शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
3
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
4
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
5
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
10
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
11
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
12
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
13
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
14
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
15
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
16
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
17
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
18
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
19
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
20
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका

मासेमारी मंदावली, जाळी वाळविण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

रत्नागिरी : पर्ससीनवर बंदी असल्यामुळे केवळ पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असते. ...

रत्नागिरी : पर्ससीनवर बंदी असल्यामुळे केवळ पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असते. सध्या अवैध पर्ससीन मासेमारी सुरू असली तरी पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. मासे कमी उपलब्ध होत असल्याने नौकामालकांनी जाळी वाळविण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे.

दि. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी आदेश असल्याने दोन महिने मासेमारी बंद ठेवण्यात येते. पावसाळ्यात वादळी वारे व उसळणाऱ्या उंच लाटा, शिवाय माशांच्या प्रजननाचा कालावधी असल्याने मासेमारी शासकीय आदेशानुसार सक्तीने बंद ठेवण्यात येते. पावसाळ्यात वादळ, वारे याचा धोका असल्यामुळे नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावण्यात येतात. गेल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावण्यात आल्या होत्या. तेव्हापासून मासेमारी बंदच ठेवण्यात आली आहे.

पावसाळ्यामुळे नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावण्याचे काम सुरू झाल्याने सध्या किनाऱ्यावर लगबग सुरू झाली आहे. मासेमारी बंदसाठी सुरुवातीला असलेला ९० दिवसांचा कालावधी अधिक असल्यामुळे मच्छिमारी संघटनांकडून ९० दिवसांऐवजी ६० दिवसांच्या मासेमारी बंदीची मागणी करण्यात आल्याने बंदीचे दिवस कमी झाले आहेत. पर्ससीन बंदी अद्याप जारी आहे. शिवाय पावसाळ्यातील मासेमारी बंदीस अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत.

पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. मत्स्य उत्पादनात घट झाल्याने आर्थिक उलाढाल ठप्प आहे. बाजारात माशांची आवक मंदावली आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या नौकेला लागणारे इंधन, बर्फ, खलाशी पगार, शिवाय अन्य खर्चासाठी येणाऱ्या खर्चाच्या प्रमाणातही मासे मिळत नाहीत. त्यामुळे मच्छिमारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. काही मच्छिमारांनी नौका किनाऱ्यावर लावण्याबरोबर जाळ्या वाळविण्याचे काम सुरू केले आहे.

जाळ्यांच्या किमती लाखो रुपयांच्या घरात आहेत. समुद्राच्या खाऱ्या पाण्याने जाळी खराब होतात. शिवाय गाळात अडकून जाळी फाटतात. पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असल्यामुळे जाळ्या खराब होऊ नयेत यासाठी ती गोड्या पाण्याने स्वच्छ धुऊन वाळवून सुरक्षित ठेवण्यात येत आहेत.

खाडी किनाऱ्यावर कालवी व शिंपल्या काढून ते वाळविण्यात येत आहेत. मात्र, कोरोनामुळे नेहमीप्रमाणे होणारी गर्दी थांबली आहे. पावसाळ्यात मासे उपलब्ध होत नसल्यामुळे पर्यायी म्हणून वाळविलेल्या कालवी, शिंपल्याचा आहारात समावेश करीत असल्याने भरती - ओहोटीचा अंदाज घेत शिंपल्या, कालवी काढली जात आहेत.