शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अखेर रिफायनरीचे घोडे बारसूच्या गंगेत न्हाणार, पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 08:09 IST

जागा उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : तब्बल चार लाख कोटींची  गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प नाणारला होणार की बाहेर जाणार, याबाबत चार वर्षे सुरू असलेला गोंधळ मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र व पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात केलेली विधाने पाहता प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांनी एकत्र येऊन रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स कंपनी लि. ची स्थापना केली. या प्रकल्पासाठी कंपनीने सर्वाधिक पसंती नाणार व परिसरातील १४ गावांना दिली. मात्र तेथील विरोधामुळे आम्हीही लोकांच्या बाजूने असे म्हणत विरोध वाढत गेला. शिवसेनेकडून मतांची अपेक्षा असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१९ मध्ये यासाठीची नाणारमधील अधिसूचना रद्द केल्याने प्रकल्प होणार की नाही, हे स्पष्ट होत नव्हते. शिवसेनेने सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रकल्प बारसूमध्ये होणार हे स्पष्ट झाले आहे.

आदित्य ठाकरे सकारात्मकशिवसेनेतील एकमेव आदित्य ठाकरे यांनी मंत्री होण्याआधी ही रिफायनरी बाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. आता कोकण दौऱ्यावर त्यांनी हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातच लोकांना हवा तेथे करु, असे सकारात्मक संकेतही दिले.

१३ हजार एकर जागा देणारमुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकल्पासाठी बारसू येथे १३ हजार एकर जागा उपलब्ध करुन देण्याचे पत्र पंतप्रधानांना पाठवले. आतापर्यंत ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली प्रकल्पाला विरोध केला जात होता. मात्र आता त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विरोधात मोर्चाn तथाकथित सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली राजापुरात बुधवारी बारसूमध्ये होऊ शकणाऱ्या प्रकल्पाला विरोध करणारा मोर्चा काढण्यात आला. n मात्र, यावेळी शिवसेना त्यात नसल्याने विरोधाचा जोर किती टिकणार, हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरे