शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
4
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
5
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
6
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
20
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?

दुर्लक्षित ‘छावा’ अजूनही उपेक्षितच; भूमिपूजनानंतर तब्बल ३६ वर्षांनीही संभाजी महाराज यांचे स्मारक अर्धवट स्थितीतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:33 IST

स्मारकाच्या जागेबाबत मतेमतांतरे?

रत्नागिरी : महापराक्रमी आणि प्रचंड धर्माभिमानी छत्रपती संभाजीराजे वर्षानुवर्षे दुर्लक्षितच राहिले. त्यांच्या वाट्याची ही उपेक्षा आजही कायम आहे. तब्बल ३६ वर्षे त्यांच्या स्मारकाचे रेंगाळले आहे. आजवर त्यासाठी फक्त निधीच्या घोषणा झाल्या, लाखो रुपये खर्च झाले. मात्र, तरीही हे स्मारक काही उभे राहिलेले नाही. आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची चर्चा सुरू झाली असताना तरी हे स्मारक उभे राहील, अशी अपेक्षा केली जात आहे.आपल्या अखेरच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांचा मुक्काम आताच्या कसबा (ता. संगमेश्वर) या भागात होता. तेथीलच एका वाड्यात त्यांना पकडण्यात आले. खरे तर त्याच जागेत शंभूराजेंचे स्मारक होणे अपेक्षित होते. मात्र, १९८९ साली कसबा ते संगमेश्वर यादरम्यान पैसा फंड हायस्कूलनजीक डोंगरात जागा घेऊन तेथे स्मारक करण्याचे निश्चित करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत या स्मारकासाठीचे भूमिपूजन झाले. त्यानंतर पुढील सुमारे १२/१३ वर्षे त्यावर काही लाख रुपये खर्चही झाले. मात्र, ते स्मारक आजही पूर्ण झालेले नाही.सद्य:स्थितीत या इमारतीची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. ही जागा डोंगरात असल्याने तेथे कोणाचे जाणे-येणे नाही. त्यामुळे चुकीच्या गोष्टींसाठी या इमारतीचा वापर होत असल्याचा आक्षेप ग्रामस्थ घेतात. आता महामार्गाच्या रुंदीकरणामुळे ही जागा किमान दृष्टीस पडू लागली आहे. मात्र, ‘भव्य’ स्मारकाच्या घोषणांनंतर उभी राहिलेली इमारत आणि त्याची आजची अवस्था अत्यंत दयनीय आहे.

स्मारक समितीवर नेमके कोण होते?३६ वर्षांपूर्वी जेव्हा स्मारकासाठी भूमिपूजन झाले, तेव्हा स्मारक समिती नेमण्यात आली होती. मात्र, त्यात स्थानिकांची संख्या फारशी नव्हती. बाहेरील लोकांचाच त्यात भरणा अधिक होता. स्मारकामध्ये काय असेल, याचा नेमका आराखडा निश्चित होता की नाही, याबाबतही आजच्या स्थानिकांना माहिती नाही. त्यामुळे येथे काय केले जाणार होते, त्याचा पाठपुरावा कोणाकडे आणि कसा करायचा, याबाबत स्थानिक लोक अनभिज्ञ आहेत. या समितीने नेमका काय पाठपुरावा केला, याबाबतही कोणाला माहिती नाही.

स्मारकाच्या जागेबाबत मतेमतांतरे?पकडले जाण्याआधी छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य जेथे होते, त्या भागात त्यांचे स्मारक व्हावे, अशी बहुतेकांची अपेक्षा आहे. आजही कसबा येथे कोणी शंभूप्रेमी येतात, तेव्हा त्यांना त्या जागेची ओढ असते. तेथील माती आपल्या कपाळावर लावण्यासाठी ते अधिक आतूर असतात; पण सरकारने स्मारकासाठी निश्चित केलेली जागा तेथून लांब आहे. ही जागा का निवडण्यात आली, याबाबतही आता कोणाला माहिती नाही.

घोषणांचे स्मारक

  • आतापर्यंत या स्मारकाबाबत अनेकांनी घोषणा केल्या आहेत. मुळात भव्य स्मारकाची घोषणा करूनच १९८९ साली येथे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर अनेकांनी या स्मारकाविषयी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.
  • लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी भाजपचे नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी या स्मारकासाठी २०० कोटी रुपये निधी आणण्याची घोषणा केली होती; पण पुढे काहीही झालेले नाही.
  • अलीकडेच १९ फेब्रुवारीला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कसबा येथे दिलेल्या भेटीत भव्य स्मारकाची घोषणा केली आहे. प्रसंगी सक्तीच्या भूसंपादनाची तयारीही त्यांनी केली आहे. मात्र, मुळात स्थानिकांशी कोणी चर्चाच केलेली नाही.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराज