शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

लाेट्यात पुन्हा सांडपाणी साेडल्याने नाल्यातील मासे मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

आवाशी : लाेटे-परशुराम (ता. खेड) औद्याेगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी साेडण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही़ पीरलाेटे येथे साेमवारी पुन्हा सांडपाणी ...

आवाशी : लाेटे-परशुराम (ता. खेड) औद्याेगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी साेडण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही़ पीरलाेटे येथे साेमवारी पुन्हा सांडपाणी साेडण्यात आल्याने नाल्यातील मासे मृत झाल्याची घटना घडली.

लाेटे-परशुराम येथील रासायनिक उद्याेग वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्सेस कंपनीच्या मागील बाजूने वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यात कुणी अज्ञाताने रासायनिक सांडपाणी साेडल्याने नाल्यातील विविध जातीचे मासे मृत झाल्याची घटना ग्रामस्थांनी उघडकीस आणली आहे. सुप्रिया कंपनीच्या मागील बाजूस असणारा केतकीचा पऱ्या हा पीरलाेटे गावठण वाडीतून पूर्वेकडे असणाऱ्या चिरणी गावच्या नदीला जाताे. पुढे हाच पऱ्या आंबडसमार्गे वाशिष्टी नदीच्या पात्रात मिसळताे. रविवारी रात्री याच पऱ्याला अज्ञात कंपनीने रासायनिक सांडपाणी साेडल्याने पऱ्यातील विविध जातीचे मासे मृत झाल्याची घटना येथील ग्रामस्थ जनार्दन चाळके, विलास आंब्रे, नितीन चाळके व अन्य ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा केतकीचा पऱ्या पीरलाेटे गावठण क्षेत्रातून भरवस्तीतून बारमाही वाहत असताे. गेले दाेन दिवस पावसाचा जाेर कमी असल्याने त्याचा प्रवाह मंद गतीने सुरू आहे. साेमवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान या पऱ्याच्या किनाऱ्याला मृत मासे दिसले. खरंतर या भागात सुप्रिया कंपनीव्यतिरिक्त दुसरी काेणतीही कंपनी नाल्यालागत नाही. त्यामुळे याच कंपनीने रासायनिक सांडपाण्याचा निचरा केला असावा, अशी शक्यता असल्याचे सांगितले़

-------------------

एमपीसीबीवर विश्वास नाही

या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली आहेत का? अशी विचारणा केली असता, एमपीसीबीचे काम किती विश्वासदर्शक व पारदर्शक आहे हे संपूर्ण पंचक्राेशीला माहीत आहे. त्यांना जर का? कळविले तर ते नेहमीप्रमाणे नमुने घेणार लगतच्या कंपनीत जाणार आणि अखेर त्याचा अहवाल निरंक येणार हे नेहमीचेच आहे. त्यामुळे ठाेस अशी कारवाई त्यांच्याकडून कधी हाेतच नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

------------------------------

कारवाई हाेतच नाही

दाेन वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला रासायनिक पाणी याच भागातील वाड्यातून आले हाेते. त्यावेळी संंबंधित ग्रामपंचायतीने एमपीसीबीला याचा शाेध घेण्यासाठी कळविले हाेते. मात्र, आज इतकी वर्षे उलटूनही संबंधित कंपनीचे नाव उघड हाेऊ शकला नाही वा त्यावर काहीच कारवाई नाही. हे या आजच्या घटनेने समाेर आले आहे.

---------------------

किती वर्ष त्रास सहन करायचा

वसाहतीतील हर्डेलिया कंपनीच्या माेकळ्या जागेतून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात मिसळलेले रासायनिक सांडपाणी पिऊन गुणदे तलारीवाडी येथील शेतकरी यशवंत आखाडे यांच्या चार म्हशी दगावल्या हाेत्या तर सहा म्हशी गंभीर अवस्थेत पडल्या. ही घटना ताजी असतानाच मासे मरण्याची घटना पुन्हा समाेर येत आहे. सांडपाण्याचा त्रास किती वर्षे सहन करावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़