शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

मासेमारी मंदावली, जाळी वाळविण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

रत्नागिरी : पर्ससीनवर बंदी असल्यामुळे केवळ पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असते. ...

रत्नागिरी : पर्ससीनवर बंदी असल्यामुळे केवळ पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असते. सध्या अवैध पर्ससीन मासेमारी सुरू असली तरी पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. मासे कमी उपलब्ध होत असल्याने नौकामालकांनी जाळी वाळविण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे.

दि. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी आदेश असल्याने दोन महिने मासेमारी बंद ठेवण्यात येते. पावसाळ्यात वादळी वारे व उसळणाऱ्या उंच लाटा, शिवाय माशांच्या प्रजननाचा कालावधी असल्याने मासेमारी शासकीय आदेशानुसार सक्तीने बंद ठेवण्यात येते. पावसाळ्यात वादळ, वारे याचा धोका असल्यामुळे नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावण्यात येतात. गेल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावण्यात आल्या होत्या. तेव्हापासून मासेमारी बंदच ठेवण्यात आली आहे.

पावसाळ्यामुळे नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावण्याचे काम सुरू झाल्याने सध्या किनाऱ्यावर लगबग सुरू झाली आहे. मासेमारी बंदसाठी सुरुवातीला असलेला ९० दिवसांचा कालावधी अधिक असल्यामुळे मच्छिमारी संघटनांकडून ९० दिवसांऐवजी ६० दिवसांच्या मासेमारी बंदीची मागणी करण्यात आल्याने बंदीचे दिवस कमी झाले आहेत. पर्ससीन बंदी अद्याप जारी आहे. शिवाय पावसाळ्यातील मासेमारी बंदीस अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत.

पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. मत्स्य उत्पादनात घट झाल्याने आर्थिक उलाढाल ठप्प आहे. बाजारात माशांची आवक मंदावली आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या नौकेला लागणारे इंधन, बर्फ, खलाशी पगार, शिवाय अन्य खर्चासाठी येणाऱ्या खर्चाच्या प्रमाणातही मासे मिळत नाहीत. त्यामुळे मच्छिमारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. काही मच्छिमारांनी नौका किनाऱ्यावर लावण्याबरोबर जाळ्या वाळविण्याचे काम सुरू केले आहे.

जाळ्यांच्या किमती लाखो रुपयांच्या घरात आहेत. समुद्राच्या खाऱ्या पाण्याने जाळी खराब होतात. शिवाय गाळात अडकून जाळी फाटतात. पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असल्यामुळे जाळ्या खराब होऊ नयेत यासाठी ती गोड्या पाण्याने स्वच्छ धुऊन वाळवून सुरक्षित ठेवण्यात येत आहेत.

खाडी किनाऱ्यावर कालवी व शिंपल्या काढून ते वाळविण्यात येत आहेत. मात्र, कोरोनामुळे नेहमीप्रमाणे होणारी गर्दी थांबली आहे. पावसाळ्यात मासे उपलब्ध होत नसल्यामुळे पर्यायी म्हणून वाळविलेल्या कालवी, शिंपल्याचा आहारात समावेश करीत असल्याने भरती - ओहोटीचा अंदाज घेत शिंपल्या, कालवी काढली जात आहेत.