शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

एस्. टी.चे रोज अडीच लाखांचे नुकसान

By admin | Updated: August 17, 2016 23:11 IST

२५ चालक, वाहक कमी : भारमान नसल्याचा फटका, १४ फेऱ्या रद्द, महिनाभरात ७५ लाखांचा फटका

मेहरुन नाकाडे --रत्नागिरी --थेट बसफेरीला प्रवासी भारमान नसल्यास ती फेरी बंद करण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतल्याने रत्नागिरी विभागातील एकूण १४ फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकी २५ चालक व वाहक कमी झाले आहेत. तसेच दिवसाला अडीच लाख याप्रमाणे रत्नागिरी विभागाचे महिनाभराचे तब्बल ७५ लाखांचे नुकसान झाले आहे.प्रत्येक आगारातून जिल्ह्याबाहेर काही थेट फेऱ्या सुरू आहेत. या गाडीतून थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यल्प असली तरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी नाही. किंबहुना चांगल्या भारमानामध्ये ही एस्. टी. सेवा सुरू होती. परंतु, महामंडळाने जुलै महिन्यामध्ये थेट प्रवासी नसल्यास अशा फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सर्व आगारांमध्ये जारी करण्यात आला. त्यामुळे चांगल्या भारमानात सुरू असलेल्या गाड्या चक्क बंद कराव्या लागल्या. थेट प्रवासी नसल्यामुळे रत्नागिरी विभागातून नियमित सुटणाऱ्या १४ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे २५ चालक व २५ वाहक कमी झाले आहेत. रत्नागिरी विभागातर्फे या चालक व वाहकांना सेवेत सामावून घेतानाच त्यांना अन्य ठिकाणी ड्युटी देण्यात आली आहे. विभागातील १४ फेऱ्या रद्द झाल्यामुळे दरदिवशी ११ हजार किलोमीटरचा प्रवास थांबला आहे. या फेऱ्या रद्द झाल्याने त्या मार्गावरील भारमान घटले आणि त्याचा परिणाम विभागाच्या आर्थिक उत्पन्नावर झाला. प्रतिदिन अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. याअंतर्गत सकाळी ९ वाजता सुटणारी दापोली - अक्कलकोट, सायंकाळी ७.१५ वाजता सुटणारी खेड - मुंबई, सायंकाळी ७ वाजता सुटणारी खेड - लातूर, पहाटे ५ वाजता सुटणारी चिपळूण - परळी, सकाळी ७.४५ वाजता सुटणारी गुहागर - अक्कलकोट, सकाळी १० वाजता सुटणारी गुहागर - जत, सकाळी ६.१५ वाजता सुटणारी गुहागर - विजापूर, सायंकाळी ७ वाजता सुटणारी करजुवे - मुंबई, सायंकाळी ८.१५ वाजता सुटणारी देवरूख -मुंबई, सकाळी ७.३० वाजता सुटणारी रत्नागिरी - लातूर, दुपारी १.१५ वाजता सुटणारी रत्नागिरी - हुबळी, सकाळी ७.४५ वाजता सुटणारी राजापूर - पोलादपूर, सकाळी ६ वाजता सुटणारी मंडणगड - उस्मानाबाद, रात्री ८ वाजता सुटणारी मंडणगड - कोल्हापूर या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात ८२२ गाड्या असून, ९ हजार ५४४ फेऱ्यांद्वारे दररोज २५ लाख प्रवाशांची वाहतूक होते. रत्नागिरी विभागाचे दैनंदिन ४० ते ४५ लाख रुपयांचे उत्पन्न आहे. दि. १५ जुलैपासून १४ फेऱ्या रद्द झाल्यामुळे या उत्पन्नात घट झाली आहे. फेऱ्या रद्दचा फटका या विभागाला बसला आहे.भारमान कमी : थेट प्रवाशांचाच विचारथेट बसफेरीला प्रवासी भारमान नसल्याचे कारण पुढे करून रत्नागिरी विभागातील १४ फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या फेऱ्या बंद केल्याने खासगी गाड्यांचे भारमान वाढले आहे. या फेऱ्या बंद करताना महामंडळाने केवळ थेट प्रवाशांचाच विचार केल्याचे दिसून आले आहे.