शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

प्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:59 IST

वर्षभर महाविद्यालयाच्या बाहेर इतर शिकवण्या लावूनही बारावीला ८० टक्क्यांच्या पुढे जाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पण करबुडे (ता. रत्नागिरी) येथील सोनल सुभाष धनावडे या शेतकरी कन्येने कुठल्याही शिकवणीविना बारावी कला शाखेमध्ये तब्बल ८९ टक्के गुण मिळवत आपल्या कुटुंबाबरोबरच शाळा - महाविद्यालयाचीही मान उंचावली आहे. दरम्यान, सोनलला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावलीकरबुडेच्या सोनल धनावडेने बारावीत मिळवले ८९ टक्के, श्रेय आई - वडील व शिक्षकांना

शोभना कांबळे रत्नागिरी : वर्षभर महाविद्यालयाच्या बाहेर इतर शिकवण्या लावूनही बारावीला ८० टक्क्यांच्या पुढे जाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पण करबुडे (ता. रत्नागिरी) येथील सोनल सुभाष धनावडे या शेतकरी कन्येने कुठल्याही शिकवणीविना बारावी कला शाखेमध्ये तब्बल ८९ टक्के गुण मिळवत आपल्या कुटुंबाबरोबरच शाळा - महाविद्यालयाचीही मान उंचावली आहे. दरम्यान, सोनलला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे.सोनल रत्नागिरीतील अभ्यंकर - कुलकर्णी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण करबुडे येथे झाले. दहावीलाही तिला ९३.२० टक्के गुण मिळाले होते. त्याचे श्रेय पूर्णपणे करबुडे येथील माध्यमिक विद्यामंदिरचे शिक्षक, आपले आई - वडील, काका आणि मुख्य म्हणजे आपल्या आजोबांना असल्याचे तिने आवर्जुन सांगितले. याच शाळेत तिचे गायन, नृत्य तसेच इतर छंद जपण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे ती सांगते.सोनलला लहानपणापासूनच शिक्षकी पेशाचे आकर्षण आहे. तिचे वडील सुभाष धनावडे हे शेतमजुरी करतात तर मोठा भाऊ संदेश याने बारावीनंतर शिक्षण थांबवून वडिलांना मदत व्हावी, यासाठी रत्नागिरीतील एका दुकानात काम मिळवले. पूर्वी सातवी इयत्ता पूर्ण झाल्यानंतर शिक्षक होता येत असे. त्यामुळे तिचे आजोबा बाळू धनावडे हे सातवी शिकल्यानंतर शिक्षकी पेशात आले. त्यामुळे त्यांची प्रेरणा सोनमला मिळत गेली. आठवीत असतानाही तिला राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती.दहावीला असताना तिला शाळेत जाण्या - येण्यासाठी १५ ते २० मिनिटे चालावे लागे, तेही आडवाटने. पण अभ्यास हेच ध्येय ठेवल्याने ती पहाटे अगदी पाच वाजता उठत असे. अभ्यास करतानाच शेतीची कामे, घरकामात आईला मदत करत असे. दहावी झाल्यानंतर मात्र शाळेत येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे तिला प्रशासकीय सेवेच्या संधीबाबत माहिती मिळू लागली. पुढे काय करायचे, असा निर्णय घेताना गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे पदवीधर असलेले तिचे काका यांची तिला खूप मदत झाली. तिने अभ्यंकर - कुलकर्णी महाविद्यालयात अकरावी कला शाखेत प्रवेश घेतला. उत्तम गुण असतानाही तिने कला शाखेत प्रवेश का घेतला, अशी विचारणा अनेकांनी केली. पण तिचा निर्धार कायम होता.गेल्या दोन वर्षात तिने मेहनत घेऊन अभ्यास केला आणि त्याचे सार्थकही झाले. सोनलला बारावीला ८९ टक्के गुण मिळाले आहेत. आता यापुढील अभ्यास करतानाच ती स्पर्धा परीक्षांची तयारीही करणार आहे. प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर पोहोचण्याचे तिचे स्वप्न तिला पूर्ण करायचे आहे, तिला स्वत:ची वेगळी ओळख बनवायची आहे व त्यासाठी परिश्रम करण्याची तिची तयारी आहे. तिने त्यासाठी प्रयत्नही सुरू केले.जिद्द मनात कायमचीसोनलचे ८० वर्षीय आजोबा दररोज घरी येणाऱ्या वृत्तपत्रांतील बातम्यांद्वारे तिला सतत प्रोत्साहन देत. यामुळे आपणही असे यश मिळवायचेच, ही जिद्द सोनलच्या मनात कायम राहिली. म्हणूनच दहावीला असतानाही तिच्या शिक्षकांनी सर्वच मुलांबरोबर तिला केलेले मार्गदर्शन आणि आजोबांचे प्रोत्साहन यामुळे आपण नक्कीच ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार, असा तिला विश्वास होता. त्या बळावरच तिने दहावीला ९३ टक्के गुण मिळवले.

ग्रामीण भागातील शाळा शहरातील शाळांपेक्षा कुठेही कमी नाहीत. या शाळांमधील शिक्षक अजूनही मुलांसाठी मेहनत घेतात, मनापासून मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांनीच मनापासून अभ्यास करण्याची तयारी ठेवायला हवी. अभ्यासात यश आपोआप मिळत जाते. मेहनत केली की त्याचे फळ निश्चितच चांगले मिळते.- सोनल धनावडे

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालRatnagiriरत्नागिरी