शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

मातीच्या धरणाची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:40 IST

Dam Khed Ratangiri-मातीच्या धरणांची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात सुरू केला आहे. तालुक्यातील कोंडिवली धरणाच्या गळती लागलेल्या भिंतीवर जिल्ह्यातील पहिला प्रयोग सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोंडिवली धरणाच्या दुरूस्तीतून जिल्ह्यात पहिलाच प्रयोग तिवरे धरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न सुरू

खेड : मातीच्या धरणांची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात सुरू केला आहे. तालुक्यातील कोंडिवली धरणाच्या गळती लागलेल्या भिंतीवर जिल्ह्यातील पहिला प्रयोग सुरू करण्यात आला आहे.जुलै, २०१९ मध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मातीचे धरण फुटण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील कोंडिवली येथील धरणाला गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरू असते. धरण फुटीच्या छायेखाली ग्रामस्थांना वावरावे लागते. या धरणाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिली आहेत, तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरण फुटीची शक्यता फेटाळून लावली होती. मात्र, धरणाच्या भिंतीची दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्ह्यातील सर्वच मातीच्या धरणांची पाहणी करून शासनाला अहवाल देण्यात आला होता.सद्यस्थितीत कोंडिवली धरणासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंग तंत्रज्ञान वापरून दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. यासाठी शासनाने ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. बेंटोनाइट या मातीच्या पावडरचा वापर या धरण दुरुस्तीसाठी करण्यात येणार आहे. यासाठी धरणाच्या भिंतीला वरील बाजूने १० ते २५ मीटर खोल छिद्र पाडून यामध्ये पाणी टाकून बेंटोनाइटचे जाडसर मिश्रण प्रेशरने सोडण्यात येते. धरणाच्या भिंतीत अंतर्गत असलेली छिद्रे या मिश्रणाने भरली जाऊन पाण्याची गळती रोखण्यात मदत होते. या पद्धतीने सुमारे ७० टक्के पाण्याची गळती रोखली जाईल, असा अंदाज ठेकेदार कंपनीचे राहुल पाटील यांनी व्यक्त केला. या तंत्रज्ञानाने मातीच्या धरणांची काही प्रमाणात गळती रोखली जाईल, तर भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या ग्रामस्थांनाही यातून थोडासा दिलासा मिळेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

बेंटोनाइट ग्राउंटिंगमुळे मातीच्या भिंती असलेल्या धरणांची पाणी गळती रोखण्यासाठी कोंडिवली येथे काम सुरू करण्यात आले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे छिद्र असलेल्या धरणाची भिंत भक्कम होईल, सुरक्षित होईल, तसेच पाण्याची गळती रोखण्यास निश्चितच मदत होईल.- गोविंद श्रीमंगले,पाटबंधारे उपअभियंता, खेड

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी