शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
3
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
4
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
5
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
6
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
7
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
8
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
9
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
10
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
11
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
12
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
13
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
14
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
15
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
16
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
17
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
18
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
19
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
20
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊनमुळे फळपिक विमा योजनेपासून शेतकरी वंचित, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा संख्या घटली

By मेहरून नाकाडे | Updated: December 1, 2023 17:38 IST

३० नोव्हेंबर पर्यंत फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आली होती

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे आंबा, काजू पिकाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी या उद्देश्याने जिल्ह्यात फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि.३० नोव्हेंबर अंतिम तारीख होती. शेवटच्या तारखेला सर्व्हर डाऊन असल्याने फळपिक विमा योजनेतील सहभागापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातून एकूण ३० हजार २५१ शेतकरी फळपिक विमा योजनेत सहभागी झाले असून गतवर्षीपेक्षा दोन हजारने संख्या घटली आहे. त्यामुळे फळपिक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत आहे.बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा, काजू पिकावर होत आहे. पिकासाठी केलेला खर्चही निघत नाही. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आंबा काजू पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एेश्चिक आहे. दि.३० नोव्हेंबर पर्यंत फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आली होती.मात्र गेल्या आठवड्यात सर्व्हरची समस्या असल्याने विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अडसर येत होता. शेवटच्या दिवशी तर सर्व्हरने चांगलाच दगा दिला. त्यामुळे गतवर्षीच्या संख्येइतकीही संख्या होऊ शकली नाही. गतवर्षी ३२ हजार शेतकरी फळपिक विमा योजनेत सहभागी झाले होते. यावर्षी मात्र ३० हजार २५१ शेतकऱ्यांचा सहभाग राहिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी