लास्टिक बंदी लागू केली होती. मात्र, आता सर्वत्र प्लाास्टीक पिशव्यांचा वापर होताना दिसून येत आहे. आटवडा बाजार व बाजारपेठेतही या प्लास्टिकच्या पिशव्या व्रिकीसाठी ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरावरील बंदी शहरात खऱ्या अर्थाने कधी लागू होणार, असा प्रश्न शहरवासीयांमधून विचारण्यात येत आहे.