शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अभियंते, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे

By admin | Updated: March 30, 2015 00:14 IST

ओमप्रकाश गुप्ता : मुख्यामंत्र्यांच्या सुचनेनुसार अपेक्षित बदल घडवणार

रत्नागिरी : शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात समाधानकारक सेवा देण्यासाठी महावितरणने चंग बांधला असून, त्याप्रमाणे काम करण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश गुप्ता यांनी केले आहे. त्याचबरोबर महावितरण कंपनीचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच राहावे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.ग्रामीण भागात आजही तासन्तास वीज खंडित होण्याच्या घटना घडतात. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने तातडीने दखल घेतली जात नाही. कामाच्या ठिकाणी अभियंता किंवा लाईनमन उपलब्ध नसतात. ही स्थिती केवळ अतिहानीमुळे भारनियमन सुरू असलेल्या भागाचीच नाही, तर भारनियमन नसलेल्या ग्रामीण भागात असल्याच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला कार्यपध्दतीत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अमूलाग्र बदल करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. याबाबत गुप्ता यांनी महावितरणतर्फे प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही चांगली सेवा देण्यासाठी महावितरणला लोकसहभाग वाढवण्याची आवश्यकता आहे. अभियंते व कर्मचारी मुख्यालयी राहण्यासाठी गुप्ता यांनी स्पष्ट सूचना केल्या आहेत. ग्रामीण भागात खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत वस्तुस्थितीची माहिती व्हावी, यासाठी यापुढे एक रजिस्टर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ठेवण्याची सूचना केली आहे. त्यात खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा संपूर्ण तपशील ग्रामपंचायतीतर्फे नोंदविला जाणार आहे. शिवाय ग्राहकांना या रजिस्टरमध्ये वीजविषयक तक्रारीही नोंदविता येणार आहेत, असे गुप्ता यांनी यावेळी स्पष्ट केले.नवीन जोडण्या देताना कोणताही गैरप्रकार होऊ नये किंवा किमान वेळेत जोडण्या मिळाव्यासाठी आॅनलाईन यंत्रणा उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु अद्याप या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर होताना दिसत नाही. शिवाय जोडण्यांमध्ये विलंब होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना जोडण्या देण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.‘ग्राहक आहेत म्हणून आपण आहोत’ याचे भान महावितरणच्या प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांने ठेवून ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे गुप्ता यांनी सांगितले. विद्युत अधिनियम २००३ मधील सुधारणा लवकरच कायद्याचे रूप घेणार आहे. परंतु महावितरणच्या कार्यपध्दतीतील बदल कायद्यातील बदनापेक्षा केला तर जनमानसातील महावितरणची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल. शिवाय मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेली यंत्रणा देता येईल, असे गुप्ता यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)