शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

सेंद्रीय शेतीमुळे होतेय पर्यावरणाचेही रक्षण

By admin | Updated: February 24, 2015 00:00 IST

शंकरराव राऊत : सेंद्रीय शेती विकास परिषदेचे उद्घाटन

सावंतवाडी : सेंद्रीय शेतीमुळे जमिनीची पत राखली जातानाच पर्यावरणाचे रक्षणही होते. तसेच जनतेला प्रदूषणमुक्त अन्न मिळते. त्यामुळे सेंद्रीय शेतीचा प्रयोग अद्वितीय ठरतो. या शेतीच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध असून, चांगला नफा मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने सेंद्रीय शेती व खत निर्मिती करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सेंंद्रीय शेती धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. शंकरराव राऊत यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा आॅरगॅनिक फार्मर्स फेडरेशन आयोजित सेंद्रीय शेती विकास परिषद उद्घाटन सोमवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात सेंद्रीय शेती धोरणावर डॉ. राऊत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब परूळेकर, उपाध्यक्ष कृष्णा मोरजकर, उपविभागीय कृषी अधिकारी आर. जी. फाटक, कोकम क्लस्टर संस्थापक डॉ. आनंद तेंडुलकर, सेंद्रीय शेतीतज्ज्ञ प्रशांत नायकवाडी, वितरण व्यवस्थापनतज्ज्ञ सचिन पालकर, भाजीपाला व्यवस्थापन सुरेश परब, सेंद्रीय खतेतज्ज्ञ सचिन दळवी, सचिव रामानंद शिरोडकर, कोषाध्यक्ष रणजीत सावंत, रमाकांत मल्हार, अभिमन्यू लोंढे, बाजीराव झेंडे, धनंजय गावडे, सुरेंद्र पवार आदी उपस्थित होते. सेंद्रीय शेती जमीन आणि माणसाला आरोग्यदायी आहे. सेंद्रीय शेती, फळे, भाजीपाला यांना आज शहरात मागणी आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना आहेत. शेतीचे धोरण ठरविताना उत्पादन आणि विक्री यांचे अर्थकारणही शेतकऱ्यांनीच सांभाळावेत, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. यावेळी डॉ. आनंद तेंडुलकर यांनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी व समूह गट यांची माहिती दिली. ते म्हणाले, वेखंडाचे मिश्रण आंब्याच्या झाडावर फवारणी केल्यास उत्पन्न चांगले मिळते. आज रासायनिक खते व कीटकनाशकांनी अन्न प्रदूषित मिळत असल्याने आजारही बळावत आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेतीत शेतकऱ्यांनी दडलेल्या अर्थकारणाचा लाभही घ्यावा. सेंद्रीय शेती उत्पादने व प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असे सांगितले. प्रशांत नायकवाडी म्हणाले, तुम्ही सेंद्रीय शेती करत असला, तरी प्रमाणिकरणाला फार महत्त्व आहे. आज १२८ देशात सेंद्रीय शेतीला महत्त्व दिले जात आहे. सेंद्रीय शेतीमुळे जमीन जिवंत होते. त्यामुळे इको-फ्रेंडली निसर्ग व शेतजमीन, प्राणी व भूतल बनतो. रासायनिक खतांचे दुष्परिणाम जगासमोर आले आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेतीला प्राधान्य देताना थर्टी पार्टी सर्टिफिकेशन व जीपीएस प्रमाणिकरणाला प्राधान्य दिले पाहिजे. त्यांच्या प्रमाणिकरणावर बाजारपेठा अवलंबून आहेत, असे नायकवाडी यांनी स्पष्ट केले. आरवली येथील सचिन दळवी म्हणाले, देशी गाईच्या मूत्र व शेणाला फार महत्त्व आहे. गांडूळ खत हा सेंद्रीय शेतीचा आत्मा आहे. मी नोकरी सोडून सेंद्रीय शेतीला प्राधान्य देताना सेंद्रीय खत निर्मिती केली. आज मी ४० टन गांडूळ खत निर्माण करीत असून, माझ्या शेतीच्या वापराच्या पलिकडचे खत विकत आहे. यावेळी सेंद्रीय शेती परसबागेबाबत रमाकांत मल्हार, तर सेंद्रीय शेती व्यवस्थापनाबाबत बाळासाहेब परूळेकर यांनी माहिती दिली. (वार्ताहर)