शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रत्नागिरीच्या समुद्रात मासेमारी नौका बुडाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 16:40 IST

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात नौका नेणे धोक्याचे बनले आहे.

रत्नागिरी : येथील राजिवडा परिसरातील फणसोपकर यांची अलीना नामक मासेमारी नौका रत्नदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात  मासेमारी करत असताना बुडाल्याची घटना आज पहाटे ४ वाजता घडली. या दुर्घटनेत रामचंद्र केशव पवार (वय ६५, रा. सोमेश्वर-बौद्धवाडी, ता. रत्नागिरी) हे बेपत्ता झाले आहेत. मत्स्य खाते आणि कोस्टगार्ड यांच्यातर्फे त्यांचा शोध सुरू आहे.

नारळी पौर्णिमेला मासेमारीला काही अंशी सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात नौका नेणे धोक्याचे बनले आहे. राजीवडा येथील फणसोपकर यांच्या मालकीची 'आयएनडी-एमएच-४-एमएम - २२८५' या क्रमांकाची अलीना नावाची नौका १४ ऑगस्ट सोजी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्याने मासेमारीसाठी गेली होती. या नौकेवर आसिफ जाफर जांभारकर हे तांडेल होते.

मासेमारीसाठी किल्ल्यासमोर ८ फॅदम ( वाव ) खोल समुद्रात जाळे टाकण्यात आले होते. त्याचवेळी पाण्याच्या तीव्र प्रवाहाने नौका किल्ला किनारी वाहून आली. योग्य वेळी नौकेचे इंजिन सुरू न झाल्याने नौका खडकावर आदळली. त्यात नौकेचे तुकडे-तुकडे झाले. त्यानंतर नौकेचे काही भाग किनाऱ्याला आले होते.  हे भाग किनाऱ्यावरील ग्रामस्थांना दिसल्यानंतर या घटनेची माहिती कळली. 

यामध्ये रेहबर उमर जांभारकर (रा. पडवे), विकास रामप्रकाश चौधरी, आसिफ जाफर जांभारकर, मुश्ताक अली भाटकर (तिघे राहणार राजीवडा) हे जखमी झाले. या सर्वांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रेहबर याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. अन्य तिघांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, या नौकेवरील रामचंद्र केशव पवार हे बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोस्टगार्डच्या मदतीने समुद्रात शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या दुर्घटनेबाबत रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी