शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
4
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
5
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
6
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
7
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
8
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
9
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
10
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
11
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
12
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
13
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
14
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
15
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
16
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
18
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
19
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
20
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी जमीन खरेदी-विक्री संबंधी ८ गावांतील ३५ तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:32 IST

राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प परिसरातील गावांमध्ये जमिनींच्या झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारासंबंधित शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनातर्फे पार पडलेल्या चौकशीमध्ये एकूण ...

राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प परिसरातील गावांमध्ये जमिनींच्या झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारासंबंधित शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनातर्फे पार पडलेल्या चौकशीमध्ये एकूण ८ गावातूंन ६३ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये साखर गावातून सर्वाधिक ३५ तक्रारींचा सामावेश आहे तर सहा गावांतून एकही तक्रार दाखल झालेली नाही.

शासनाच्या निर्देशानुसार ३१ मार्चपर्यंत तक्रारी नोंदविण्याबाबत जमीन मालक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांतर्गत जमिनींच्या खरेदी - विक्री व्यवहार प्रकरणात परप्रांतीय जमीन खरेदीदारांकडून मूळ जमीन मालक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे जोरदार आरोप करण्यात आले हाेते. त्यानुसार शासनाने रिफायनरी प्रकल्पांतर्गत झालेल्या व्यवहारप्रकरणी आर्थिक फसवणूक झालेल्या स्थानिक जमीन मालक शेतकऱ्यांना तक्रारी नोंदविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी प्रांत कार्यालयासह संबंधित तलाठी सजांमध्ये तक्रार स्वीकृती कक्ष स्थापन केले होते. त्यानुसार तक्रारी दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

३१ मार्चपर्यंत तक्रारींसाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार रिफायनरी प्रकल्प क्षेत्रातील एकूण १४ गावांपैकी आठ गावांमधून एकूण ६३ तक्रारींची नोंद झाली आहे. शासनाने नाणार परिसरातील जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. बुधवारी (३१ मार्च) चौकशीची मुदत संपली. त्यानुसार प्रकल्प परिसरातील चौदा गावांपैकी आठ गावांतून ६३ तक्रारींची नोंद झाली आहे, अशी माहिती येथील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

चाैकट

त्यामध्ये सर्वाधिक ३५ तक्रारी साखर गावातून नोंदविण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त विलये ६,चौके २, उपळे ७, तारळ ७, कात्रादेवी ३, नाणार १, गोठीवरे २ यांचा समावेश आहे. तर कार्शिंगेवाडी दत्तवाडी, पाळेकरवाडी, पडवे, कारिवणे, सागवे अशा सहा गावांतून एकाही तक्रारीची नोंद झालेली नाही.