शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

घोषणांचा पाऊस, तरी पर्यटन विकासात दुष्काळ; कोकणातील मुलभूत प्रश्नांकडेही वर्षानुवर्षे दुर्लक्ष

By मनोज मुळ्ये | Updated: April 20, 2024 15:34 IST

कोकणचा कॅलिफोर्निया करणे राहिले दूरच

मनाेज मुळ्येरत्नागिरी : विस्तीर्ण, देखणा आणि स्वच्छ समुद्रकिनारा, सह्याद्रीच्या कडेकपारी, कुठे प्राचीन मंदिरे तर कुठे विलोभनीय निसर्ग. कुठे ऐतिहासिक किल्ले तर कुठे मानवाच्या उत्पत्तीपर्यंत घेऊन जाणारी कातळशिल्पे. इतकी वैशिष्ट्ये असलेले कोकण सौंदर्याची खाण असले तरी पर्यटनदृष्ट्या मात्र कायमच अविकसित राहिले आहे.वर्षानुवर्षे सर्वच राजकीय पक्षांनी दाखवलेली अनास्था, योग्य धोरणांचा अभाव, मूलभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष आणि पर्यटन विकासासाठी सर्व शासकीय खात्यांचे न झालेले एकत्रीकरण यामुळे पर्यटकांची पावले अजूनही कोकणाकडे वळलेली नाहीत. असे सांगितले जाते की, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ज्यावेळी कोकणच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा कोकणचे सौंदर्य पाहून ते म्हणाले की, कोकण अगदी कॅलिफोर्नियासारखा आहे. तेव्हापासून कोकणचा कॅलिफोर्निया ही संकल्पना उदयाला आली. प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कोकणचा कॅलिफोर्निया ही संकल्पना सारखी बोलून बोलून गुळगुळीत केली; पण कोकणचा कॅलिफोर्निया काही झाला नाही. गेल्या काही वर्षांत कोकणातही शहरीकरण वाढू लागले आहे; पण पर्यटनस्थळांचा विकास मात्र लांबच आहे.

विविध प्रकारच्या पर्यटन वाढीला वावकोकणात अनेक प्रकारचे पर्यटन विकसित होऊ शकते. त्याला मुक्त वाव आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करू शकण्याची क्षमता कोकणात आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक पर्यटनस्ळाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधांची गरज आहे.

  • कोकणात प्राचीन, अतिप्राचीन मंदिरे जागोजागी आढळतात. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये राज्यभर प्रसिद्ध असणारी मंदिरे आहेत आणि दरवर्षी लाखो लोक त्या ठिकाणी भेट देतात; पण त्यात निवासी पर्यटकांची संख्या अल्प आहे. ज्यावेळी ती वाढेल, तेव्हाच स्थानिकांना रोजगार मिळेल आणि पर्यटन विकास म्हणता येईल.
  • डोंगरदऱ्यांमुळे कोकणात पावसाळ्यामध्ये जागोजागी छोटे-मोठे धबधबे दिसतात. पावसाळी हंगामात काेकणाचे रूप अजूनच उजळते; पण त्याचे मार्केटिंग होत नाही. उलट कोकणात पाऊस खूप म्हणून पर्यटक इकडे फिरकतच नाहीत.
  • समुद्रकिनारी वसलेल्या काेकणाला खाड्यांचे मोठे वरदान आहे. खाडीमधील बोटिंग, खाडी आणि परिसरातील जैवविविधता, पक्षीदर्शन हे सर्व खूप आकर्षक आहे; पण कोकणाबाहेरील लोकांना त्याची माहिती आहे कुठे? ते लोकांपर्यंत जाण्यासाठी शासनाचे प्रयत्नच गरजेचे आहेत.
  • गडकिल्ले, डोंगरदऱ्यांमुळे साहसी पर्यटनाला मोठी संधी आहे. आजच्या तरुणाईला साहसी पर्यटनाचे आकर्षण आहे. कोकणातील डोंगरदऱ्या त्यांच्या पसंतीस उतरू शकतात; पण त्याचे आवश्यक मार्केटिंग होत नाही.

जागतिक आकर्षणाची कातळशिल्पे

  • गेल्या काही वर्षांत कोकणात कातळशिल्पे मोठ्या प्रमाणात आढळली आहेत.
  • त्यावर संशोधन सुरू आहे. हत्यारे विकसित झाली नव्हती, तेव्हाच्या काळात कातळावर काढलेली अवाढव्य चित्रे कदाचित मानवाच्या उत्पत्तीपर्यंत घेऊन जाणारी ही कातळशिल्पे जागतिक आकर्षण आहेत.
  • त्याच्या जतनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठीही प्रसिद्धीची गरज आहे.
  • कातळशिल्पे ही ग्रामीण भागात आहेत. तेथपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता ही सर्वांत मोठी गरज आहे.

रस्ते ही मुख्य समस्यापर्यटनस्थळांच्या विकासातील सर्वांत पहिला टप्पा म्हणजे चांगले रस्ते. मुंबई गोवा महामार्गाचे काम बरीच वर्षे रखडले आहे. आताशा स्वत:च्या गाडीने फिरणारे लोक अधिक आहेत. त्यांच्यासाठी रस्ता हीच सर्वांत महत्त्वाची बाब आहे. तो नीट असेल तरच पर्यटक या भागाकडे वळतील, ही बाब स्पष्ट आहे.

खाती एकत्र हवीतपर्यटन स्थळांचा विकास करायचा असेल तर ती केवळ पर्यटन विकास महामंडळाची जबाबदारी नाही. त्यासाठी बांधकाम, महावितरण, जिल्हा प्रशासन, पोलिस, जिल्हा परिषद अशी सर्वच खाती एकत्र यायला हवीत.

शॅक्स राहिले दूरचसीआरझेडने वाट अडवल्याने गोव्याच्या धर्तीवर कोकणातील किनारपट्टीवर शॅक्स उभारण्याची योजना किनाjयापर्यंत पोहोचलेली नाही. असे अडथळे केंद्र सरकारमार्फतच दूर होऊ शकतात. मात्र त्यासाठी अजून कोणीच प्रयत्न केलेले नाहीत.

किनारी पर्यटन विकासात सीआरझेडची बाधाकिनारपट्टीवरील भागात अनेक सुधारणांची गरज आहे. तेथील रहिवाशांना घरालगतच अनेक उद्योग उभे करता येऊ शकतात. पण त्यात सीआरझेड हा मोठा अडथळा आहे. परवानगीची प्रक्रिया जेवढी सुलभ होईल, तेवढे लोक पुढे येतील. सध्या सीआरझेडच्या बंधनामुळे किनारी भागातील बहुतांश विकास थांबलाच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४