शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नाही, दुपारी ३ पर्यंत जागा रिकामी करा: मुंबई हायकोर्ट
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
6
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
7
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
8
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
9
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
10
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
11
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
12
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
13
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
14
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
15
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
16
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
17
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
18
शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्य, राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
19
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
20
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?

जिल्ह्यात ६६३ टन कचऱ्याचे निर्मूलन

By admin | Updated: November 17, 2014 23:20 IST

स्वच्छ भारत, सुंदर भारत : धर्माधिकारी प्रतिष्ठानने घेतली हाती झाडू

शोभना कांबळे - रत्नागिरी --देशभरात सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ मोहिमेंतर्गत स्वच्छता दूत म्हणून कार्य करणाऱ्या नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन रविवारी जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात जिल्ह्यातून एकूण ६६३ टन कचरा संकलीत करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत राबविण्यात आला. विशेष म्हणजे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अनुयायी यामध्ये स्वेच्छेने सामील झाले होते. शहरामध्ये गट तयार करून या गटांच्या माध्यमातून परिसरातील स्वच्छतेवर भर देण्यात आला. या स्वच्छता अभियानात श्री सदस्यांबरोबर स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी, नागरिक यांचा समावेश होता.सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत राबविलेल्या या अभियानात शहरातील निवडलेल्या भागातील स्वच्छता करण्यात आली. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. राजापूर आणि चिपळूण येथील नद्यांमधील गाळही काढण्यात आला. चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील सुमारे ३० डंपर गाळ काढण्यात आला. यावेळी देवरूख शहरात ही मोहीम राबविण्यात आली नाही. पुढच्या वेळी हे शहर या मोहिमेत घेतले जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण ९३४३ श्री सदस्य सहभागी झाले होते. या प्रमुख आठ शहरांचा मिळून एकूण ६६३.१३ टन कचरा संकलीत करण्यात आला. सर्वाधिक कचरा दापोली आणि राजापुरात संकलीत करण्यात आला. यासाठी संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीतर्फे वाहने पुरविण्यात आली होती. संकलीत केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्यरित्या लावण्यात आली.पहिल्या टप्प्यात नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरांमध्ये स्वच्छता करण्यात आली. आता थोड्या दिवसांनी ग्रामीण भागातही स्वच्छता मोहीम राबविली जाणार असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमांचे नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे.तालुकाकार्यकर्तेकचरावाहनेमंडणगड११९६२९१०दापोली१९७६२३४३३खेड२१७३.९३५५चिपळूण१९००९०३३गुहागर८३८१५२०रत्नागिरी३०००१०२५२लांजा१९१२७.५८राजापूर८२५१६१.७१५एकूण९३४३६६३.१४१७६जिल्ह्यातील एकूण ९३४३ श्री सदस्य सहभागी.प्रमुख आठ शहरांचा मिळून एकूण ६६३.१३ टन कचरा संकलित.सर्वाधिक कचरा दापोली आणि राजापुरात संकलीत.नगरपालिका, नगरपंचायतीतर्फे वाहनांचा पुरवठा.ग्रामीण भागातही स्वच्छता राबवण्याचा संकल्प.