शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लाेट्यात पुन्हा सांडपाणी साेडल्याने नाल्यातील मासे मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

आवाशी : लाेटे-परशुराम (ता. खेड) औद्याेगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी साेडण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही़ पीरलाेटे येथे साेमवारी पुन्हा सांडपाणी ...

आवाशी : लाेटे-परशुराम (ता. खेड) औद्याेगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी साेडण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही़ पीरलाेटे येथे साेमवारी पुन्हा सांडपाणी साेडण्यात आल्याने नाल्यातील मासे मृत झाल्याची घटना घडली.

लाेटे-परशुराम येथील रासायनिक उद्याेग वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्सेस कंपनीच्या मागील बाजूने वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यात कुणी अज्ञाताने रासायनिक सांडपाणी साेडल्याने नाल्यातील विविध जातीचे मासे मृत झाल्याची घटना ग्रामस्थांनी उघडकीस आणली आहे. सुप्रिया कंपनीच्या मागील बाजूस असणारा केतकीचा पऱ्या हा पीरलाेटे गावठण वाडीतून पूर्वेकडे असणाऱ्या चिरणी गावच्या नदीला जाताे. पुढे हाच पऱ्या आंबडसमार्गे वाशिष्टी नदीच्या पात्रात मिसळताे. रविवारी रात्री याच पऱ्याला अज्ञात कंपनीने रासायनिक सांडपाणी साेडल्याने पऱ्यातील विविध जातीचे मासे मृत झाल्याची घटना येथील ग्रामस्थ जनार्दन चाळके, विलास आंब्रे, नितीन चाळके व अन्य ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा केतकीचा पऱ्या पीरलाेटे गावठण क्षेत्रातून भरवस्तीतून बारमाही वाहत असताे. गेले दाेन दिवस पावसाचा जाेर कमी असल्याने त्याचा प्रवाह मंद गतीने सुरू आहे. साेमवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान या पऱ्याच्या किनाऱ्याला मृत मासे दिसले. खरंतर या भागात सुप्रिया कंपनीव्यतिरिक्त दुसरी काेणतीही कंपनी नाल्यालागत नाही. त्यामुळे याच कंपनीने रासायनिक सांडपाण्याचा निचरा केला असावा, अशी शक्यता असल्याचे सांगितले़

-------------------

एमपीसीबीवर विश्वास नाही

या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली आहेत का? अशी विचारणा केली असता, एमपीसीबीचे काम किती विश्वासदर्शक व पारदर्शक आहे हे संपूर्ण पंचक्राेशीला माहीत आहे. त्यांना जर का? कळविले तर ते नेहमीप्रमाणे नमुने घेणार लगतच्या कंपनीत जाणार आणि अखेर त्याचा अहवाल निरंक येणार हे नेहमीचेच आहे. त्यामुळे ठाेस अशी कारवाई त्यांच्याकडून कधी हाेतच नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

------------------------------

कारवाई हाेतच नाही

दाेन वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला रासायनिक पाणी याच भागातील वाड्यातून आले हाेते. त्यावेळी संंबंधित ग्रामपंचायतीने एमपीसीबीला याचा शाेध घेण्यासाठी कळविले हाेते. मात्र, आज इतकी वर्षे उलटूनही संबंधित कंपनीचे नाव उघड हाेऊ शकला नाही वा त्यावर काहीच कारवाई नाही. हे या आजच्या घटनेने समाेर आले आहे.

---------------------

किती वर्ष त्रास सहन करायचा

वसाहतीतील हर्डेलिया कंपनीच्या माेकळ्या जागेतून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात मिसळलेले रासायनिक सांडपाणी पिऊन गुणदे तलारीवाडी येथील शेतकरी यशवंत आखाडे यांच्या चार म्हशी दगावल्या हाेत्या तर सहा म्हशी गंभीर अवस्थेत पडल्या. ही घटना ताजी असतानाच मासे मरण्याची घटना पुन्हा समाेर येत आहे. सांडपाण्याचा त्रास किती वर्षे सहन करावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़