शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

प्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:59 IST

वर्षभर महाविद्यालयाच्या बाहेर इतर शिकवण्या लावूनही बारावीला ८० टक्क्यांच्या पुढे जाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पण करबुडे (ता. रत्नागिरी) येथील सोनल सुभाष धनावडे या शेतकरी कन्येने कुठल्याही शिकवणीविना बारावी कला शाखेमध्ये तब्बल ८९ टक्के गुण मिळवत आपल्या कुटुंबाबरोबरच शाळा - महाविद्यालयाचीही मान उंचावली आहे. दरम्यान, सोनलला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावलीकरबुडेच्या सोनल धनावडेने बारावीत मिळवले ८९ टक्के, श्रेय आई - वडील व शिक्षकांना

शोभना कांबळे रत्नागिरी : वर्षभर महाविद्यालयाच्या बाहेर इतर शिकवण्या लावूनही बारावीला ८० टक्क्यांच्या पुढे जाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पण करबुडे (ता. रत्नागिरी) येथील सोनल सुभाष धनावडे या शेतकरी कन्येने कुठल्याही शिकवणीविना बारावी कला शाखेमध्ये तब्बल ८९ टक्के गुण मिळवत आपल्या कुटुंबाबरोबरच शाळा - महाविद्यालयाचीही मान उंचावली आहे. दरम्यान, सोनलला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे.सोनल रत्नागिरीतील अभ्यंकर - कुलकर्णी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण करबुडे येथे झाले. दहावीलाही तिला ९३.२० टक्के गुण मिळाले होते. त्याचे श्रेय पूर्णपणे करबुडे येथील माध्यमिक विद्यामंदिरचे शिक्षक, आपले आई - वडील, काका आणि मुख्य म्हणजे आपल्या आजोबांना असल्याचे तिने आवर्जुन सांगितले. याच शाळेत तिचे गायन, नृत्य तसेच इतर छंद जपण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे ती सांगते.सोनलला लहानपणापासूनच शिक्षकी पेशाचे आकर्षण आहे. तिचे वडील सुभाष धनावडे हे शेतमजुरी करतात तर मोठा भाऊ संदेश याने बारावीनंतर शिक्षण थांबवून वडिलांना मदत व्हावी, यासाठी रत्नागिरीतील एका दुकानात काम मिळवले. पूर्वी सातवी इयत्ता पूर्ण झाल्यानंतर शिक्षक होता येत असे. त्यामुळे तिचे आजोबा बाळू धनावडे हे सातवी शिकल्यानंतर शिक्षकी पेशात आले. त्यामुळे त्यांची प्रेरणा सोनमला मिळत गेली. आठवीत असतानाही तिला राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती.दहावीला असताना तिला शाळेत जाण्या - येण्यासाठी १५ ते २० मिनिटे चालावे लागे, तेही आडवाटने. पण अभ्यास हेच ध्येय ठेवल्याने ती पहाटे अगदी पाच वाजता उठत असे. अभ्यास करतानाच शेतीची कामे, घरकामात आईला मदत करत असे. दहावी झाल्यानंतर मात्र शाळेत येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे तिला प्रशासकीय सेवेच्या संधीबाबत माहिती मिळू लागली. पुढे काय करायचे, असा निर्णय घेताना गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे पदवीधर असलेले तिचे काका यांची तिला खूप मदत झाली. तिने अभ्यंकर - कुलकर्णी महाविद्यालयात अकरावी कला शाखेत प्रवेश घेतला. उत्तम गुण असतानाही तिने कला शाखेत प्रवेश का घेतला, अशी विचारणा अनेकांनी केली. पण तिचा निर्धार कायम होता.गेल्या दोन वर्षात तिने मेहनत घेऊन अभ्यास केला आणि त्याचे सार्थकही झाले. सोनलला बारावीला ८९ टक्के गुण मिळाले आहेत. आता यापुढील अभ्यास करतानाच ती स्पर्धा परीक्षांची तयारीही करणार आहे. प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर पोहोचण्याचे तिचे स्वप्न तिला पूर्ण करायचे आहे, तिला स्वत:ची वेगळी ओळख बनवायची आहे व त्यासाठी परिश्रम करण्याची तिची तयारी आहे. तिने त्यासाठी प्रयत्नही सुरू केले.जिद्द मनात कायमचीसोनलचे ८० वर्षीय आजोबा दररोज घरी येणाऱ्या वृत्तपत्रांतील बातम्यांद्वारे तिला सतत प्रोत्साहन देत. यामुळे आपणही असे यश मिळवायचेच, ही जिद्द सोनलच्या मनात कायम राहिली. म्हणूनच दहावीला असतानाही तिच्या शिक्षकांनी सर्वच मुलांबरोबर तिला केलेले मार्गदर्शन आणि आजोबांचे प्रोत्साहन यामुळे आपण नक्कीच ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार, असा तिला विश्वास होता. त्या बळावरच तिने दहावीला ९३ टक्के गुण मिळवले.

ग्रामीण भागातील शाळा शहरातील शाळांपेक्षा कुठेही कमी नाहीत. या शाळांमधील शिक्षक अजूनही मुलांसाठी मेहनत घेतात, मनापासून मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांनीच मनापासून अभ्यास करण्याची तयारी ठेवायला हवी. अभ्यासात यश आपोआप मिळत जाते. मेहनत केली की त्याचे फळ निश्चितच चांगले मिळते.- सोनल धनावडे

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालRatnagiriरत्नागिरी