शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६६३ टन कचऱ्याचे निर्मूलन

By admin | Updated: November 17, 2014 23:20 IST

स्वच्छ भारत, सुंदर भारत : धर्माधिकारी प्रतिष्ठानने घेतली हाती झाडू

शोभना कांबळे - रत्नागिरी --देशभरात सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ मोहिमेंतर्गत स्वच्छता दूत म्हणून कार्य करणाऱ्या नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन रविवारी जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात जिल्ह्यातून एकूण ६६३ टन कचरा संकलीत करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत राबविण्यात आला. विशेष म्हणजे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अनुयायी यामध्ये स्वेच्छेने सामील झाले होते. शहरामध्ये गट तयार करून या गटांच्या माध्यमातून परिसरातील स्वच्छतेवर भर देण्यात आला. या स्वच्छता अभियानात श्री सदस्यांबरोबर स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी, नागरिक यांचा समावेश होता.सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत राबविलेल्या या अभियानात शहरातील निवडलेल्या भागातील स्वच्छता करण्यात आली. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. राजापूर आणि चिपळूण येथील नद्यांमधील गाळही काढण्यात आला. चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील सुमारे ३० डंपर गाळ काढण्यात आला. यावेळी देवरूख शहरात ही मोहीम राबविण्यात आली नाही. पुढच्या वेळी हे शहर या मोहिमेत घेतले जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण ९३४३ श्री सदस्य सहभागी झाले होते. या प्रमुख आठ शहरांचा मिळून एकूण ६६३.१३ टन कचरा संकलीत करण्यात आला. सर्वाधिक कचरा दापोली आणि राजापुरात संकलीत करण्यात आला. यासाठी संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीतर्फे वाहने पुरविण्यात आली होती. संकलीत केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्यरित्या लावण्यात आली.पहिल्या टप्प्यात नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरांमध्ये स्वच्छता करण्यात आली. आता थोड्या दिवसांनी ग्रामीण भागातही स्वच्छता मोहीम राबविली जाणार असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमांचे नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे.तालुकाकार्यकर्तेकचरावाहनेमंडणगड११९६२९१०दापोली१९७६२३४३३खेड२१७३.९३५५चिपळूण१९००९०३३गुहागर८३८१५२०रत्नागिरी३०००१०२५२लांजा१९१२७.५८राजापूर८२५१६१.७१५एकूण९३४३६६३.१४१७६जिल्ह्यातील एकूण ९३४३ श्री सदस्य सहभागी.प्रमुख आठ शहरांचा मिळून एकूण ६६३.१३ टन कचरा संकलित.सर्वाधिक कचरा दापोली आणि राजापुरात संकलीत.नगरपालिका, नगरपंचायतीतर्फे वाहनांचा पुरवठा.ग्रामीण भागातही स्वच्छता राबवण्याचा संकल्प.