शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:59 IST

वर्षभर महाविद्यालयाच्या बाहेर इतर शिकवण्या लावूनही बारावीला ८० टक्क्यांच्या पुढे जाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पण करबुडे (ता. रत्नागिरी) येथील सोनल सुभाष धनावडे या शेतकरी कन्येने कुठल्याही शिकवणीविना बारावी कला शाखेमध्ये तब्बल ८९ टक्के गुण मिळवत आपल्या कुटुंबाबरोबरच शाळा - महाविद्यालयाचीही मान उंचावली आहे. दरम्यान, सोनलला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावलीकरबुडेच्या सोनल धनावडेने बारावीत मिळवले ८९ टक्के, श्रेय आई - वडील व शिक्षकांना

शोभना कांबळे रत्नागिरी : वर्षभर महाविद्यालयाच्या बाहेर इतर शिकवण्या लावूनही बारावीला ८० टक्क्यांच्या पुढे जाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पण करबुडे (ता. रत्नागिरी) येथील सोनल सुभाष धनावडे या शेतकरी कन्येने कुठल्याही शिकवणीविना बारावी कला शाखेमध्ये तब्बल ८९ टक्के गुण मिळवत आपल्या कुटुंबाबरोबरच शाळा - महाविद्यालयाचीही मान उंचावली आहे. दरम्यान, सोनलला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे.सोनल रत्नागिरीतील अभ्यंकर - कुलकर्णी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण करबुडे येथे झाले. दहावीलाही तिला ९३.२० टक्के गुण मिळाले होते. त्याचे श्रेय पूर्णपणे करबुडे येथील माध्यमिक विद्यामंदिरचे शिक्षक, आपले आई - वडील, काका आणि मुख्य म्हणजे आपल्या आजोबांना असल्याचे तिने आवर्जुन सांगितले. याच शाळेत तिचे गायन, नृत्य तसेच इतर छंद जपण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे ती सांगते.सोनलला लहानपणापासूनच शिक्षकी पेशाचे आकर्षण आहे. तिचे वडील सुभाष धनावडे हे शेतमजुरी करतात तर मोठा भाऊ संदेश याने बारावीनंतर शिक्षण थांबवून वडिलांना मदत व्हावी, यासाठी रत्नागिरीतील एका दुकानात काम मिळवले. पूर्वी सातवी इयत्ता पूर्ण झाल्यानंतर शिक्षक होता येत असे. त्यामुळे तिचे आजोबा बाळू धनावडे हे सातवी शिकल्यानंतर शिक्षकी पेशात आले. त्यामुळे त्यांची प्रेरणा सोनमला मिळत गेली. आठवीत असतानाही तिला राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती.दहावीला असताना तिला शाळेत जाण्या - येण्यासाठी १५ ते २० मिनिटे चालावे लागे, तेही आडवाटने. पण अभ्यास हेच ध्येय ठेवल्याने ती पहाटे अगदी पाच वाजता उठत असे. अभ्यास करतानाच शेतीची कामे, घरकामात आईला मदत करत असे. दहावी झाल्यानंतर मात्र शाळेत येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे तिला प्रशासकीय सेवेच्या संधीबाबत माहिती मिळू लागली. पुढे काय करायचे, असा निर्णय घेताना गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे पदवीधर असलेले तिचे काका यांची तिला खूप मदत झाली. तिने अभ्यंकर - कुलकर्णी महाविद्यालयात अकरावी कला शाखेत प्रवेश घेतला. उत्तम गुण असतानाही तिने कला शाखेत प्रवेश का घेतला, अशी विचारणा अनेकांनी केली. पण तिचा निर्धार कायम होता.गेल्या दोन वर्षात तिने मेहनत घेऊन अभ्यास केला आणि त्याचे सार्थकही झाले. सोनलला बारावीला ८९ टक्के गुण मिळाले आहेत. आता यापुढील अभ्यास करतानाच ती स्पर्धा परीक्षांची तयारीही करणार आहे. प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर पोहोचण्याचे तिचे स्वप्न तिला पूर्ण करायचे आहे, तिला स्वत:ची वेगळी ओळख बनवायची आहे व त्यासाठी परिश्रम करण्याची तिची तयारी आहे. तिने त्यासाठी प्रयत्नही सुरू केले.जिद्द मनात कायमचीसोनलचे ८० वर्षीय आजोबा दररोज घरी येणाऱ्या वृत्तपत्रांतील बातम्यांद्वारे तिला सतत प्रोत्साहन देत. यामुळे आपणही असे यश मिळवायचेच, ही जिद्द सोनलच्या मनात कायम राहिली. म्हणूनच दहावीला असतानाही तिच्या शिक्षकांनी सर्वच मुलांबरोबर तिला केलेले मार्गदर्शन आणि आजोबांचे प्रोत्साहन यामुळे आपण नक्कीच ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार, असा तिला विश्वास होता. त्या बळावरच तिने दहावीला ९३ टक्के गुण मिळवले.

ग्रामीण भागातील शाळा शहरातील शाळांपेक्षा कुठेही कमी नाहीत. या शाळांमधील शिक्षक अजूनही मुलांसाठी मेहनत घेतात, मनापासून मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांनीच मनापासून अभ्यास करण्याची तयारी ठेवायला हवी. अभ्यासात यश आपोआप मिळत जाते. मेहनत केली की त्याचे फळ निश्चितच चांगले मिळते.- सोनल धनावडे

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालRatnagiriरत्नागिरी