शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

रिफायनरी जमीन खरेदी-विक्री संबंधी ८ गावांतील ३५ तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:32 IST

राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प परिसरातील गावांमध्ये जमिनींच्या झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारासंबंधित शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनातर्फे पार पडलेल्या चौकशीमध्ये एकूण ...

राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प परिसरातील गावांमध्ये जमिनींच्या झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारासंबंधित शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनातर्फे पार पडलेल्या चौकशीमध्ये एकूण ८ गावातूंन ६३ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये साखर गावातून सर्वाधिक ३५ तक्रारींचा सामावेश आहे तर सहा गावांतून एकही तक्रार दाखल झालेली नाही.

शासनाच्या निर्देशानुसार ३१ मार्चपर्यंत तक्रारी नोंदविण्याबाबत जमीन मालक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांतर्गत जमिनींच्या खरेदी - विक्री व्यवहार प्रकरणात परप्रांतीय जमीन खरेदीदारांकडून मूळ जमीन मालक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे जोरदार आरोप करण्यात आले हाेते. त्यानुसार शासनाने रिफायनरी प्रकल्पांतर्गत झालेल्या व्यवहारप्रकरणी आर्थिक फसवणूक झालेल्या स्थानिक जमीन मालक शेतकऱ्यांना तक्रारी नोंदविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी प्रांत कार्यालयासह संबंधित तलाठी सजांमध्ये तक्रार स्वीकृती कक्ष स्थापन केले होते. त्यानुसार तक्रारी दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

३१ मार्चपर्यंत तक्रारींसाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार रिफायनरी प्रकल्प क्षेत्रातील एकूण १४ गावांपैकी आठ गावांमधून एकूण ६३ तक्रारींची नोंद झाली आहे. शासनाने नाणार परिसरातील जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. बुधवारी (३१ मार्च) चौकशीची मुदत संपली. त्यानुसार प्रकल्प परिसरातील चौदा गावांपैकी आठ गावांतून ६३ तक्रारींची नोंद झाली आहे, अशी माहिती येथील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

चाैकट

त्यामध्ये सर्वाधिक ३५ तक्रारी साखर गावातून नोंदविण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त विलये ६,चौके २, उपळे ७, तारळ ७, कात्रादेवी ३, नाणार १, गोठीवरे २ यांचा समावेश आहे. तर कार्शिंगेवाडी दत्तवाडी, पाळेकरवाडी, पडवे, कारिवणे, सागवे अशा सहा गावांतून एकाही तक्रारीची नोंद झालेली नाही.