शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

goodbye 2021 : चिपळूणमध्ये आलेल्या सर्वात मोठ्या महापुराच्या आठवणी थरकाप उडवणाऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 16:46 IST

एका रात्रीत कोसळलेल्या प्रचंड पावसाने चिपळूण, खेड आणि राजापूरला खूप मोठा आर्थिक फटका बसला. त्यातही चिपळूणमध्ये जवळपास ३० तास मुक्काम केलेल्या पुराच्या आठवणी अजूनही थरकाप उडवणाऱ्या आहेत.

संदीप बांद्रे

चिपळूण : गतवर्षापासून कोरोनाने आधीच आयुष्याला वेगळे वळण लावले असताना २०२१ या वर्षाच्या मध्यावर चिपळुणात आलेल्या महापुराने चांगलाच दणका दिला. एका रात्रीत कोसळलेल्या प्रचंड पावसाने चिपळूण, खेड आणि राजापूरला खूप मोठा आर्थिक फटका बसला. त्यातही चिपळूणमध्ये जवळपास ३० तास मुक्काम केलेल्या पुराच्या आठवणी अजूनही थरकाप उडवणाऱ्या आहेत.

चिपळूण शहर व परिसराला महापूर किंवा अतिवृष्टी नवीन नाही. मग तो १९३५, १९६५ किंवा २००५ चा महापूर असो, त्या महापुराची एक सीमा ठरलेली होती. या सीमेच्या अंदाजाने चिपळुणातील बहुतांशी बांधकामे केली जातात. २००५ च्या महापुरानंतर येथे एक पूररेषाही निश्चित केली होती. साधारण समुद्र सपाटीपासून १२ मीटर उंचीवर चिपळूण शहर वसले आहे. तरीही २००५ ची पूररेषा यापुढे कधीही ओलांडली जाणार नाही, असेच अनेकांना वाटत होते.

परंतु यावेळेस पावसाने हे सर्व अंदाज फोल ठरवले आणि होत्याचे नव्हते केले. चिपळूणच्या इतिहासात प्रथमच महापुराने एवढी मोठी उंची गाठली. आजपर्यंत कधीही न झालेले नुकसान या महापुरात अनुभवास आले. इतकी भीषणता व थरारक अनुभव अनेकांना पहिल्यांदाच आला. सह्याद्री खोऱ्यात २२ व २३ जुलै रोजी कमी कालावाधीत झालेली अतिवृष्टी व त्याच वेळी आलेली भरती हेच महापुराचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे.

कोयना व नवाजा परिसरात २२ जुलै रोजी ७७६ मिलिमीटर, तर दुसऱ्या दिवशी २३ जुलै रोजी ६१० मिलिमीटर इतका पाऊस पडला. त्याने चिपळुणात मोठ्या प्रमाणात पाणी भरले. महापुरात केवळ २ टक्के पाणी हे कोळकेवाडी धरणाचे होते. या कालावधीत चिपळूण परिसरात केवळ २०० मिलिमीटर इतकाच पाऊस झाला होता. तरीही चिपळूणवर एवढे मोठे संकट ओढवले.

वर्ष संपेल, पण या आठवणी संपणार नाहीत. केवळ चिपळूण, खेड आणि राजापूरच नाही तर अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यात सर्वच तालुक्यांना बसला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी