शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास संस्था अवसायनात?

By admin | Updated: October 8, 2015 00:30 IST

रोहिदास बांगर : दापोलीत संस्था सर्वेक्षणाची मोहीम

दापोली : राज्य सहकार विभागामार्फत राज्यभर १ जुलै ते ३० सप्टेंबर कालावधीत संस्था सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत दापोलीत ३१ मार्च २०१५पर्यंत १८४ संस्था नोंदणीकृत होत्या. सर्वेक्षणामध्ये यापैकी ५० संस्थांचे कामकाज बंद असल्याचे निदर्शनास आले असून, १३४ संस्था कार्यरत आहेत. कामकाज बंद असलेल्या संस्थांवरील व्यक्तींनी संस्था सुरू ठेवण्यासाठी त्वरित हालचाल न केल्यास या संस्था डिसेंबरपर्यंत अवसायनात काढण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर यांनी दिली.सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर, निबंधकांच्या सहाय्यक वेदा मयेकर, लेखा परीक्षक एस. बी. पाटील यांनी प्रत्यक्ष संस्थेत जाऊन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये ४ संस्थांचे कार्य स्थगित आढळून आले. यामध्ये महालक्ष्मी औद्योगिक संस्था हर्णै, जिजाऊ औद्योगिक संस्था, श्री स्वामी समर्थ फलोत्पादन संस्था आणि जिजाऊ कृषी विकास संस्था, दापोली यांचा समावेश आहे. १२ संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळलेल्या नाहीत. यामध्ये औद्योगिक-निवेदिता, जिजामाता, कोकणरत्न, कोकण खनिकर्म औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था दापोली, पाणीवापर संस्था-सोमेश्वर, पाणीवापर संस्था पालगड, मापावली पाणीवापर संस्था, माटवण तर इतर संस्थांमध्ये कोकण विकास स्वयंरोजगार, युगंधरा स्वयंरोजगार, हर्णै-पाज परिसर विकास स्वयंरोजगार, पंचम स्वयंरोजगार, सुवर्णदूर्ग कृषी व ग्रामीण पर्यटन संस्था आणि कोकण भूमी कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी संस्था, दापोलीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ३४ संस्थांकडून कोणत्याही प्रकारचे अहवाल सहकार निबंधक कार्यालयाकडे प्राप्त होत नसल्याने एकूण ५० संस्थांना टाळे लागणार आहे. पूर्ण क्षमतेने कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये १३४ संस्थांचा समावेश असल्याची माहिती बांगर यांनी दिली.यामध्ये विकास संस्था-४१, बँक-१, पतसंस्था-२६, कर्मचारी पतसंस्था-२, खरेदी-विक्री संघ-१, कृषी प्रक्रिया उद्योग संस्था-२, पणन संस्था-२, बलुतेदार संघ-१, मजूर संस्था-४, ग्राहक संस्था-४, औद्योगिक संस्था-३, पाणीवाटप व वापर संस्था-१, गृहनिर्माण संस्था-३३ आणि उर्वरीत इतर संस्थांचा समावेश आहे. कार्यस्थगित, नोंदणीकृत पत्त्यावर नसलेल्या संस्था आणि कोणत्याही स्वरूपाचे अहवाल नसलेल्या अशा एकूण ५० संस्थांपैकी ज्या संस्थांना कार्यप्रवण होऊन संस्था जिवीत ठेवायची असेल त्यांनी कृती कार्यक्रमाची रूपरेखा आखून ३१ आॅक्टोबरपूर्वी निबंधक कार्यालयाकडे अहवाल सादर करणे अपेक्षित आहे, असे निबंधक रोहिदास बांगर यांनी सांगितले आहे.कृती अहवाल समाधानकारक वाटल्यास या संस्था पुन्हा उभ्या राहू शकतात. अन्यथा ३१ डिसेंबरपर्यंत या संस्थांनी कोणत्याही स्वरूपाच्या कार्यप्रवण रहाण्याच्या दृष्टीने हालचाली न केल्यास येत्या ३१ डिसेंबरपर्यंत या संस्था अवसायनात काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे बांगर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)डिसेंबरपर्यंत कार्यवाही...संस्था काढताना पदाधिकारी ज्या पध्दतीने काम करतात, तेवढाच वेग त्यानंतर राहत नाही. त्यामुळे संस्थांच्या कामकाजात सातत्य राहत नाही. अनेक संस्था मूळ उद्देशापासून भरकटत जातात तर काही संस्था तुटून जातात. त्यानंतर त्यांना कोणीच वाली उरत नाही. रत्नागिरी जिल्ह््यातील अनेक संस्थांची अशीच स्थिती आहे. त्यामुळे या संस्था आता खरोखरच अवसायनात काढण्याची वेळ आली आहे. दापोलीत सहाय्यक निबंधक कार्यालयाने त्याविरूध्द मोहीम सुरु केली आहे.