शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

उपोषणकर्ते भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती बिघडली; रक्ताची उलटी झाली

By संदीप बांद्रे | Updated: March 2, 2024 18:06 IST

दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरूच

चिपळूण : गेल्या दहा दिवसांपासून लोटेमाळ येथे सुरू असलेल्या भगवान कोकरे महाराज यांच्या आमरण उपोषणाची अद्याप शासनस्तरावर दखल घेतलेली नाही. परिणामी त्यांची प्रकृती दिवसेदिंवस खालावत असून शनिवारी त्यांना रक्ताची उलटी  झाली. त्यामुळे लोटे प्राथमिक केंद्रातील आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दोन वेळा अहवाल सादर केला आहे. मात्र कोकरे यांनी उपचार करून घेण्यास नकार दिल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.

राज्यात गोशाळेतील गायींना शासनाने चारा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी भगवान कोकरे महाराजांनी वर्षभरात तिनदा उपोषण केले. आता चौथ्यांदा त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली. २२ फेब्रुवारीपासून गोशाळेतच त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. तेव्हापासून आजतायागत गोशाळेतील जनावरे देखील चारा पाण्यापासून वंचीत आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी गोशाळेतील ११०० गायी महामार्गाने कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभाग कार्यालयात सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पशुसंवर्धन विभागाच्या सहायक आयुक्तांनी गोशाळेचे थकित अनुदान मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.  मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्याशिवाय राज्यातील गोशाळांना अनुदान स्वरूपात निधी पुरवठा करण्याबाबत अधिवेशनात धोरणात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांना होती. परंतू त्यावरही शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कोकरे महाराज आपल्या उपोषणावर ठाम आहेत. 

याबाबत कोकरे महाराज म्हणाले, राज्यात दुष्काळाची भिषण परिस्थिती आहे. ज्या राज्यात मानसाच्या आरक्षणाची दखल घेतली जाते, किंवा त्यासाठी यंत्रणा काम करते. परंतू मुक्या जनांवराच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणालाही वेळ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सारखी माणसे नेतृत्व करत असताना गोशाळेला न्याय मिळत नसेल तर ते दुखद आहे. आता नाही तर मग यावर कधी निर्णय होणार, हा प्रश्न आहे. सरकारने केवळ आपल्या श्री. संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळेचाच विचार न करता राज्यभरातील गोशाळांचा विचार व्हावा. यासाठीच आपले हे उपोषण सुरू असून जोवर शासन आपल्या मागणीची दखल घेत नाही, मग गो मातेसाठी मरण आले तरी बेहत्तर, पण उपोषण थांबणार नाही, असा इशाराही कोकरे यांनी दिला आहे. यावेळी पोलदापूर येथील वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष चंद्रकांत घाडगे

टॅग्स :ChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी