शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

पन्नास संस्था अवसायनात?

By admin | Updated: October 8, 2015 00:30 IST

रोहिदास बांगर : दापोलीत संस्था सर्वेक्षणाची मोहीम

दापोली : राज्य सहकार विभागामार्फत राज्यभर १ जुलै ते ३० सप्टेंबर कालावधीत संस्था सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत दापोलीत ३१ मार्च २०१५पर्यंत १८४ संस्था नोंदणीकृत होत्या. सर्वेक्षणामध्ये यापैकी ५० संस्थांचे कामकाज बंद असल्याचे निदर्शनास आले असून, १३४ संस्था कार्यरत आहेत. कामकाज बंद असलेल्या संस्थांवरील व्यक्तींनी संस्था सुरू ठेवण्यासाठी त्वरित हालचाल न केल्यास या संस्था डिसेंबरपर्यंत अवसायनात काढण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर यांनी दिली.सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर, निबंधकांच्या सहाय्यक वेदा मयेकर, लेखा परीक्षक एस. बी. पाटील यांनी प्रत्यक्ष संस्थेत जाऊन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये ४ संस्थांचे कार्य स्थगित आढळून आले. यामध्ये महालक्ष्मी औद्योगिक संस्था हर्णै, जिजाऊ औद्योगिक संस्था, श्री स्वामी समर्थ फलोत्पादन संस्था आणि जिजाऊ कृषी विकास संस्था, दापोली यांचा समावेश आहे. १२ संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळलेल्या नाहीत. यामध्ये औद्योगिक-निवेदिता, जिजामाता, कोकणरत्न, कोकण खनिकर्म औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था दापोली, पाणीवापर संस्था-सोमेश्वर, पाणीवापर संस्था पालगड, मापावली पाणीवापर संस्था, माटवण तर इतर संस्थांमध्ये कोकण विकास स्वयंरोजगार, युगंधरा स्वयंरोजगार, हर्णै-पाज परिसर विकास स्वयंरोजगार, पंचम स्वयंरोजगार, सुवर्णदूर्ग कृषी व ग्रामीण पर्यटन संस्था आणि कोकण भूमी कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी संस्था, दापोलीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ३४ संस्थांकडून कोणत्याही प्रकारचे अहवाल सहकार निबंधक कार्यालयाकडे प्राप्त होत नसल्याने एकूण ५० संस्थांना टाळे लागणार आहे. पूर्ण क्षमतेने कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये १३४ संस्थांचा समावेश असल्याची माहिती बांगर यांनी दिली.यामध्ये विकास संस्था-४१, बँक-१, पतसंस्था-२६, कर्मचारी पतसंस्था-२, खरेदी-विक्री संघ-१, कृषी प्रक्रिया उद्योग संस्था-२, पणन संस्था-२, बलुतेदार संघ-१, मजूर संस्था-४, ग्राहक संस्था-४, औद्योगिक संस्था-३, पाणीवाटप व वापर संस्था-१, गृहनिर्माण संस्था-३३ आणि उर्वरीत इतर संस्थांचा समावेश आहे. कार्यस्थगित, नोंदणीकृत पत्त्यावर नसलेल्या संस्था आणि कोणत्याही स्वरूपाचे अहवाल नसलेल्या अशा एकूण ५० संस्थांपैकी ज्या संस्थांना कार्यप्रवण होऊन संस्था जिवीत ठेवायची असेल त्यांनी कृती कार्यक्रमाची रूपरेखा आखून ३१ आॅक्टोबरपूर्वी निबंधक कार्यालयाकडे अहवाल सादर करणे अपेक्षित आहे, असे निबंधक रोहिदास बांगर यांनी सांगितले आहे.कृती अहवाल समाधानकारक वाटल्यास या संस्था पुन्हा उभ्या राहू शकतात. अन्यथा ३१ डिसेंबरपर्यंत या संस्थांनी कोणत्याही स्वरूपाच्या कार्यप्रवण रहाण्याच्या दृष्टीने हालचाली न केल्यास येत्या ३१ डिसेंबरपर्यंत या संस्था अवसायनात काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे बांगर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)डिसेंबरपर्यंत कार्यवाही...संस्था काढताना पदाधिकारी ज्या पध्दतीने काम करतात, तेवढाच वेग त्यानंतर राहत नाही. त्यामुळे संस्थांच्या कामकाजात सातत्य राहत नाही. अनेक संस्था मूळ उद्देशापासून भरकटत जातात तर काही संस्था तुटून जातात. त्यानंतर त्यांना कोणीच वाली उरत नाही. रत्नागिरी जिल्ह््यातील अनेक संस्थांची अशीच स्थिती आहे. त्यामुळे या संस्था आता खरोखरच अवसायनात काढण्याची वेळ आली आहे. दापोलीत सहाय्यक निबंधक कार्यालयाने त्याविरूध्द मोहीम सुरु केली आहे.