शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जैतापूरबाबत भूमिका स्पष्ट करावी

By admin | Updated: July 27, 2014 00:49 IST

नीलेश राणे यांचा इशारा : शिवसेनेकडून नागरिकांची फसवणूक

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि इकोसेन्सिटिव्ह झोन या प्रमुख मुद्द्यांबाबत लोकांना भूलथापा देऊन शिवसेनेने मते मिळविली; पण आता या दोन्ही मुद्द्यांबाबत आपली नेमकी भूमिका काय आहे, हे दहा दिवसांच्या आत शिवसेनेने स्पष्ट करावे, अन्यथा यावर मला उत्तर द्यावे लागेल, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.शहरातील त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझील येथे गेले असता त्यांनी तिथेही जैतापूर प्रकल्प होणार, असा शब्द दिला. परत मुंबई आल्यावरही त्यांनी भाभा संशोधन केंद्रालाही असाच शब्द दिला. म्हणजे कोकणात शिवसेनेने ज्या मुद्द्यावर लोकांची मते मिळविली, त्याबाबत आता पक्षाची आणि त्यांच्या खासदारांचीच नेमकी भूमिका काय, हे येत्या दहा दिवसांत स्पष्ट करावे. केवळ शाब्दिक विरोध दाखवून उपयोग नाही. आता लोकांपुढे जाऊन त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल, असे ते म्हणाले.इकोसेन्सिटिव्ह झोनबाबत ते म्हणाले की, अंदाजपत्रक जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच सभागृहात ‘इन्व्हायरल फॉरेस्ट’वर चर्चा झाली. यावेळी केरळमधील खासदारांनी इकोसेन्सिटिव्हला विरोध दर्शविला. मग आपल्या कोकणच्या विद्यमान खासदारांनी विरोध का दर्शविला नाही? या दोन प्रमुख मुद्द्यांबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका आता त्यांनी स्पष्ट करावी, असा पुनरुच्चार त्यांनी केला.खासदार विनायक राऊत यांना कोकण रेल्वे बोर्ड आणि रेल्वे बोर्ड यांच्यातील फरकच कळलेला नाही. याच चर्चेवेळी या विद्यमान खासदारांनी हे दोन्ही बोर्ड एकत्र यावेत, असा मुद्दा मांडला. हे दोन बोर्ड एकत्र केले तर कोकणला काय मिळेल, हे सांगायलाच नको, अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली.केवळ आमच्यावर टीका करण्यापलीकडे राऊत यांना लोकांच्या कामाशी देणेघेणे नाही. म्हणूनच ज्या मुद्द्यावर त्यांना लोकांनी निवडून दिले, त्या मुद्द्यांबाबत त्यांनी आपली भूमिका मांडावी, अन्यथा ते मुद्दे घेऊन आपण येत्या विधानसभा निवडणुकीत लोकांसमोर जाऊ, असा इशारा त्यांनी दिला. असे काही होणार नाही...नारायण राणे यांचे समर्थक सुभाष बने, गणपत कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राजकीय चित्र बदलतंय का? या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी ‘असे काही होईल, असे वाटत नाही,’ असे मत व्यक्त केले. तसेच नारायण राणे यांना केसरकर आणि उपरकर हे प्रतिस्पर्धी निर्माण झाले आहेत का, या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यांना मीडियानेच मोठे केले आहे. त्यांच्यात काही ताकद आहे, असे वाटत नाही. (प्रतिनिधी)