शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

Ratnagiri news: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प, अपेक्षित दर नसल्याने मच्छीमार निराश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:28 IST

कोकणासह राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता

रत्नागिरी : गेले काही दिवस समुद्र किनारच्या भागात वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प झाली आहे. दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढत असल्याने हे मच्छीमार समुद्रात न जाता किनारी नांगरावरच राहणे पसंत करत आहेत.कोकणासह राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून वातावरणात वारंवार बदल होत आहेत. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर, सकाळी आणि सायंकाळी किनारी भागात जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांची अडचण झाली आहे.वाऱ्यामुळे समुद्रात जाण्यासाठी छोट्या फायबर बोटींना इंधन अधिक लागते. त्या तुलनेत मासे मिळत नाहीत. त्यामुळे तोटा सहन करावा लागतो. खर्च करूनही जाळ्यात काहीच मिळत नसल्याने मच्छीमार बंदरावर थांबणेच पसंत करत आहेत. त्यामुळे मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अपेक्षित दर नाहीतमोठ्या मच्छिमारांना बांगडा मिळत असल्याने ७० ते ८० रुपये किलो दर मिळत आहे. तुलनेत गिलनेटने पकडून आणलेल्या बांगड्याला अर्धाच दर मिळतो. अपेक्षित दर मिळत नसल्याने गिलनेटवाले मच्छीमार निराश झाले आहेत. काही दिवसांपूर्वी म्हाकूळ मासा मोठ्या मच्छिमारांच्या जाळ्याला लागत आहे. सध्या त्याचा आकार छोटा असल्यामुळे त्याला दरही योग्य मिळत नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार