शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पंधरा वर्षांचा संसार वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

रत्नागिरी : ईदच्या आनंदात महापुराचे संकट येणार असल्याची पुसटशी कल्पनाही नव्हती. गुरूवारी पहाटे आलेल्या पुरामध्ये पंधरा वर्षांचा माझा संसार ...

रत्नागिरी : ईदच्या आनंदात महापुराचे संकट येणार असल्याची पुसटशी कल्पनाही नव्हती. गुरूवारी पहाटे आलेल्या पुरामध्ये पंधरा वर्षांचा माझा संसार वाहून गेला आहे. फक्त मी मुलांना वाचवू शकले, एवढीच गोष्ट माझ्यासाठी मोठी असल्याचे सांगून नजराणा मेहबूब मुजावर (रा. शंकरवाडी, चिपळूण) यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

नजराणा या चार मुलांसमवेत गेली १५ वर्षे चिपळूण येथे राहतात. गुरूवारी पहाटे फज्रचा नमाज झाला. घरातील कामे उरकत असतानाच पाण्याचा आवाज आला. आजूबाजूला जोरदार आरडाओरडा सुरू झाली. मुले तर झोपलेलीच होती. काही क्षणात घरात पाणी आले, प्रसंगावधान राखून मुलांच्या मदतीने फ्रीज काढून जेमतेम बेडवर ठेवला. तोपर्यंत शेजारचे शिंदे काका धावत आले. मुलांना घेऊन बाहेर पडा सांगताच मी मुलांना घेऊन बाहेर पडले. रस्त्यावर आलो तोपर्यंत छातीएवढं पाणी होतं. पाण्यातून चार मुलांना घेऊन जाताना रस्त्यालगतच गणेश गोंधळेकर यांच्या इमारतीचे काम सुरू होते तेथील कामगारांनी आम्हाला पाहिलं, त्यांनी मदत करून गोंधळेकर यांच्या इमारतीच्या गच्चीवर नेलं. तेथे माझ्यासारखीच दोन अन्य कुटुंब थांबली होती. इमारतीचे दोन्ही मजले पाण्याखाली होते. इमारतीच्या चहूबाजूला पाणी असल्याने घाटगे यांनी दोरी बांधून त्याव्दारे एका भांड्यात खिचडी व पाण्याच्या बाटल्या एका पिशवीतून आम्हाला पाठवल्या. चारही मुलांना जवळ घेऊन कशीतरी आम्ही तीन कुटुंबांनी रात्र काढली.

वीज पुरवठा तर बंदच होता. मात्र, मोबाईलला रेंज येत-जात होती. रेंज आली तर नातेवाईकांचा फोन यायचा, खुशाली विचारायचे, मात्र रेंज गेली की, फोन कट व्हायचा. माझी मैत्रीण शगुफ्ता हिने फोन करून मला धीर दिला, घाबरू नकोस, पाणी कमी झालं की, कुणाच्या तरी मदतीने माझ्या घरी ये, असे सांगितले. शुक्रवारी सकाळी पाण्याची पातळी ओसरल्यानंतर मुलांना कवटाळून शगुफ्ताच्या घरची वाट धरली. पाणी ओसरलं असलं तरी सर्वत्र चिखल साचला आहे. गेल्या १५ वर्षांचा संसारच वाहून गेला आहे.