शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

goodbye 2021 : चिपळूणमध्ये आलेल्या सर्वात मोठ्या महापुराच्या आठवणी थरकाप उडवणाऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 16:46 IST

एका रात्रीत कोसळलेल्या प्रचंड पावसाने चिपळूण, खेड आणि राजापूरला खूप मोठा आर्थिक फटका बसला. त्यातही चिपळूणमध्ये जवळपास ३० तास मुक्काम केलेल्या पुराच्या आठवणी अजूनही थरकाप उडवणाऱ्या आहेत.

संदीप बांद्रे

चिपळूण : गतवर्षापासून कोरोनाने आधीच आयुष्याला वेगळे वळण लावले असताना २०२१ या वर्षाच्या मध्यावर चिपळुणात आलेल्या महापुराने चांगलाच दणका दिला. एका रात्रीत कोसळलेल्या प्रचंड पावसाने चिपळूण, खेड आणि राजापूरला खूप मोठा आर्थिक फटका बसला. त्यातही चिपळूणमध्ये जवळपास ३० तास मुक्काम केलेल्या पुराच्या आठवणी अजूनही थरकाप उडवणाऱ्या आहेत.

चिपळूण शहर व परिसराला महापूर किंवा अतिवृष्टी नवीन नाही. मग तो १९३५, १९६५ किंवा २००५ चा महापूर असो, त्या महापुराची एक सीमा ठरलेली होती. या सीमेच्या अंदाजाने चिपळुणातील बहुतांशी बांधकामे केली जातात. २००५ च्या महापुरानंतर येथे एक पूररेषाही निश्चित केली होती. साधारण समुद्र सपाटीपासून १२ मीटर उंचीवर चिपळूण शहर वसले आहे. तरीही २००५ ची पूररेषा यापुढे कधीही ओलांडली जाणार नाही, असेच अनेकांना वाटत होते.

परंतु यावेळेस पावसाने हे सर्व अंदाज फोल ठरवले आणि होत्याचे नव्हते केले. चिपळूणच्या इतिहासात प्रथमच महापुराने एवढी मोठी उंची गाठली. आजपर्यंत कधीही न झालेले नुकसान या महापुरात अनुभवास आले. इतकी भीषणता व थरारक अनुभव अनेकांना पहिल्यांदाच आला. सह्याद्री खोऱ्यात २२ व २३ जुलै रोजी कमी कालावाधीत झालेली अतिवृष्टी व त्याच वेळी आलेली भरती हेच महापुराचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे.

कोयना व नवाजा परिसरात २२ जुलै रोजी ७७६ मिलिमीटर, तर दुसऱ्या दिवशी २३ जुलै रोजी ६१० मिलिमीटर इतका पाऊस पडला. त्याने चिपळुणात मोठ्या प्रमाणात पाणी भरले. महापुरात केवळ २ टक्के पाणी हे कोळकेवाडी धरणाचे होते. या कालावधीत चिपळूण परिसरात केवळ २०० मिलिमीटर इतकाच पाऊस झाला होता. तरीही चिपळूणवर एवढे मोठे संकट ओढवले.

वर्ष संपेल, पण या आठवणी संपणार नाहीत. केवळ चिपळूण, खेड आणि राजापूरच नाही तर अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यात सर्वच तालुक्यांना बसला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी