शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पंधरा वर्षांचा संसार वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

रत्नागिरी : ईदच्या आनंदात महापुराचे संकट येणार असल्याची पुसटशी कल्पनाही नव्हती. गुरूवारी पहाटे आलेल्या पुरामध्ये पंधरा वर्षांचा माझा संसार ...

रत्नागिरी : ईदच्या आनंदात महापुराचे संकट येणार असल्याची पुसटशी कल्पनाही नव्हती. गुरूवारी पहाटे आलेल्या पुरामध्ये पंधरा वर्षांचा माझा संसार वाहून गेला आहे. फक्त मी मुलांना वाचवू शकले, एवढीच गोष्ट माझ्यासाठी मोठी असल्याचे सांगून नजराणा मेहबूब मुजावर (रा. शंकरवाडी, चिपळूण) यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

नजराणा या चार मुलांसमवेत गेली १५ वर्षे चिपळूण येथे राहतात. गुरूवारी पहाटे फज्रचा नमाज झाला. घरातील कामे उरकत असतानाच पाण्याचा आवाज आला. आजूबाजूला जोरदार आरडाओरडा सुरू झाली. मुले तर झोपलेलीच होती. काही क्षणात घरात पाणी आले, प्रसंगावधान राखून मुलांच्या मदतीने फ्रीज काढून जेमतेम बेडवर ठेवला. तोपर्यंत शेजारचे शिंदे काका धावत आले. मुलांना घेऊन बाहेर पडा सांगताच मी मुलांना घेऊन बाहेर पडले. रस्त्यावर आलो तोपर्यंत छातीएवढं पाणी होतं. पाण्यातून चार मुलांना घेऊन जाताना रस्त्यालगतच गणेश गोंधळेकर यांच्या इमारतीचे काम सुरू होते तेथील कामगारांनी आम्हाला पाहिलं, त्यांनी मदत करून गोंधळेकर यांच्या इमारतीच्या गच्चीवर नेलं. तेथे माझ्यासारखीच दोन अन्य कुटुंब थांबली होती. इमारतीचे दोन्ही मजले पाण्याखाली होते. इमारतीच्या चहूबाजूला पाणी असल्याने घाटगे यांनी दोरी बांधून त्याव्दारे एका भांड्यात खिचडी व पाण्याच्या बाटल्या एका पिशवीतून आम्हाला पाठवल्या. चारही मुलांना जवळ घेऊन कशीतरी आम्ही तीन कुटुंबांनी रात्र काढली.

वीज पुरवठा तर बंदच होता. मात्र, मोबाईलला रेंज येत-जात होती. रेंज आली तर नातेवाईकांचा फोन यायचा, खुशाली विचारायचे, मात्र रेंज गेली की, फोन कट व्हायचा. माझी मैत्रीण शगुफ्ता हिने फोन करून मला धीर दिला, घाबरू नकोस, पाणी कमी झालं की, कुणाच्या तरी मदतीने माझ्या घरी ये, असे सांगितले. शुक्रवारी सकाळी पाण्याची पातळी ओसरल्यानंतर मुलांना कवटाळून शगुफ्ताच्या घरची वाट धरली. पाणी ओसरलं असलं तरी सर्वत्र चिखल साचला आहे. गेल्या १५ वर्षांचा संसारच वाहून गेला आहे.