शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

..अखेर ११ तासानंतर बिबट्याची विहीरीतून सुटका, रत्नागिरी वनविभागाच्या पथकाची यशस्वी कामगिरी  

By शोभना कांबळे | Updated: February 7, 2024 16:53 IST

रत्नागिरी : करंजारी (ता. संगमेश्वर) येथे मंगळवारी विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुमारे ११ तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात रत्नागिरी ...

रत्नागिरी : करंजारी (ता. संगमेश्वर) येथे मंगळवारी विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुमारे ११ तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात रत्नागिरी वन विभागाला अखेर यश आले.करंजारी (ता. संगमेश्वर) येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या विलास तुळशीराम बेर्डे यांच्या विहिरीत भक्ष्याचा पाठलाग करीत आलेला बिबट्या विहिरीत पडला. बेर्डे यांच्या कुत्र्यामुळे विहिरीत काही तरी पडल्याचे लक्षात आले. बेर्डे यांनी जवळ जाऊन बघितले असता, बिबट्या पडल्याचे दिसले. त्यांनी संगमेश्वरचे वनपाल तौफिक मुल्ला यांना याबाबत माहिती दिली. तातडीने वनविभागाची रेस्कू टीम करंजारीत दाखल झाली.विलास बेर्डे यांच्या घरासमोर सुमारे ४० फूट खोल, गोलाई १४ फूट व चिरेबंदी आणि कठडा ४ फूट असलेल्या या विहिरीत हा बिबट्या पाण्याच्या वरच्या बाजूला कपारीत बसला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडला. दुपारी १२ वाजेपर्यंत बिबट्या पिंजऱ्यात न आल्याने पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवून पुन्हा विहिरीत सोडण्यात आला. परंतु सायंकाळी ५ वाजेपर्यंत बिबट्या पिंजऱ्यात आला नाही. अखेर टँकरच्या सहाय्याने विहिरीत पाणी सोडून पाण्याची पातळी वाढविण्यात आली. अखेर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षित आला, आणि उपस्थित वनविभागाच्या पथकाने आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.हा नर जातीचा बिबट्या साधारणत: चार वर्षाचाआहे. संगमेश्वरचे पशुसंवर्धन अधिकारी आनंद कदम यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली असता बिबट्या सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रत्नागिरीचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.या सुरक्षित बचाव मोहिमेसाठी रत्नागिरीचे वन क्षेत्रपाल प्रकाश सुतार, संगमेश्वरचे वनपाल तौफिक मुल्ला, पालीचे वनपाल एन. एस. गावडे,दाभोळेचे वनरक्षक अरुण माळी, फुणगुसचे वनरक्षक राजाराम पाटील, साखरप्याचे वनरक्षक सहयोग कराडे, रत्नागिरीचे वनरक्षक प्रभू साबणे, तपासणी नाकार साखरपा वनरक्षक सुरज तेली, करंजारीच्या पोलीस पाटील समीक्षा शेणवी, साखरप्याचे उपसरपंच ओंकार कोलते, नाणिजचे माजी सरपंच गौरव संसारे, पत्रकार राजन बोडेकर, यश कोळवणकर, निरंजन हेगिष्टे , अनिकेत मोरे, अरबाज वाडकर , जितेंद्र गजबार, दिलीप साबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याforest departmentवनविभाग