शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अखेर रिफायनरीचे घोडे बारसूच्या गंगेत न्हाणार, पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 08:09 IST

जागा उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : तब्बल चार लाख कोटींची  गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प नाणारला होणार की बाहेर जाणार, याबाबत चार वर्षे सुरू असलेला गोंधळ मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र व पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात केलेली विधाने पाहता प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांनी एकत्र येऊन रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स कंपनी लि. ची स्थापना केली. या प्रकल्पासाठी कंपनीने सर्वाधिक पसंती नाणार व परिसरातील १४ गावांना दिली. मात्र तेथील विरोधामुळे आम्हीही लोकांच्या बाजूने असे म्हणत विरोध वाढत गेला. शिवसेनेकडून मतांची अपेक्षा असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१९ मध्ये यासाठीची नाणारमधील अधिसूचना रद्द केल्याने प्रकल्प होणार की नाही, हे स्पष्ट होत नव्हते. शिवसेनेने सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रकल्प बारसूमध्ये होणार हे स्पष्ट झाले आहे.

आदित्य ठाकरे सकारात्मकशिवसेनेतील एकमेव आदित्य ठाकरे यांनी मंत्री होण्याआधी ही रिफायनरी बाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. आता कोकण दौऱ्यावर त्यांनी हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातच लोकांना हवा तेथे करु, असे सकारात्मक संकेतही दिले.

१३ हजार एकर जागा देणारमुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकल्पासाठी बारसू येथे १३ हजार एकर जागा उपलब्ध करुन देण्याचे पत्र पंतप्रधानांना पाठवले. आतापर्यंत ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली प्रकल्पाला विरोध केला जात होता. मात्र आता त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विरोधात मोर्चाn तथाकथित सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली राजापुरात बुधवारी बारसूमध्ये होऊ शकणाऱ्या प्रकल्पाला विरोध करणारा मोर्चा काढण्यात आला. n मात्र, यावेळी शिवसेना त्यात नसल्याने विरोधाचा जोर किती टिकणार, हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरे