शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

बारसूतील खोदकाम संपले, विरोधकांचे मनाई आदेश उठले

By मनोज मुळ्ये | Updated: May 15, 2023 18:16 IST

रत्नागिरी / राजापूर : तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम रविवारी संपले. एकूण ६६ बोअरवेल ...

रत्नागिरी / राजापूर : तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम रविवारी संपले. एकूण ६६ बोअरवेल खोदल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दोन महिन्यात या माती परीक्षणाचा अहवाल येणार असून, त्यानंतरच बारसूमध्ये प्रकल्प होणार नाही हे निश्चित होणार आहे. दरम्यान हे काम आटोक्यात आल्याने रिफायनरी विरोधकांना लागू करण्यात आलेले मनाई आदेश रद्द करण्यात आले आहेत.

एप्रिल महिन्यापासून बारसू, सोलगाव परिसरातील सड्यावर रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम सुरु होते. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. स्थानिकांनी या कामाला जोरदार विरोध करत ते काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही बारसूचा दौरा केला. कामात अडथळा येऊ नये म्हणून या परिसरात सुमारे २००० पोलिस तैनात ठेवण्यात आले होते.रविवारी माती परीक्षणाचे काम संपले असून, हे काम करणाऱ्या इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीने मातीचे नमुने हैद्राबादच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल दोन महिन्यात येण्याची शक्यता आहे.

माती परीक्षणाचे काम आटोक्यात येत असतानाच गुरुवारी (११ मे) प्रकल्प विरोधी नेत्यांना बजावण्यात आलेले मनाई आदेश माग घेण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश व संचार करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला होता. हे आदेश पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या दि. ११ मे २०२३ च्या पत्राच्या अनुषंगाने मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. संबंधित रद्द आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

यांच्याविरुद्ध होते आदेशदेवाप्पा अण्णा शेट्टी उर्फ राजू शेट्टी (रा. अर्जुनवाड रोड, ता. शिरोळ जि. कोल्हापूर, खासदार व अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनार्दन गुंडू पाटील, (रा. परीते, ता. करवीर, जि. कोल्हापूर, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संघटना, कोल्हापूर), अशोक केशव वालम (रा. नाणार, ता. राजापूर), जालिंदर गणपती पाटील, (रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), स्वप्निल सीताराम सोगम (रा. पन्हळे तर्फे राजापूर, ता. राजापूर), सत्यजित विश्वनाथ चव्हाण, (रा. राम आनंदनगर हाऊसिंग सोसायटी, दहिसर पूर्व, मुंबई) यांच्याविरुद्ध हे आदेश बजावण्यात आले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी