शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

एस्. टी.चे रोज अडीच लाखांचे नुकसान

By admin | Updated: August 17, 2016 23:11 IST

२५ चालक, वाहक कमी : भारमान नसल्याचा फटका, १४ फेऱ्या रद्द, महिनाभरात ७५ लाखांचा फटका

मेहरुन नाकाडे --रत्नागिरी --थेट बसफेरीला प्रवासी भारमान नसल्यास ती फेरी बंद करण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतल्याने रत्नागिरी विभागातील एकूण १४ फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकी २५ चालक व वाहक कमी झाले आहेत. तसेच दिवसाला अडीच लाख याप्रमाणे रत्नागिरी विभागाचे महिनाभराचे तब्बल ७५ लाखांचे नुकसान झाले आहे.प्रत्येक आगारातून जिल्ह्याबाहेर काही थेट फेऱ्या सुरू आहेत. या गाडीतून थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यल्प असली तरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी नाही. किंबहुना चांगल्या भारमानामध्ये ही एस्. टी. सेवा सुरू होती. परंतु, महामंडळाने जुलै महिन्यामध्ये थेट प्रवासी नसल्यास अशा फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सर्व आगारांमध्ये जारी करण्यात आला. त्यामुळे चांगल्या भारमानात सुरू असलेल्या गाड्या चक्क बंद कराव्या लागल्या. थेट प्रवासी नसल्यामुळे रत्नागिरी विभागातून नियमित सुटणाऱ्या १४ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे २५ चालक व २५ वाहक कमी झाले आहेत. रत्नागिरी विभागातर्फे या चालक व वाहकांना सेवेत सामावून घेतानाच त्यांना अन्य ठिकाणी ड्युटी देण्यात आली आहे. विभागातील १४ फेऱ्या रद्द झाल्यामुळे दरदिवशी ११ हजार किलोमीटरचा प्रवास थांबला आहे. या फेऱ्या रद्द झाल्याने त्या मार्गावरील भारमान घटले आणि त्याचा परिणाम विभागाच्या आर्थिक उत्पन्नावर झाला. प्रतिदिन अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. याअंतर्गत सकाळी ९ वाजता सुटणारी दापोली - अक्कलकोट, सायंकाळी ७.१५ वाजता सुटणारी खेड - मुंबई, सायंकाळी ७ वाजता सुटणारी खेड - लातूर, पहाटे ५ वाजता सुटणारी चिपळूण - परळी, सकाळी ७.४५ वाजता सुटणारी गुहागर - अक्कलकोट, सकाळी १० वाजता सुटणारी गुहागर - जत, सकाळी ६.१५ वाजता सुटणारी गुहागर - विजापूर, सायंकाळी ७ वाजता सुटणारी करजुवे - मुंबई, सायंकाळी ८.१५ वाजता सुटणारी देवरूख -मुंबई, सकाळी ७.३० वाजता सुटणारी रत्नागिरी - लातूर, दुपारी १.१५ वाजता सुटणारी रत्नागिरी - हुबळी, सकाळी ७.४५ वाजता सुटणारी राजापूर - पोलादपूर, सकाळी ६ वाजता सुटणारी मंडणगड - उस्मानाबाद, रात्री ८ वाजता सुटणारी मंडणगड - कोल्हापूर या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात ८२२ गाड्या असून, ९ हजार ५४४ फेऱ्यांद्वारे दररोज २५ लाख प्रवाशांची वाहतूक होते. रत्नागिरी विभागाचे दैनंदिन ४० ते ४५ लाख रुपयांचे उत्पन्न आहे. दि. १५ जुलैपासून १४ फेऱ्या रद्द झाल्यामुळे या उत्पन्नात घट झाली आहे. फेऱ्या रद्दचा फटका या विभागाला बसला आहे.भारमान कमी : थेट प्रवाशांचाच विचारथेट बसफेरीला प्रवासी भारमान नसल्याचे कारण पुढे करून रत्नागिरी विभागातील १४ फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या फेऱ्या बंद केल्याने खासगी गाड्यांचे भारमान वाढले आहे. या फेऱ्या बंद करताना महामंडळाने केवळ थेट प्रवाशांचाच विचार केल्याचे दिसून आले आहे.