शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रिफायनरीचे घोडे बारसूच्या गंगेत न्हाणार, पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 08:09 IST

जागा उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : तब्बल चार लाख कोटींची  गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प नाणारला होणार की बाहेर जाणार, याबाबत चार वर्षे सुरू असलेला गोंधळ मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र व पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात केलेली विधाने पाहता प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांनी एकत्र येऊन रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स कंपनी लि. ची स्थापना केली. या प्रकल्पासाठी कंपनीने सर्वाधिक पसंती नाणार व परिसरातील १४ गावांना दिली. मात्र तेथील विरोधामुळे आम्हीही लोकांच्या बाजूने असे म्हणत विरोध वाढत गेला. शिवसेनेकडून मतांची अपेक्षा असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१९ मध्ये यासाठीची नाणारमधील अधिसूचना रद्द केल्याने प्रकल्प होणार की नाही, हे स्पष्ट होत नव्हते. शिवसेनेने सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रकल्प बारसूमध्ये होणार हे स्पष्ट झाले आहे.

आदित्य ठाकरे सकारात्मकशिवसेनेतील एकमेव आदित्य ठाकरे यांनी मंत्री होण्याआधी ही रिफायनरी बाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. आता कोकण दौऱ्यावर त्यांनी हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातच लोकांना हवा तेथे करु, असे सकारात्मक संकेतही दिले.

१३ हजार एकर जागा देणारमुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकल्पासाठी बारसू येथे १३ हजार एकर जागा उपलब्ध करुन देण्याचे पत्र पंतप्रधानांना पाठवले. आतापर्यंत ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली प्रकल्पाला विरोध केला जात होता. मात्र आता त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विरोधात मोर्चाn तथाकथित सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली राजापुरात बुधवारी बारसूमध्ये होऊ शकणाऱ्या प्रकल्पाला विरोध करणारा मोर्चा काढण्यात आला. n मात्र, यावेळी शिवसेना त्यात नसल्याने विरोधाचा जोर किती टिकणार, हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरे