शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

बारसूतील खोदकाम संपले, विरोधकांचे मनाई आदेश उठले

By मनोज मुळ्ये | Updated: May 15, 2023 18:16 IST

रत्नागिरी / राजापूर : तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम रविवारी संपले. एकूण ६६ बोअरवेल ...

रत्नागिरी / राजापूर : तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम रविवारी संपले. एकूण ६६ बोअरवेल खोदल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दोन महिन्यात या माती परीक्षणाचा अहवाल येणार असून, त्यानंतरच बारसूमध्ये प्रकल्प होणार नाही हे निश्चित होणार आहे. दरम्यान हे काम आटोक्यात आल्याने रिफायनरी विरोधकांना लागू करण्यात आलेले मनाई आदेश रद्द करण्यात आले आहेत.

एप्रिल महिन्यापासून बारसू, सोलगाव परिसरातील सड्यावर रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम सुरु होते. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. स्थानिकांनी या कामाला जोरदार विरोध करत ते काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही बारसूचा दौरा केला. कामात अडथळा येऊ नये म्हणून या परिसरात सुमारे २००० पोलिस तैनात ठेवण्यात आले होते.रविवारी माती परीक्षणाचे काम संपले असून, हे काम करणाऱ्या इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीने मातीचे नमुने हैद्राबादच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल दोन महिन्यात येण्याची शक्यता आहे.

माती परीक्षणाचे काम आटोक्यात येत असतानाच गुरुवारी (११ मे) प्रकल्प विरोधी नेत्यांना बजावण्यात आलेले मनाई आदेश माग घेण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश व संचार करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला होता. हे आदेश पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या दि. ११ मे २०२३ च्या पत्राच्या अनुषंगाने मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. संबंधित रद्द आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

यांच्याविरुद्ध होते आदेशदेवाप्पा अण्णा शेट्टी उर्फ राजू शेट्टी (रा. अर्जुनवाड रोड, ता. शिरोळ जि. कोल्हापूर, खासदार व अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनार्दन गुंडू पाटील, (रा. परीते, ता. करवीर, जि. कोल्हापूर, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संघटना, कोल्हापूर), अशोक केशव वालम (रा. नाणार, ता. राजापूर), जालिंदर गणपती पाटील, (रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), स्वप्निल सीताराम सोगम (रा. पन्हळे तर्फे राजापूर, ता. राजापूर), सत्यजित विश्वनाथ चव्हाण, (रा. राम आनंदनगर हाऊसिंग सोसायटी, दहिसर पूर्व, मुंबई) यांच्याविरुद्ध हे आदेश बजावण्यात आले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी