शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

जिल्ह्यातून डेंग्यूचे भय लवकरच संपणार, संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 14:38 IST

dengue, health, ratnagirinews राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाबरोबरच डेंग्यूच्या साथीने थैमान घातलेले असताना रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूच्या तापाचे प्रमाण अत्यल्प आहे. वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात डेंग्यूचे केवळ २१ रुग्ण आढळले असून, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता डेंग्यूची भीती राहिलेली नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यातून डेंग्यूचे भय लवकरच संपणार, संख्येत घटजिल्ह्यात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण शून्य

रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाबरोबरच डेंग्यूच्या साथीने थैमान घातलेले असताना रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूच्या तापाचे प्रमाण अत्यल्प आहे. वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात डेंग्यूचे केवळ २१ रुग्ण आढळले असून, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता डेंग्यूची भीती राहिलेली नाही.जिल्हा अजूनही कोरोनातून भयमुक्त झालेला नाही. मात्र, डेंग्यूची भीती कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप विभागाकडून मोठ्या प्रमाणात डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून डेंग्यूच्या निर्मूलनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करुन त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.जिल्ह्यात सन २०१९मध्ये डेंग्यूचे २२९ रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाकडून त्या रुग्णांवर वेळीच उपचार केल्याने एकही रुग्ण दगावला नव्हता. त्यानंतर चालू वर्षात जानेवारी २०२०पासून आतापर्यंत जिल्ह्यात ८० संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी २१ डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.

यामध्ये दापोलीमध्ये ८ रुग्ण, संगमेश्वरात २, रत्नागिरीत ७, लांजात १ आणि राजापुरातील ३ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये स्थानिक १२ रुग्ण आणि स्थलांतरित ९ रुग्ण आहेत. यावर्षीही डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण शून्य आहे.डेंग्यू हा एडीस् इजिटी या डासापासून होतो. डेंग्यू तापाकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. यासाठी गप्पी माशांची पैदास केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्याचाही खूप उपयोग होत आहे.डेंग्यूची लक्षणेअचानक जोराचा ताप येणे, डोक्याचा पुढचा भाग खूप दुखणे, डोळ्याच्या मागील भागात वेदना होणे, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होणे, छाती आणि त्यावर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या होणे, त्वचेवर व्रण उठणे.खासगी रूग्णालयांतून डेंग्यू रूग्णांची माहिती मिळते का?जिल्ह्यात डास निर्मूलनाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच डेंग्यूच्या रुग्णांबाबत खासगी रुग्णालयांनाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या खासगी रुग्णालयामध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास या रुग्णालयाकडून तत्काळ आरोग्य विभागाला रुग्णाबद्दलची माहिती कळविण्यात येते.

जिल्ह्यात इकोफ्रेन्डली डास निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोरडा दिवस पाळला जातो. त्याचबरोबर कंटेनर सर्वेक्षण करुन पॉझिटिव्ह आढळून आल्यास तेथे कीटकनाशकाची फवारणी केली जाते.- डॉ. संतोष यादव , जिल्हा हिवताप अधिकारी, रत्नागिरी.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्यRatnagiriरत्नागिरी