शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६६३ टन कचऱ्याचे निर्मूलन

By admin | Updated: November 17, 2014 23:20 IST

स्वच्छ भारत, सुंदर भारत : धर्माधिकारी प्रतिष्ठानने घेतली हाती झाडू

शोभना कांबळे - रत्नागिरी --देशभरात सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ मोहिमेंतर्गत स्वच्छता दूत म्हणून कार्य करणाऱ्या नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन रविवारी जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात जिल्ह्यातून एकूण ६६३ टन कचरा संकलीत करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत राबविण्यात आला. विशेष म्हणजे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अनुयायी यामध्ये स्वेच्छेने सामील झाले होते. शहरामध्ये गट तयार करून या गटांच्या माध्यमातून परिसरातील स्वच्छतेवर भर देण्यात आला. या स्वच्छता अभियानात श्री सदस्यांबरोबर स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी, नागरिक यांचा समावेश होता.सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत राबविलेल्या या अभियानात शहरातील निवडलेल्या भागातील स्वच्छता करण्यात आली. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. राजापूर आणि चिपळूण येथील नद्यांमधील गाळही काढण्यात आला. चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील सुमारे ३० डंपर गाळ काढण्यात आला. यावेळी देवरूख शहरात ही मोहीम राबविण्यात आली नाही. पुढच्या वेळी हे शहर या मोहिमेत घेतले जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण ९३४३ श्री सदस्य सहभागी झाले होते. या प्रमुख आठ शहरांचा मिळून एकूण ६६३.१३ टन कचरा संकलीत करण्यात आला. सर्वाधिक कचरा दापोली आणि राजापुरात संकलीत करण्यात आला. यासाठी संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीतर्फे वाहने पुरविण्यात आली होती. संकलीत केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्यरित्या लावण्यात आली.पहिल्या टप्प्यात नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरांमध्ये स्वच्छता करण्यात आली. आता थोड्या दिवसांनी ग्रामीण भागातही स्वच्छता मोहीम राबविली जाणार असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमांचे नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे.तालुकाकार्यकर्तेकचरावाहनेमंडणगड११९६२९१०दापोली१९७६२३४३३खेड२१७३.९३५५चिपळूण१९००९०३३गुहागर८३८१५२०रत्नागिरी३०००१०२५२लांजा१९१२७.५८राजापूर८२५१६१.७१५एकूण९३४३६६३.१४१७६जिल्ह्यातील एकूण ९३४३ श्री सदस्य सहभागी.प्रमुख आठ शहरांचा मिळून एकूण ६६३.१३ टन कचरा संकलित.सर्वाधिक कचरा दापोली आणि राजापुरात संकलीत.नगरपालिका, नगरपंचायतीतर्फे वाहनांचा पुरवठा.ग्रामीण भागातही स्वच्छता राबवण्याचा संकल्प.