शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पर्ससीन बंदीचा सर्वांनाच फटका

By admin | Updated: March 17, 2016 23:34 IST

मालवाहकांची गर्दी ओसरली : आर्थिक उलाढालही ठप्प

रत्नागिरी : पर्ससीन नेटधारक मच्छीमारांना १ जानेवारी ते १५ मेपर्यंत मच्छीमारीस बंदी घातल्याने येथील मिरकरवाडासह अनेक मच्छीमारी बंदरातील मोठे आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. या बंदरांवर असलेली मच्छीमार, मालवाहकांची गर्दीही ओसरली आहे. आर्थिक उलाढाल ठप्प होण्याबरोबरच मच्छीमारीवर अवलंबून असलेल्या अनेक जोडधंद्यांना याचा जबर आर्थिक फटका बसला आहे. त्यातच पर्ससीन नेटधारक मच्छीमारांनी पारंपरिक पध्दतीच्या जाळ्यांनी मच्छीमारी न करता किनाऱ्यावरच राहणे पसंत केल्याने खलाशीही बेरोजगार झाले आहेत. जिल्ह्यातील मिरकरवाडा, हर्णै, जयगड, साखरीनाटे, राजिवडा, पूर्णगड, वरवडे, दाभोळ यासारख्या अनेक मच्छीमारी बंदरांमधील गजबज कमी झाली आहे. येथील मच्छीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळही आता एकदम कमी झाली आहे. मच्छीच्या वाहतुकीतून हजारो वाहने, छोटे टेम्पो यांना आर्थिक बळ मिळाले होते. मात्र, पर्ससीन नेटवर बंदी घातल्यानंतर या वाहनांना कामच उरलेले नाही. मच्छी वाहतुकीसाठी कर्जावर वाहने घेतलेल्यांना आता कर्जाचे हप्ते कसे भरावेत, असा प्रश्न पडला आहे. मच्छी परराज्यात नेणाऱ्या ट्रकमालकांनाही याचा आर्थिक फटका बसला आहे. मच्छीमारीमुळे बंदरात ये-जा करणाऱ्या मच्छीमारी नौकांसाठी लागणारे पाणी टॅँकरद्वारे पुरवठा करणाऱ्यांनाही पर्ससीन मच्छीमारी बंदीची झळ बसली आहे.त्याचबरोबर प्रत्येक बंदराच्या ठिकाणी असलेले वडापाव विक्रेते, अन्य खाद्य व्यावसायिक यांच्या व्यवसायावरही गंभीर परिणाम झाला आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यातील विविध बाजारपेठाही मच्छीमारी हंगामावरच बहुतांशी अवलंबून आहेत. मच्छीमारी व्यवसाय चांगला चालला की या बाजारपेठांमध्येही तेजी असते. मात्र, आता बाजारपेठांमध्येही त्याचा दुष्परिणाम दिसू लागल्याने व्यापारीवर्गही हवालदिल झाला आहे. मच्छीमारी व्यवसायासाठी लागणारे विविध साहित्य विक्री करणारे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. रत्नागिरीतील मिरजोळे औद्योगिक वसाहतीतील फीशमील्सनाही प्रक्रियेसाठी मच्छी मिळेनाशी झाली असून, त्यांचे कामही कमी झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नेपाळी लोक आंबा बागायतींमध्ये रखवालदार म्हणून काम करतात तसेच ते मच्छीमारी नौकांवरही खलाशी म्हणून काम करतात. स्थानिकांबरोबरच कर्नाटक, केरळ येथील खलाशीही जिल्ह्यातील मच्छीमारी नौकांवर खलाशी म्हणून काम करीत आहेत. पर्ससीन नेटच्या एका नौकेवर किमान २५ ते कमाल ३० खलाशी कार्यरत असतात. गेल्या १ जानेवारीपासून पर्ससीन नौका किनाऱ्यावरच असल्याने दर दिवसाचा खलाशांवरील २० हजार खर्च हा नौका मालकांना करावाच लागत आहे. त्यामुळे बंदरातून पर्ससीन नौका सुरक्षित स्थळी नेण्याची परवानगीही मालकांनी मत्स्य आयुक्तांकडे मागितली आहे. (प्रतिनिधी)तीव्र प्रतिक्रिया : पारंपरिक मच्छीमार ठामपर्सनेटला घातलेली बंदी उठवू नये या भूमिकेवर पारंपरिक मच्छीमार ठाम आहेत. कोणत्याही स्थितीत पर्ससीनवरील बंदी उठवू नये, यासाठी त्यांचा लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक मच्छीमारांनी अत्याधुनिक मच्छीमारांच्या अतिक्रमणाखाली हलाखीचे दिवस काढल्याच्या तीव्र प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पारंपरिक मच्छीमार आक्रमक का झाले याचा विचार पर्सनेट मच्छीमारांनी करण्याची आवश्यकता आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या सागरी क्षेत्रातील हद्दीत पर्सनेट नौकांनी मच्छीमारी केल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे.गोवा, मुंबईचे मासे रत्नागिरीतपर्सनेट मच्छीमारीवर राज्यात जरी बंदी असली, तरी अन्य राज्यात अशी बंदी नाही. त्यामुळे तेथील सुरमई, पापलेट व अन्य प्रकारचे मासे रत्नागिरीसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही विक्रीसाठी आणले जात आहेत. हर्णै येथील मासेही मोठ्या प्रमाणात रत्नागिरी बंदरात विक्रीसाठी येत आहेत. तरीही मच्छीची कमतरता भासत असून, मच्छीमारांच्या या भांडणात मच्छी खवय्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. एकिकडे गोव्याची मच्छी रत्नागिरीत येत असताना अन्य राज्यांतील पर्सनेट मच्छीमारी नौकांची कोकण किनाऱ्यावर घुसखोरी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.